<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917</id><updated>2012-02-16T09:01:10.053-08:00</updated><category term='आंबोली धबधबा'/><title type='text'>चला फिरायला</title><subtitle type='html'>मला फिरायला आवडत नाही, असं सांगणारा मनुष्य सापडणं तसं कठीणच. इंटरनेटवर इंग्रजी भाषेत पर्यटनावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. वेबसाईट्‌सही आहेत. पण माझ्या माहितीनुसार (कारण नेमकं माहीत नाही) मराठीत इंटरनेटवर उपलब्ध असणारी माहिती अगदीच अत्यल्प आहे. त्यामुळं "भटक्‍यांना' मराठीतही अशी माहिती सहज उपलब्ध व्हावी या हेतूने हे भारतातल्या प्रेक्षणीय स्थळांचं संकलन...</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>39</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-4471959771888716009</id><published>2010-01-31T00:29:00.000-08:00</published><updated>2010-01-31T00:30:46.784-08:00</updated><title type='text'>महर्षी कर्वे यांचे मुरूड</title><content type='html'>मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनस्थळांचा विचार करताना अगदी अलिबागपासून गोव्यापर्यंत मन भरारी मारून येतं. यातच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासन नऊ किलोमीटर अंतरावरील मुरूडचा रम्य किनारा मनाला विशेष मोहून टाकणारा आहे. स्वच्छ किनाऱ्यावर भटकणे, शांत समुद्रामध्ये मनसोक्त डुंबणे व कोकणी पदार्थांचा आस्वाद घेणे, यासाठी मुरूड हे गाव पर्यटकांच्या खास लक्षात राहण्यासारखेच आहे. पुण्याहून 200 किलोमीटर दापोली आणि दापोलीपासून नऊ किलोमीटरवर मुरूड हे महर्षी कर्वे यांचे जन्मगाव. नारळ-पोफळीच्या बागा, कौलारू घरे, सारवलेली अंगणे पाहत पाहत आपण सरळ समुद्रावरच पोचतो व तो विशाल सागर आपल्याला खिळवूनच ठेवतो. याच सागराच्या सान्निध्यात व अगदी नारळाच्या बागेत एक साधे पण सुंदर रिसॉर्ट आहे... श्री. सुरेश बाळ यांचे "मुरूड बीच रिसॉर्ट'. येथे गरमागरम उकडीचे मोदक, आंबोळी, थालीपीठ यासारखे कोकणी पदार्थ आधी कळवल्यास आधी पर्यटकांसाठी बनवतात. तसेच त्यांच्याकडे पोहा पापड, आमसुले, आंबापोळी, फणसपोळी इ. पदार्थ मागणीनुसार उपलब्ध असतात. शिवाय त्यांच्या बागेत जायफळ, लवंगा, काळी मिरी इत्यादी झाडेही पाहायला मिळतात. मुरूडच्या किनाऱ्यावरून सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग व हर्णैचा दीपस्तंभही दिसून येतो. मुरूड गावात दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या खांबांवर नक्षीकाम केलेले आहे, तर पुढील बाजूस नगारखाना व दगडी दीपमाळ आहे. मुरूडपासून चार-पाच किलोमीटर अंतरावर आंजर्ले गाव वसलेले आहे. तेथील गर्द झाडी असणाऱ्या टेकडीवर सुंदर गणेश मंदिर आहे. दापोली-दाभोळ रस्त्यावर असलेली पन्हाळेकाजी लेणी हेही पर्यटकांना पाहण्यासारखे स्थान आहे. दाभोळहून जेटीने किंवा फेरीबोटीने खाडी पार करून गुहागर, हेदवी व वेळणेश्‍वर अशा पर्यटनस्थानांची ओळख करून घेता येते. ही फेरीबोट दुचाकी, चारचाकी वाहने व माणसे यांना वाहून नेते व ही सेवा वाजवी दरात सतत उपलब्ध असते. तसेच मुरूडच्या किनाऱ्यावर राहून पर्यटक रायगड किल्ला, चिपळूणजवळील परशराम मंदिर, दिवेआगर येथील सोन्याचा गणपती इत्यादी ठिकाणे पाहून परत येऊ शकतो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-4471959771888716009?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/4471959771888716009/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=4471959771888716009' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4471959771888716009'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4471959771888716009'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2010/01/blog-post_3340.html' title='महर्षी कर्वे यांचे मुरूड'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-4310556970540674129</id><published>2010-01-31T00:27:00.000-08:00</published><updated>2010-01-31T00:29:14.794-08:00</updated><title type='text'>वाईची हिरवाई</title><content type='html'>पुण्याहून महाबळेश्‍वर,पाचगणीला जाण्याऐवजी वाईला गेल्यावर कृष्णाकाठी घाटावर पुरातन मंदिरे आहेत. त्यात एक ढोल्या गणपती मंदिर (दहा फुटी गणपती मूर्ती आहे. मंदिर सुंदर आहे) आहे. जवळच श्री शंकराचे कोरीव कामाचे सुंदर मंदिर आहे. मंदिर, नदी, शिवलिंग फारच सुंदर आहे. ते पाहून वाईतून धोम गाव व धरणाकडे एक रस्ता जातो. रस्त्याच्या कडेने दाट झाडी आहे व हिरवीगार शेते. बाराही महिने हा परिसर हिरवागार असतो. मन प्रसन्न होते. शुद्ध हवा, मनाला भुरळ घालणारा आसमंत. पुढे या रस्त्याने पाच-सहा मैलांवर कृष्णाकाठचे मेणवली गाव लागते. गाव पेशवेकालीन आहे. येथे जुने वाडे आहेत. नाना फडणवीस यांचा वाडा आहे. वाड्याची रचना वेगळी व कल्पक आहे. नैसर्गिक रंगाची भिंतीचित्रे आहेत. नानांचा शिसमचा मोठा पलंग आहे. वाडा बराच पडझड झालेला आहे. आता तेथे नोकरचाकर राहतात. वाड्याचा बराच भाग बंदिस्त आहे. तेथेच कृष्णाकाठी चंद्रकोराकृती सुंदर घाट आहे. पुरातन मंदिरे आहेत. संथ वाहणारी कृष्णा नदी, आजूबाजूस दाट झाडी, त्यामुळे परिसर फारच निवांत, रमणीय आहे. पुढे त्याच रस्त्याने सात मैलांवर धोम गाव आहे. डाव्या बाजूस धोम धरण, गाव, कृष्णा नदी, सुंदर घाट, नृसिंह मंदिर व अप्रतिम शिल्पकलेचे काळ्या पाषाणातील शिवालय व यापुढील अनोखे नंदी मंदिर व छोटी किल्लेवजा गढी आणि सर्वत्र निसर्गरम्य परिसर. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनाला भुरळ घालणारी नीरव शांतता. आपल्याला गडबड-गोंगाटाची सवय, पण येथे वेगळाच अनुभव... जसे काय ऋषिमुनींचे तपस्यास्थान असावे. वाईस गेल्यावर मंदिरापासून जवळ, गावात बंडा जोशी यांची खाणावळ आहे. घरगुती सुग्रास जेवण मिळते. जेवणात वरण-भात, गरम घडीची पोळी, उसळ, आमटी, चटणी, कोशिंबीर, ताक असा जेवणाचा बेत असतो. जेवणाचे दरही स्वस्त आहेत. मन तृप्त होते. तेथून पुढे उजव्या बाजूच्या रस्त्याने बलकवडी धरण व धोम धरणाचा परिसर लागतो. धरणाच्या पाण्यात नौकानयन करून पुढे बलकवडी धरणासाठी जाता येते. धरणाचे काम अर्धवट आहे, पण परिसर निसर्गरम्य आहे. एक-दोन पुरातन मंदिरे आहेत. ते पाहून आपण त्याच रस्त्याने परत वाईस येऊन पुण्यास आठ वाजेपर्यंत सहज पोचू शकतो. सर्व प्रवास 130 किलोमीटरचा होतो. जर दोन दिवस अवधी असेल तर वाईस बऱ्यापैकी लॉज आहेत. आनंदवनसारखे मेणवली रस्त्यावर राहण्याचे, निसर्गाच्या सान्निध्यात, तेही स्वस्तात सोय असलेले ठिकाण आहे. दुसऱ्या दिवशी पाचगणीस जाऊन पाचगणी स्थळदर्शन करून आपण संध्याकाळी पुण्यास आरामात येऊ शकतो.&lt;br /&gt;- सुभद्रा गोसावी&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-4310556970540674129?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/4310556970540674129/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=4310556970540674129' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4310556970540674129'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4310556970540674129'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2010/01/blog-post_2123.html' title='वाईची हिरवाई'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-1789035716742873859</id><published>2010-01-31T00:22:00.001-08:00</published><updated>2010-01-31T00:23:06.281-08:00</updated><title type='text'>शिरसाड</title><content type='html'>शिरसाड एक दुर्लक्षित पर्यटन स्थळ. मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगाव या तालुक्‍याच्या ठिकाणापासून पूर्वेला 15 किलोमीटर अंतरावर बोरवाडी हे गाव सह्याद्रीच्या उंच शिखरांच्या पायथ्याशी वसले आहे. या परिसरामध्ये शिवकालात बऱ्याच लढाया झालेल्या असल्याने या परिसराला "शिरछाट'चा अपभ्रंश होऊन "शिरसाड' टप्पा, असे म्हटले जाते. या परिसरातील "बोरवाडी' (बारा वाड्यांचे प्रमुख आश्रयस्थान) या पायखस्त होत चाललेल्या गावातील शहरी भागात गेलेल्या लोकांनी एकत्र येऊन तेथील मंदिरांच्या परिसरात शासकीय मदतीशिवाय वृद्ध, रुग्णाइतांची सोय व्हावी या उद्देशाने "माऊली वृद्धाश्रम' चालविला आहे. सुमारे तेवीस लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक सोईंनी युक्त असलेल्या या आनंदाश्रमामध्ये तीस वृद्ध राहत आहेत. हा वृद्धाश्रम विठ्ठल-रखुमाई देवस्थान ट्रस्टमार्फत सशुल्क चालवला जातो. हा आश्रम पाहण्यासारखा आहेच, परंतु तेथे आलेल्यांची निवास व भोजनाची (शाकाहारी) अवस्था अत्यल्प दरामध्ये केली जाते. याच परिसरात किल्ले रायगड, मानगड, गांगवली (छ. शाहूमहाराजांचे जन्मस्थान) एक प्रचंड देवराई, ही ऐतिहासिक ठिकाणे आहेतच, त्याचबरोबर कुंभे (नियोजित जलविद्युत प्रकल्पस्थान) जोर, केळगण ही थंड हवेची ठिकाणे आहेत. तेथील खेडूत राहण्या-जेवणाचीही सोय करतात. मध्यमवर्गीयांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी ही ठिकाणे आहेत. त्याचबरोबर वृद्धाश्रमातील वृद्धांबरोबर गप्पा मारताना, तसेच "आपणाला कोणीतरी भेटायला आले आहे,' याचा त्या वृद्धांना होणारा आनंद होतो खासच आनंददायी अनुभव असतो. भ्रमंतीच?या आनंदाबरोबरच सामाजिक जाणिवेचा आनंदही या निमित्ताने मिळू शकतो. गटाने सहलींच्या दृष्टीनेही हा परिसर चांगला आहेच, गिर्यारोहण व निसर्गभ्रमण करणाऱ्यांना तर ही पर्वणीच ठरेल, असा हा परिसर आहे.&lt;br /&gt;- साभार ः सकाळ&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-1789035716742873859?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/1789035716742873859/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=1789035716742873859' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1789035716742873859'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1789035716742873859'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2010/01/blog-post_31.html' title='शिरसाड'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-9159827178439350827</id><published>2010-01-30T22:48:00.001-08:00</published><updated>2010-01-31T00:19:38.816-08:00</updated><title type='text'>भीमाशंकर तव शरणम्‌</title><content type='html'>&lt;p&gt;पावसाळा सुरू झाला की आषाढ संपून श्रावण कधी येतो ते कळतसुद्धा नाही. श्रावणात सह्याद्री पावसात न्हाऊन तृप्त झालेला असतो. त्याच्या अंगाखांद्यावरून पाण्याचे ओहोळ खळाळत असतात. रानहळदीची फुलं फुललेली असतात. अशाच एखाद्या श्रावणातल्या रविवारी पायथ्याच्या खांडस गावातून भीमाशंकरचा डोंगर चढायचा. संध्याकाळी भीमाशंकरला पोहोचले की वरती मुक्काम करायचा. दुसऱ्या दिवशी असतो श्रावणी सोमवार. भीमाशंकराचं पहाटे दर्शन करायचं. गुप्त भीमाच्या धबधब्याखाली भिजायचं. पुढच्या वर्षी पुन्हा येईन सांगून देवाचा निरोप घ्यायचा. कित्येक वर्षं श्रावणातला पहिला सोमवार मी चुकवला नव्हता. त्याच्या आठवणी अजूनही मन ताजंतवानं करतात. मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकापासून रिक्षाने खांडस गाव गाठायचं. खांडस गावाला सह्याद्रीची मुख्य रांग लागूनच आहे. खांडस गावातून भीमाशंकराची चढाई दोन टप्प्यांत करायची. त्यातला पहिला टप्पा चढण्यासाठी गणपती घाट व शिडी घाट असे दोन मार्ग आहेत. गणपती घाटात घाटाचं रक्षण करणाऱ्या देवतेचं, गणपतीचं मंदिर आहे. गणपती घाट तुलनेने चढायला सोपा आणि निसर्गरम्य आहे. गणपती घाटाने चढताना पदरगडाचं अतिशय सुंदर दर्शन होतं. घाट चढताना लागणारे ओहोळ व धबधबे प्रवासाचा शीण अजिबात येऊ देत नाहीत. गणपती घाटाने पहिला टप्पा चढायला चार तास लागतात. पहिला टप्पा चढायची अधिक जोखमीची वाट म्हणजे शिडीची वाट. ही वाट अधिक उभ्या चढणीची असून वाटेत तीन ठिकाणी शिड्या लावल्या आहेत. त्याशिवाय एका ठिकाणी वाट इतकी अरुंद आहे की दरीकडे पाठ करून कातळात केलेल्या खोबणीत दोन्ही हाताची बोटं रुतवून ती पार करावी लागते. शिडीने पहिला टप्पा चढायला तीन तास पुरेत. पहिला टप्पा संपून चढायचा दुसरा टप्पा सुरू होताना पठार लागतं. त्या पठारावर खांडस गावातून चढून येणाऱ्या शिडीची वाट व गणपती घाट या दोन्ही वाटा एकत्र येतात. येथून पुढे झिगझॅग चढणारी वाट दमछाक करायला लावते. दोनेक तासांच्या चढाईनंतर शेवटच्या टप्प्यात वाट दरीला समांतर होते, चढ कमी होतो. पावसाळ्यात आलात तर दरी धुक्‍याने भरलेली असते. पायाखालची वाटही दूरवर दिसत नाही. आपण स्वर्गात आहोत आणि थेट ढगात चालतो आहोत, असा भास होतो. अर्ध्या तासाच्या चालीनंतर आपण भीमाशंकराच्या पठारावर प्रवेश करतो. इथे धुकं असतंच, पण सोबतीला गार बोचरा वारासुद्धा असतो. पाचेक मिनिटं चालल्यावर धुक्‍यातूनच अंधुक गाड्यांचे हेडलाईट दिसायला लागतात आणि आपण भानावर येतो. अरे, या जादुई दुनियेत या गाड्या कुठून आल्या? गाडीतळापासून मंदिरापर्यंत उतरत्या पायऱ्यांची वाट आहे. तिथल्याच एखाद्या घरात आपली पथारी पसरायची. भीमाशंकरची उंची आहे 3250 फूट. श्रावणात पठारावर पाऊस सतत भुरभुरत असतो. भीमाशंकराच्या मंदिराचा कळस धुक्‍यात हरवून गेलेला असतो. भीमाशंकर मंदिराची बांधणी नागर किंवा उत्तर भारतीय पद्धतीची आहे. मंदिराशेजारीच मोक्षकुंड आहे. शंकराचं दर्शन झालं की जंगलात जाणाऱ्या वाटेने गुप्त भीमाशंकराकडे निघायचं. भीमा नदीच्या पात्रात तीन टप्प्यांत असणारा धबधबा आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याची उंची आहे सात फूट. तिथे कातळावर छोटी शिवलिंगं कोरली आहेत. मोठ्या कुंडात उगम पावलेली भीमा गुप्त भीमाशंकरला पुन्हा प्रगट होते असं म्हणतात. गुप्त भीमाशंकर पाहून परत येताना धबधब्याच्या आधी नदी ओलांडायची आणि वेगळ्या वाटेने मंदिराकडे परतायचं. या वाटेवरसुद्धा एक फोटोजिनिक धबधबा आहे. नाना फडणविसांनी मंदिराचा जीर्णोधार केला होता. वसई विजयाचं चिन्ह असणारी एक मोठी घंटा या मंदिर परिसरात आहे. भगवान शंकरांनी इथे त्रिपुरासुराचा वध केला होता. त्रिपुरारी पौर्णिमेला इथे मोठा उत्सव असतो. भीमाशंकर ते गुप्त भीमा दरम्यानच्या जंगलात तुम्हाला शेकरू दिसू शकतो. ही असते उडणारी खार. तपकिरी रंगाचा हा प्राणी त्याच्या पांढऱ्या झुबकेदार शेपटीसह सुंदर दिसतो. पावसाळा संपताना शेकरू त्याच्या झाडावरच्या घरट्याजवळ दिसू शकतो. गुप्त भीमाशंकराहून पुढे गेल्यावर अर्ध्या तासात रस्ता एका तिठ्यावर येतो. नदीच्या बाजूने जाणारा रस्ता जातो भोरगिरी किल्ल्यावर आणि नदी ओलांडून जाणारा रस्ता जातो वांद्रेवाडीला. वांद्रेवाडी-भीमाशंकर हा ट्रेकसुद्धा करण्यासारखा आहे. मुंबईहून कर्जतला जाताना भिवपुरी रोडहून वांद्रेवाडीची खिंड आपल्याला दिसते. भिवपुरी-वांद्रेवाडी-भीमाशंकर रस्ता कित्येक वर्षं फायलीमध्ये पडून आहे. भीमाशंकराच्या उत्तरेला असणाऱ्या अहुपे घाटातूनसुद्धा भीमाशंकर ट्रेक करता येतो. त्याशिवाय लोणावळा, तुंगार्ली, वळवण, मांजरसुंभा, कोंडेश्‍वर, कुसूर, सावळ, वांद्रेवाडी असा ट्रेकही करता येतो. भीमाशंकरला रस्त्याने यायचं, वर चाकण अथवा जुन्नर करत खेड मंचरला यायचं. इथून दोन तासांच्या घाट रस्त्यानंतर भीमाशंकरला पोहोचता येतं. राहण्या-जेवण्याच्या घरगुती स्वरूपाच्या सोयी इथे आहेत. हॉटेलं मात्र नाहीत. ज्योतिर्लिंग असल्याने देशभरातून भाविक इथे येत असतात. पण स्वच्छता, पाणी इत्यादी मूलभूत सुविधा इथे आढळत नाहीत. त्या लवकरच होतील अशी आशा. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात तुम्ही इथे याल तेव्हा किमान अपेक्षा ठेवून या. आंबेगाव व खेड तालुक्‍याच्या वादात या देवस्थानाचा विकास होईल तेव्हा होईल, ट्रेकर्सचं मात्र इथे स्वागत आहे. ओम शिव ओम शिव परात्वराशिव, ओंकाराशिव तव शरणम्‌! हे शिवशंकर भवानीशंकर, उमामहेश्‍वर तव शरणम्‌।&lt;br /&gt;- मधुकरी धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;a class="transl_class" id="661" href="mailto:%3Cspan%20title="&gt;युनिट&lt;/span&gt;yhai_malad@rediffmail.com"&gt;mailto:युनिटyhai_malad@rediffmail.com&lt;/a&gt;&lt;br /&gt;साभार ः सकाळ&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-9159827178439350827?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/9159827178439350827/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=9159827178439350827' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/9159827178439350827'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/9159827178439350827'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2010/01/blog-post_8362.html' title='भीमाशंकर तव शरणम्‌'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-2122211476278515025</id><published>2010-01-30T22:45:00.000-08:00</published><updated>2010-01-30T22:47:50.637-08:00</updated><title type='text'>ट्रेक सह्याद्री...</title><content type='html'>ट्रेक सह्याद्री...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:180%;"&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;"राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा...' असं महाराष्ट्राचं वर्णन कुसुमाग्रजांनी करून ठेवलंय, ते खरंच आहे। हा दगडांचा देश आहे, पण या दगडांतूनही सौंदर्याच्या खाणी पसरल्या आहेत आणि त्यांचा अनुभव घ्यायला जावं लागतं सह्याद्रीच्या कुशीत...&lt;/span&gt; &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;पहिल्या दिवशीचा मुक्‍काम असेल कर्जत येथील बेस कॅम्पला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या खऱ्या पदभ्रमणाला सुरुवात होईल. कोंदिवडे गावातून आपण निघू राजमाचीच्या रोखाने. संपूर्ण चढाईचा दिवस. मात्र ही चढाई नुसती चढाई नाही. या वाटेवर आपण पाहणार आहोत "कोंढाणा लेणी'. या लेण्यांना "कोंढाणा लेणी' म्हटलं जातं ते या लेण्यांच्या पायालगत असलेल्या कोंढाणा या गावाच्या नावावरून; मात्र या गावातून येणारा रस्ता जास्त खडतर असल्यानं आपण कोंदिवडे गावातून या लेण्यांकडे येणार आहोत. ज्या वाटेनं आपण चालणार, तो कोणे एके काळी राजमार्ग असावा. कारण या वाटेवर असणारी कोंढाणा लेणी आणि डोंगरांच्या माथ्यावर असणारा राजमाची किल्ला. लेण्यांची निर्मिती ही नेहमीच राजसत्तेच्या संरक्षणाखाली आर्थिक मदतीने करण्यात आलेली आहे. अत्यंत नाजूक कलाकुसरीने नटलेली ही लेणी ख्रिस्त जन्मापूर्वी सुमारे 200 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली असावीत, असं म्हटलं जातं. ही अती प्राचीन लेणी पाहून आपण दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेऊन राजमाचीकडे प्रस्थान करतो. संध्याकाळी पोहोचतो. मोहिमेचा तिसरा दिवस आपण राजमाची किल्ल्याच्या प्रदेशात घालविणार आहोत. मनरंजन व श्रीवर्धन ही किल्ल्यांची जोडगोळी म्हणजेच "राजमाची किल्ला'. थेट ख्रिस्तपूर्ण 200 वर्षे जुना. राजमाची वळलाय तो कुसूर घाटाच्या तोंडावर आणि जोडला गेलाय 300 मी. लांब सह्याद्रीच्या रांगेशी. संपूर्ण परिसर घनदाट अरण्यानं वेढलेला, विविध प्रकारच्या वन्य श्‍वापदांनी संपन्न. पूर्वेच्या बाजूला श्रीवर्धन, तर पश्‍चिमेस मनरंजन हे दोन बालेकिल्ले. त्यांच्या मधल्या खिंडीत वसलंय भैरोबाचं मंदिर. याच परिसरात राजमाचीच्या दक्षिणेस दूरवर आपणास दिसतो ड्यूक्‍स नोज, तर नैऋत्येस ढाक भैरी. 1648 मध्ये हा किल्ला हिंदवी स्वराज्यात आला आणि त्यानंतर शेवटी 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. ट्रेकच्या चौथ्या दिवशी आपण राजमाचीहून कार्ला लेण्यांकडे निघणार आहोत. वाटेत लागणारं शिरोड धरण, त्याचा जलाशय पाहणार आहोत. महाराष्ट्रात जी अत्यंत महत्त्वाची अशी लेणी आहेत, त्यातील एक "कार्ला लेणी.' इंद्रायणी नदीच्या विस्तीर्ण प्रदेशात उंच डोंगरात खोदलेली. कार्ले हे गाव दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध. एकवीरा मातेचं मंदिर आणि लेणी. एकवीरा हे कोळी बांधवांचं आराध्य दैवत. याच मंदिराच्या मागच्या बाजूस लांबलचक डोंगरात खोदली गेलीत बौद्धकालीन लेणी. या लेण्यांची निर्मिती अदमासे ख्रिस्तपूर्व 100 वर्षे इतकी जुनी आहे. मुख्य लेण्यातील स्तूप हा "स्तूप' या शब्दाची व्युत्पत्ती समजाविणारा सध्या अस्तित्वात असलेला एकमेव स्तूप आहे. सकाळी उठून आपण निघणार आहोत आपल्या शेवटच्या मुक्कामाच्या दिशेने, अर्थात लोहगडाकडे. वाटेत मळवली रेल्वेस्थानक लागतं. हा परिसर पक्षी निरीक्षणासाठी अगदी योग्य आहे. विविध प्रकारचे पक्षी आपल्याला या परिसरात पहाटेच्या वेळी पाहायला मिळतात. भाजे गावाकडे आपण कूच करतो. या गावाच्या पूर्वेस असलेल्या डोंगरातील लेण्यांकडे जाणारी पायऱ्यांची वाट आपल्याला भाजे लेण्यांकडे घेऊन जाते. महाराष्ट्रातील "सर्वात प्रथम खोदली गेलेली लेणी' असा भाजे लेण्यांचा उल्लेख केला जातो. ख्रिस्तपूर्व 240 वर्षे खोदलेली ही लेणी. या ठिकाणी एकंदर 20 गुहा असून त्यामध्ये दोन चैत्य, अशी रचना आहे। ख्रिस्तपूर्व 270 वर्षं सुरू झालेलं या लेण्यांचं खोदकाम इ.स. 1200 पर्यंत अखंड चालू होतं. या लेण्यांतील स्तूप हा दगडात कोरलेला आहे. ही लेणी पाहून आपण विसापूर किल्ल्यावर येतो. येथील तटबंदी, तोफ फिरविण्याची जागा इत्यादी गोष्टी पाहून आपण दक्षिणेतील घळीतून खाली उतरतो. ही उतरणसुद्धा थोडी जोखमीचीच, पण मजेशीर, एक वेगळा अनुभव देणारी. संध्याकाळ झालेली असते. सूर्य मावळतीकडे झुकलेला असतो. लोहगडाची सावली विसापूरचं चुंबन घेत असते आणि आपण लोहगडाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतो... आजचा मुक्काम लोहगडावरच! .... सकाळ. आज ट्रेकचा शेवटचा दिवस. मनात परतीचे वेध लागलेले असतात. आज आपण लोहगड पाहणार आहोत. शिवकालात सुरतेची लूट येथेच ठेवून महाराज राजगडाकडे प्रस्थान करते झाले. सातवाहन - बहामनी - निजामशहा - आदिलशहा - मराठे - मुघल - मराठे - मुघल - कान्होजी आंग्रे - पेशवाई अशी राजवटींची श्रृंखला अनुभवलेला हा किल्ला अखेर तोफेचा एकही गोळा न फेकता निमूटपणे इंग्रजांच्या हवाली झाला. या गडावरील लोमेश ऋषींची गुहा, चार दरवाजे, विंचू काटा या काही उल्लेखनीय वास्तू. असा हा लोहगड पाहून आपण लोणावळ्याच्या दिशेने निघतो.&lt;br /&gt;- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट।&lt;br /&gt;&lt;a href="mailto:yhai_malad@rediffmail.com"&gt;yhai_malad@rediffmail.com&lt;/a&gt;&lt;br /&gt;(साभार ः सकाळ)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-2122211476278515025?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/2122211476278515025/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=2122211476278515025' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/2122211476278515025'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/2122211476278515025'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2010/01/blog-post_8537.html' title='ट्रेक सह्याद्री...'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-9220069964292223325</id><published>2010-01-30T22:42:00.000-08:00</published><updated>2010-01-30T22:43:50.504-08:00</updated><title type='text'>रामसेज, वाघेरा, खैराई</title><content type='html'>रामसेज, वाघेरा, खैराई&lt;br /&gt;&lt;br /&gt;नाशिक पेठ रस्त्यावरच्या जकात नाक्‍यापुढे आशेवाडी गाव आहे. आतिथ्यशील गावकऱ्यांच्या आशेवाडीत मारुतीचं प्रशस्त मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारून छोटेखानी रामसेज किल्ल्यावर चढाई करता येते. आशेवाडीच्या दिशेला दिसणारा रामसेजचा बुधला डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर रामसेज किल्ल्यावर चढणाऱ्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी वर चढून आल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी रामाचं मंदिर आणि थंडगार पाण्याची टाकी आहे. मारुती ते राम, हे अंतर आहे फक्‍त एका तासाचं! रामसेज गडमाथ्यावर कोरडी पाण्याची टाकी, पडक्‍या जोत्याचे अवशेष आहेत. माथ्यावर सुस्थितीत असलेलं मंदिर आहे. त्यात वा रामाच्या मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते. आशेवाडीकडला बुधला व त्याजवळच ध्वजस्तंभ ही गडफेरीत करण्याची इतर ठिकाणं. रामसेजवरून समोर प्रशस्त भोरगड दिसतो. संरक्षण यंत्रणांची रडार सिस्टिम असल्याने भोरगडावर मात्र आपल्याला प्रवेश नाही. दिसायला छोटा असणाऱ्या रामसेजवर मोठा इतिहास घडलेला आहे. मुघलांविरुद्ध तब्बल पाच वर्षं या किल्ल्याने टिकाव धरला होता. एकेक किल्ला असा पाच वर्षं लढवण्याच्या क्षमतेतच स्वराज्याचं सामर्थ्य दडलं होतं. रामसेजवरून पुन्हा नासिककडे येताना म्हसरूळनजीक जैन चांभारलेणी आहेत. वेळ असल्यास ती जरूर पाहून घ्यावीत. म्हसरूळकडून एक रस्ता थेट वाघेऱ्यापर्यंत जातो. वाघेरा घाटमाथ्यावरचं गाव आहे. गावाच्या समोरच एक मोठा बंधारा व जलाशय आहे. जलाशयाच्या पाठी उभा आहे उंच वाघेरा. वाघेऱ्याचे कडे थेट घाटाखाली उतरलेले आहेत. धरणाच्या पाण्यावर व सुपीक जमिनीवर शेती करणाऱ्या गावकऱ्यांना वाघेरा किल्ल्याचा रस्ता विचारायचा. वाघेरा जलाशयाचा बांध उजवीकडे जिथे वाघेऱ्याच्या सोंडेला चिकटलेला वाटतो, त्या डोंगरधारेवरून गडावर चढाई करायची. घाटाखाली उतरलेल्या गडाच्या उंचच उंच कातळभिंती उजवीकडे ठेवत गडाची माची गाठायची. पाठीवर सामान नसल्यास माची गाठायला एक तास पुरे. माचीवरून वाघेऱ्याचा उंच सुळकेवजा उंचवटा, गडमाथा दिसतो. दहा-एक मिनिटांच्या सोंडेवरील सपाट चालीनंतर गडाच्या सुळकेवजा गडमाथ्याला भिडायचं. इथे पाण्याची कोरडी टाकी आहेत. इथून गडमाथा गाठायला दोन वाटा आहेत. गडमाथा डावीकडे ठेवत वळसा घालून चढणारी निसरडी वाट अथवा सोपं 10 फुटांचं प्रस्तरारोहण करून सरळ वर चढणारी कातळाची वाट. कोणत्याही वाटेने गडाचा सुळकेवजा माथा गाठायचा. तिथे उघड्यावर शिवलिंग आहे. फडकणाऱ्या भगव्या झेंड्याबरोबर गड सर झाल्याबद्दल ग्रुप फोटो काढायचा. अंजनेरी, ब्रह्मगिरी आणि आजुबाजूच्या परिसरावर नजर फिरवायची आणि परतीला लागायचं. वाघेरा गावातून गडमाथा गाठायला आणि स्थलदर्शनासाठी दोन तास पुरे. गडावर पाणी नसल्याने वा सावलीसाठी झाड नसल्याने सोबत आणलेलं पाणी प्यायचं आणि आल्या वाटेने गड उतरायचा. वाघेऱ्यातून घाट उतरून हरसूल गाठायचं. हरसूवरून ओझरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाणापाडा आहे. ठाणापाड्याला आश्रमशाळेसमोरून खैराई किल्ल्यावर चढाई करायची. निघताना टॉर्च घ्यायला मात्र विसरायचं नाही. खैराई किल्ला फारसा प्रसिद्ध नसलेला, दुर्लक्षित. ट्रेकिंगसंबंधीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही. नासिकचे हेमंत पोखरणकर यांनी त्याबद्दल माहिती पुरवली म्हणून आम्ही हा किल्ला करू शकलो. आश्रमशाळेसमोरून खैराई माचीवरचा माचीपाडा गाठायला पाऊण तास पुरे. माचीपाड्यातल्या गावकऱ्यांचं आतिथ्य स्वीकारून गड चढायला लागायचं. माचीवर पोहोचल्यावर डौलदार, बहरलेलं शेत आपलं स्वागत करतं. संध्याकाळी ते पिवळं शेत सोनेरी दिसू लागतं. माचीच्या टोकाला गडाजवळ दुतर्फा घरं आहेत. लुसलुशीत कोकरांबरोबर फोटो काढून झाले की गड चढायचा. गडाला बऱ्यापैकी तटबंदी आहे. माचीपाड्याकडला बुरुज नाक्‍यासमोर ठेवून चढत राहायचा. अर्ध्या तासाने आपण एका टेपावर येऊन पोहोचतो. इथून बुरुजाकडे तुटलेल्या तटावरून गडावर प्रवेश करता येतो. अथवा बुरूज व गडमाथा उजव्या अंगाला ठेवून गडमाथ्याला वळसा घालून गडाच्या पश्‍चिमेकडून गडावर सोप्या वाटेने प्रवेश करायचा. खैराईचा गडमाथा छोटेखानीच आहे. पण मनाला प्रसन्न वाटतं. गडावर पाण्याची टाकी आहेत. त्यातलं पाणी पावसाळ्यात पिण्यास हरकत नाही. गडाच्या तटावरून गड-प्रदक्षिणा करता येते. गडावर उघड्या मंदिराकडे दोन लहान तोफा पडलेल्या आहेत. मावळतीच्या रंगात गड फारच सुंदर भासतो. मावळणाऱ्या सूर्याला दंडवत घालून अंधार पडण्यापूर्वी माचीपाडा गाठायचा. माचीपाड्यावरून सोप्या वाटेने आल्याप्रमाणे ठाणापाडा गाठायचं. स्वतःची गाडी सोबत असेल व चालणारे भिडू असतील तर एका दिवसात हे तिन्ही किल्ले पाहून मुक्कामाला त्र्यंबकेश्‍वर वा अंजनेरी गाठता येतं. वाघेरा घाटाच्या खालचा खैराई तांत्रिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यात असला तरी भौगोलिकदृष्ट्या तो ठाणे जिल्ह्यात वाटतो. नाशिक त्र्यंबकेश्‍वरच्या आसपासच्या या किल्ल्यांची सफर आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते.&lt;br /&gt;- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट&lt;br /&gt;&lt;a href="mailto:yhai_malad@rediffmail.com"&gt;yhai_malad@rediffmail.com&lt;/a&gt;&lt;br /&gt;(साभार ः सकाळ)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-9220069964292223325?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/9220069964292223325/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=9220069964292223325' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/9220069964292223325'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/9220069964292223325'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2010/01/blog-post_8222.html' title='रामसेज, वाघेरा, खैराई'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-2398752760031274186</id><published>2010-01-30T22:40:00.000-08:00</published><updated>2010-01-30T22:42:04.381-08:00</updated><title type='text'>सहा दिवसांत सह्याद्री सर!</title><content type='html'>सहा दिवसांत सह्याद्री सर!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:180%;color:#000099;"&gt;सह्याद्री म्हटलं की आपल्याला आठवतात घाट आणि खंडाळा-लोणावळा म्हटलं की आठवतात पावसाळी सहली। पण यापलीकडे सह्याद्री आणि खंडाळा-लोणावळा आहेतच की! मुळात खंडाळा-लोणावळा आहेत ते सह्याद्रीच्या कुशीतच... तिथलेच हे सहा दिवस... &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिला दिवस लोणावळ्याजवळचं कार्ला गाव. एकवीरा आईचा डोंगर व त्यापाठी कोरलेली हिनयान पंथाची सर्वोत्कृष्ट लेणी. लेण्यासमोर सोळा कोनांचा स्तंभ उभा आहे. लेण्यातली हत्तीची शिल्पं नजर लागण्याइतकी जिवंत आहेत. लेण्यामधील चैत्यावर दोन हजार वर्षांपूर्वीची लाकडी छात्रावली आहे. एकवीराला बेसकॅम्प असणार आहे. रिपोर्टिंगनंतर नवीन वातावरण रुळण्यासाठी ट्रेकर्स कार्ला लेणी, एकवीरा मंदिर व कार्ला टॉप, जेथून शिरोटा लेकचं सुंदर दर्शन होतं, तिथवर एक छोटा ट्रेक करतील.&lt;br /&gt;दुसरा दिवस कार्ल्यापासून पाच किमी अंतरावर भाजे लेणी आहेत. इस पूर्व 250 मधली ही लेणी महाराष्ट्रातली आद्य लेणी आहेत. ऐरावतावरील इंद्र व चार घोड्यांच्या रथावरील सूर्य यांच्या प्रतिमा लेण्यात कोरल्या आहेत. भाजे लेणी पाहून आपण जाणार आहोत ते विसापूर किल्ल्यावर. प्रचंड विस्तार असणारा हा किल्ला आहे. लांबलचक तटबंदी व तटावर जागोजागी कोरलेले संरक्षक मारुती हे या गडाचं वैशिष्ट्य. गडावर जमिनीवर बांधलेला गोलाकार बुरुज आहे. विसापूर उतरून आपण लोहगडवाडीत येणार. तेथून पायऱ्यांच्या वाटेने गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा व शेवटी महादरवाजा असं करत आपण गडावर येऊन पोहोचू. लोहगडाचं मुख्य आकर्षण आहे ते विंचूकाटा. दुहेरी तटबंदी असणारी ही माची. दोन्ही बाजूस गर्द झाडी असणारी. गडावरील लोमेश ऋषीच्या गुहेत आपण मुक्काम करणार आहोत.&lt;br /&gt;तिसरा दिवस आज आपण लोहगड उतरायचा. पवना धरण पाहून लोणावळ्यात यायचं. तेथून पुढे खंडाळ्याची वाघदरी पाहायची आणि कुणे गावात यायचं. कुणे गाव दरीच्या तोंडावर वसलं आहे. तेथून खंडाळा घाट आपल्याला सतत खुणावत राहतो. आजचा मुक्काम कुणे गावात खंडाळ्याच्या कुशीत.&lt;br /&gt;चौथा दिवस कुणे गावातून पाच तासांचा ट्रेक करून आपण पोहोचतो राजमाचीला. राजमाचीला दोन बालेकिल्ले आहेत. पूर्वेकडला श्रीवर्धन, तर पश्‍चिमेकडला मनरंजन. ते आपण उद्या पाहणार आहोत. आज आराम करायचा. संध्याकाळी राजमाचीच्या तळ्यावरील मंदिराकडून सूर्यास्त पाहायचा. हे मंदिर अलीकडेच गावकऱ्यांनी उत्खनन करून शोधून काढलं आहे. आजचा मुक्काम राजमाचीकरांच्या घरात.&lt;br /&gt;पाचवा दिवस श्रीवर्धन व मनरंजन आणि त्यामधोमध आहे बहिरोबाचं मंदिर. उठेवाडीतून सोप्या वाटेने मनरंजनवर चढायचं. इथे पाण्याची टाकी, जोत्यांचे अवशेष दिसतात. इथून कर्नाळा, प्रबळगड, इर्शाल, ठाक हे किल्ले दिसतात. मनरंजन पाहून बहिरोबाच्या मंदिराकडून श्रीवर्धन चढायचा. याची उंची मनरंजनपेक्षा जास्त आहे. शाबूत असणारी तटबंदी. टोकांकडले दुहेरी तट असणारे चिलखती बुरुज व पाण्याची असंख्य टाकी. राजमाची पाहून झाला की संध्याकाळी पुन्हा तलावाकडे यायचं ते ट्रेझर हंटसाठी. आजचा मुक्काम राजमाचीवरच.&lt;br /&gt;सहावा दिवस आज सकाळीच राजमाची उतरायला लागायचं ते उल्हास व्हॅलीच्या बाजूला. खाली दिसणारी उल्हास, नदीसमोर दुसऱ्या अंगाला खंडाळा घाटातलं ठाकूरवाडी स्टेशन. तीन तासांत आपण पोहचतो ते कोंडाणा लेण्यांकडे. आठ चैत्यविहार असणारी कोंडाणे लेणी इतकी सुबक आहेत की लाकडात कोरीव काम केल्याप्रमाणे भासतात. पिंपळपानाच्या आकाराची लेण्याची कमान खूपच सुंदर आहे. लेण्यांकडून तासाभरात कोंदीवडे गावात पोहचायचं. तिथे आपला पदभ्रमणाचा कार्यक्रम संपतो. तिथून रिक्षाने कर्जत स्टेशन गाठायचं&lt;br /&gt;मधुकर धुरी, YHAI मालाड युनिट&lt;br /&gt;&lt;a href="mailto:yhai_malad@rediffmail.com"&gt;yhai_malad@rediffmail.com&lt;/a&gt;&lt;br /&gt;(साभार ः सकाळ)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-2398752760031274186?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/2398752760031274186/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=2398752760031274186' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/2398752760031274186'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/2398752760031274186'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2010/01/blog-post_8155.html' title='सहा दिवसांत सह्याद्री सर!'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-4353240818043563187</id><published>2010-01-30T22:38:00.000-08:00</published><updated>2010-01-30T22:39:59.024-08:00</updated><title type='text'>महाराष्ट्रातील आद्य लेणी</title><content type='html'>महाराष्ट्रातील आद्य लेणी&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:180%;color:#000099;"&gt;लोणावळ्याच्या पुढच्या स्टेशनावर, मळवलीला उतरलात, तर एक वेगळाच ट्रेक अनुभवायला मिळतो... हा आहे लोहगड-विसापूर-कार्ले-भाजे ट्रेक... मळवलीच्या एका अंगाला आहेत कार्ल्याची लेणी, तर दुसऱ्या अंगाला भाज्याची लेणी आणि लोहगड-विसापूरची जोडगोळी...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईहून पुण्याला आपण अनेक वेळा जातो. लोणावळा हे तर पावसाळ्यातलं आपलं आवडतं ठिकाण असतं. पण लोणावळ्याच्या पुढच्या स्टेशनावर, मळवलीला उतरलात, तर एक वेगळाच ट्रेक अनुभवायला मिळतो... हा आहे लोहगड-विसापूर-कार्ले-भाजे ट्रेक... मळवलीच्या एका अंगाला आहेत कार्ल्याची लेणी, तर दुसऱ्या अंगाला भाज्याची लेणी आणि लोहगड-विसापूरची जोडगोळी. हिनयान पंथाची सर्वोत्कृष्ट लेणी म्हणून कार्ल्याच्या लेण्यांचा उल्लेख करावा लागेल. या लेण्यांमध्ये मुळात चैत्यगृहाच्या समोर दोन सोळा कोनांचे स्तंभ होते. त्यापैकी एक स्तंभ संपूर्ण तुटला आहे, नाहीसा झाला आहे. हे दोन्ही स्तंभ सारखे होते. जो एक स्तंभ आता तिथे शिल्लक आहे, त्या स्तंभाच्या वर चार सिंहांचं शिल्प आहे. लेण्यांमध्ये जिवंत वाटतील अशी हत्तींची पूर्णाकृती शिल्पं आहेत. अनेक दानशूर, युगुलांची शिल्पं लेण्यात कोरली आहेत. चैत्यावर दोन हजार वर्षांपूर्वीची लाकडाची छत्रावली आहे. लेण्यात प्रवेश करण्यापूर्वी प्रसिद्ध एकवीरा देवीचं मंदिर आहे. नवस करण्यासाठी व फेडण्यासाठी आगरी-कोळ्यांची व भक्तांची तिथे सतत रीघ लागलेली असते. कार्ले लेण्याच्या समोर विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी भाज्याची लेणी आहेत. ही लेणीसुद्धा हिनयान पंथी आहेत. महाराष्ट्रातली आद्य लेणी म्हणून भाज्याच्या लेण्यांचा गौरव होतो. इसवीसनापूर्वी 240मध्ये ही लेणी खोदली असावीत. चैत्यगृहाचे कलते खांब व लाकडी फासळ्या येथे पहावयास मिळतात. ऐरावतावरील इंद्र व चार घोड्यांच्या रथावरील सूर्य यांच्या प्रतिमा लेण्यात कोरल्या आहेत. लेण्याजवळ व लेण्याला जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात अनेक धबधबे असतात. पुणेरी पर्यटक या धबधब्यांवर गर्दी करतात. भाजे गावातून गाय खिंडीपर्यंत चढावाची बैलगाडीची वाट आहे. गायखिंडीतून उजवीकडे लोहगड, तर डावीकडे विसापूर किल्ल्यावर जाता येतं. डावीकडच्या वाटेने पंधरा मिनिटं चाललं की सरळ जाणारी मोठी वाट सोडून द्यायची. सरळ वाट बोडसे लेण्याकडे जाते. वरती डावीकडे विसापूरची तटबंदी दिसत असते. वाहणाऱ्या पाण्यातून पुढे सरकणारी घसरड्या दगडांची ही वाट वर चढते. चढायला साधारण अर्धा तास पुरे... विसापूरच्या माथ्यावर प्रचंड, विस्तीर्ण पठार आहे. लांबच लांब सरळ गेलेली तटबंदी, जागोजागी तटावर कोरलेले संरक्षक मारुती हे या गडाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. गडावर एक गोलाकार बुरुज आहे. त्यावर पूर्वी तोफ असावी. वर उल्लेख केलेल्या वाटेव्यतिरिक्त मळवलीकडून दोन वाटा गडावर चढून येतात. आल्या वाटेने विसापूर उतरून लोहगड वाडीत यायचं. लोहगडपर्यंत अलीकडे डांबरी सडक आली आहे. लोहगडवाडीतून पायऱ्यांच्या वाटेने लोहगड चढू लागलो की गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि शेवटी महादरवाजा असे आखीव-रेखीव दरवाजे आपल्याला लागतात. गडाचं मुख्य आकर्षण त्याचा विंचुकाटा आहे. दुहेरी तटबंदी असलेली ही माची उतरत जाते. माचीच्या टोकाकडल्या बुरुजाकडून विहंगम दृश्‍य दिसतं. माचीच्या तटावरून चालताना खालची दाट झाडी आपली साथ करते. सुरतेच्या पहिल्या लुटेच्या वेळी आणलेला खजिना लोहगडावरील लक्ष्मी कोठीत आला होता. इथल्या लोमेश ऋषींच्या गुहेत मुक्काम करण्याची मजा काही औरच आहे. कोकणावर विजय मिळवू इच्छिणाऱ्या मुघलांच्या सैन्याला, कारतलबखानाला लोहगडापाशी उंबरखिंडीत गाठून महाराजांनी खानाचा सपशेल पराभव केला होता. मळवलीहून लोहगडाच्या बाजूने मोठ्या मिजाशीने खानाचं सैन्य गेलं होतं कोकण जिंकायला. चारीमुंड्या चीत होऊन नामुष्कीचा पराभव कारतलबखानाच्या नशिबी आला. या पराक्रमाची गाथा कल्पनेत अनुभवण्यासाठी हा ट्रेक करायला हवा.&lt;br /&gt;- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल, मालाड युनिट&lt;br /&gt;&lt;a href="mailto:yhai_malad@rediffmail.com"&gt;yhai_malad@rediffmail.com&lt;/a&gt;&lt;br /&gt;(साभार ः सकाळ)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-4353240818043563187?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/4353240818043563187/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=4353240818043563187' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4353240818043563187'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4353240818043563187'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2010/01/blog-post_3184.html' title='महाराष्ट्रातील आद्य लेणी'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-3865264077027870781</id><published>2010-01-30T22:31:00.000-08:00</published><updated>2010-01-30T22:38:03.570-08:00</updated><title type='text'>नाच रे मोरा...!!</title><content type='html'>नाच रे मोरा...!!&lt;br /&gt;"नाचरे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच!' लहानपणापासून कित्येक वेळा आपण हे गाणं ऐकलेलं असतं। मग कधीमधी राणीच्या बागेत आपण त्याला प्रत्यक्ष पाहिलेलं असतं. तेव्हापासून मोर आपल्या मनामध्ये घर करून बसलेला असतो. पूर्वी गावागावांत माळरानावर हमखास दिसणारा मोर अलीकडे मात्र सहज दिसेनासा झाला. गावाकडे मोराला हमखास बघायचं असेल, तर तुम्हाला यावं लागेल ते पुणे जिल्ह्यातल्या मोराच्या चिंचोलीला. पुण्याच्या ईशान्येला 50 कि.मी. अंतरावर एक अनोखं गाव वसलंय, ज्याचं नाव आहे मोराची चिंचोली. पुणे-नाशिक रस्त्याच्या राजगुरुनगर वा पुणे-नगर रस्त्यावरच्या शिक्रापूर इथून मोराच्या चिंचोलीला जाता येतं. मोराचं संरक्षण व संवर्धन करण्याचं काम या परिसरातल्या गावकऱ्यांनी मनापासून केलं. त्यामुळे या परिसरात मोरांची संख्या एवढी वाढली, की एका माणसामागे एक मोर, अशी परिस्थिती झाली. शेकडोने मोर पाहायला मिळत असल्याने पर्यटनाच्या नकाशावर मोराची चिंचोली प्रसिद्ध पावते आहे. चिंचोलीमध्ये चिंचेची भरपूर झाडं आहेत. सकाळी जरा उजाडलं, काळोख सरून दिसायला लागलं, की झाडांच्या शेंड्यावरून मोर खाली उतरतात. सकाळी सहा ते आठ हा मोर बघायला सर्वोत्तम काळ. शिवारात जिथे नजर टाकाल तिथे मोर आणि लांडोर दिसतात. पर्यटकांच्या सोयीसाठी "जय मल्हार कृषी विकास प्रतिष्ठान' यांनी विशेष सोय केली आहे. एका मोठ्या चौथऱ्यावर मोरांसाठी दाणे टाकलेले असतात. तिथे एकाच जागेवर अनेक मोर आपल्याला पाहायला मिळतात. शिवारात सर्वत्र मोर फिरत असतात; मात्र त्यांच्या फार जवळ जाता कामा नये, नाहीतर ते पळून जातात. साधारण 40 ते 50 फुटांवरून तुम्ही त्यांचं निरीक्षण करू शकता. एवढ्या अंतरावरून फोटो काढण्यासाठीचा कॅमेरा तुमच्याकडे हवा. उन्हं वर चढू लागली, की मोर पुन्हा दिसेनासे होतात. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी मोराच्या चिंचोलीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये ग्रामीण जीवनाचा अनुभव शहरी पर्यटकांना घेता यावा यादृष्टीने विविध देखावे आणि वस्तू मांडल्या आहेत. चिंचोलीच्या ओढ्याकाठच्या उद्यानात झोपाळ्यावर तुम्ही उंचच उंच झोके घेऊ शकता. बमी ब्रीजवर चालू शकता, बैलगाडीतून रपेट मारू शकता. पुन्हा संध्याकाळी चिंचोलीतल्या तळ्यावर मोरांच्या पाठी हिंडू शकता. मोराच्या चिंचोलीहून परत आल्यावर मात्र इतर चार लोकांना त्याबाबत सांगा, त्यामुळे इथल्या पर्यटनाला चालना मिळेल. मोराच्या चिंचोलीइतकंच अनोखं अजून एक अप्रूप इथून जवळच आहे. कुकडी नदीच्या पात्रातील रांजणकुंड. कुकडी नदी ही पुणे व नगर जिल्ह्याची सीमा आहे. नगर जिल्ह्यांत निघोज व पुणे जिल्ह्यातलं टाकळीहाजी या नदीच्या तीरावरील गावांदरम्यान नदी पात्रात अनेक रांजणकुंडं निर्माण झाली आहेत. नदीच्या पाण्याबरोबर गोल गोल फिरून छोटे छोटे दगड मोठ-मोठ्या रांजणाच्या आकाराचे खळगे तयार करतात. त्यात पाणी घुसळून घुसळून त्याचा आकार मोठा होत जातो. मग दोन बाजूबाजूचे रांजण खड्डे एकमेकांना छेदतात व मोठा रांजण तयार होतो. त्यातून वाहणारं निळंशार पाणी व किनाऱ्यावरील मंदिर आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातं. मुद्दाम पाहावं असं हे ठिकाण आहे. मोराची चिंचोली व रांजणकुंडं बघून झाली, की रांजणगावचा गणपती जवळच आहे. गणरायाचं दर्शन करायचं आणि सरत्या दिवसाच्या स्मृती जागवत आपापल्या गावी प्रस्थान करायचं.&lt;br /&gt;- मधुकर धुरी युथ हॉस्टेल मालाड &lt;a href="mailto:yhai_malad@rediffmail.com"&gt;yhai_malad@rediffmail.com&lt;/a&gt;&lt;br /&gt;(साभार ः सकाळ)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-3865264077027870781?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/3865264077027870781/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=3865264077027870781' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/3865264077027870781'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/3865264077027870781'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2010/01/blog-post_4549.html' title='नाच रे मोरा...!!'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-4098046929942006055</id><published>2010-01-30T22:30:00.000-08:00</published><updated>2010-01-30T22:31:42.324-08:00</updated><title type='text'>मालवण</title><content type='html'>मालवण&lt;br /&gt;माझा जन्म कुडाळचा. त्यामुळे कोकणाबद्दल, त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल मला विशेष प्रेम. युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या गोवा राज्य शाखेने आयोजित केलेल्या फॅमिली कॅम्पिंगसाठी चार दिवस गोव्यात होतो. येताना चार दिवस मालवणला मुक्काम केला. मालवणात राहून पाहता येतील अशा ठिकाणांची ही तुमच्यासाठी ओळख...&lt;br /&gt;मालवणची भौगोलिक रचना खास आहे. पश्‍चिमेला अथांग अरबी समुद्र. पूर्वेला कासारटाक्‍याची घाटी. उत्तरेला गड नदीची खाडी, तर दक्षिणेला कर्ली नदीची खाडी. या दोन्ही नद्या समुद्राला मिळण्याआधी समुद्राला समांतर वाहतात. त्यातून जमिनीची एक चिंचोळी पट्टी तयार झाली आहे. शंभरएक मीटर रुंदीची. या चिंचोळ्या पट्टीच्या पश्‍चिमेला आहे समुद्रकिनारा, तर पूर्वेला नदी किनारा. एका बाजूला समुद्राची गाज, तर दुसऱ्या बाजूला माडांच्या बनातून वाहणारी शांत नदी. कर्ली नदीच्या चिंचोळ्या पट्टीत तारकर्ली वसलंय. नदीच्या मुखाजवळ आहे देवबाग, तर समोरच्या किनाऱ्यावर आहे भोगवे. गडनदीच्या पट्टीतलं गाव तोंडवळी, मुखाजवळ आहे तळाशील आणि दुसऱ्या किनाऱ्यावर वसलंय रेवंडी. मालवणच्या दक्षिणेला सात किलोमीटरवर आहे तारकर्ली. लांबच लांब विस्तीर्ण समुद्रकिनारा तारकर्लीला लाभलेला आहे. एमआयडीसीने तारकर्लीला प्रसिद्धी मिळवून देण्यात विशेष हातभार लावलाय. तारकर्लीपासून पाच किलोमीटर दक्षिणेला असणाऱ्या देवबागपर्यंत कर्ली नदी समुद्राला भेटायला वाहत येते. तारकर्ली ते देवबाग गाडीरस्ता उपलब्ध आहे. देवबागला बोटीत बसायचं आणि कर्ली नदी समुद्राला मिळते त्याच्या दुसऱ्या किनाऱ्यावर असणाऱ्या भोगवे बीचवर उतरायचं. देवबाग भोगवे सफरीदरम्यान शेकडो सीगल पक्षी तुम्हाला पाहायला मिळतात. भोगवे किनारा पाहून झाला, की पुन्हा बोटीत बसायचं, निघायचं निवतीकडे. समुद्रकिनारी टेकडीवर निवतीचा किल्ला आहे बीचला लागूनच. निवती, भोगवे दोन्ही समुद्रकिनारे अतिशय रमणीय व सुंदर आहेत. देवबागहून बोटीने या किनाऱ्यांना भेट देण्यात विशेष मजा आहे. या बोट सफरीचं अजून एक आकर्षण आहे, ते म्हणजे डॉल्फिन. निवतीजवळच्या समुद्रात डॉल्फिन हमखास बघायला मिळतात आणि देवबागचे बोटवाले तुम्हाला डॉल्फिन दाखविल्याशिवाय हार मानत नाहीत. मात्र तुम्ही नेमकी वेळ गाठायला हवी आणि थोडीफार नशिबाने साथ द्यायला हवी. तीन-चार तासांच्या या सफरीचं 10 जणांचं मिळून 800 रु. भाडं आहे. तुमचे स्वतःचे 10 जण नसतील, तर मात्र दरडोई अधिक खर्च सोसायची तयारी हवी. देवबाग, तारकर्ली करीत कर्ली नदीतून लक्ष्मीनारायणाचं सुप्रसिद्ध मंदिर असणाऱ्या वालावलपर्यंत जर तुम्हाला बोटिंग करण्याची संधी मिळाली, तर मात्र सोन्याहून पिवळं; पण त्यासाठी योग्य ती किंमत मोजायची तयारी हवी. देवबागची नदी व समुद्रकिनारा दृष्ट लागण्याइतका स्वच्छ व नितळ पाण्याचा आहे. देवबाग कर्ली नदीइतकाच सुंदर किनारा आहे तळाशील गड नदीचा. गड नदी समुद्राला भेटायला येते ती तोंडवलीपासून. तळाशीलपर्यंत समुद्राला समांतर वाहते. मालवण, हडी, तोंडवली, तळाशील असा गाडीरस्ता उपलब्ध आहे. नदीच्या एका बाजूला तोंडवली, तळाशील, तर दुसऱ्या बाजूला ओझर, रेवंडी, कोळंब आहे. ओझरची ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे. ओझरजवळ आहे रेवंडी. मालवणचा सुपुत्र "वस्त्रहरण'कार मच्छिंद्र कांबळींचं गाव. गावात भद्रकालीचं मंदिर आहे. रेवंडीतल्या तरीवरून तळाशीलला बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तळाशीलची मच्छिमारांची वस्ती संपली, की बांद्याच्या पुढे ओसाड बेट आहे. त्यावरून गड नदीच्या मुखाचं सुंदर दर्शन होतं. रेवंडीतूनसुद्धा गड नदी समुद्राला मिळते ती जागा बघण्यासारखी आहे. तोंडवळीचा सुरूचा किनारा, तळाशीलचा माडांच्या चिंचोळ्या पट्टीचा किनारा खास बघण्यासारखा. खुद्द मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्याबरोबरच बघण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. तिथला मासळीबाजार, अनेक मंदिरं, रॉक गार्डन, चिवळा आणि त्याला लागून असलेला कोळंबचा समुद्रकिनारा अशा ठिकाणी सहज जाता येतं. महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेलं मालवण गाव. इथे येऊन सिंधुदुर्ग किल्ला न पाहिला तर काय पाहिलं? मालवणच्या जेटीवरून किल्ल्यात जायला बोटी उपलब्ध आहेत. राजाराम महाराजांनी स्थापन केलेलं महाराजांचं मंदिर, फांदी असणारं माडाचं झाड, दुधबाव, दहीबाव, महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा, राणीची वेळा इत्यादी पाहताना वेळ कसा पटकन निघून जातो. मालवणला रेल्वे स्टेशन नाही. रेल्वे पकडण्यासाठी कुडाळला जावं लागतं. मालवणहून कुडाळला जाताना रस्त्यात धामापूर लागतं. धामापूरचा तलाव मन प्रसन्न करणारा आहे. तलावात बोटिंगची सोय आहे. झाडीभरला हा तलाव नुसत्या दर्शनानेच तुम्हाला ताजतवानं करतो. आठवडाभराची सुट्टी असेल, तर मालवणनंतरचा मुक्काम करायचा सावंतवाडी अथवा वेंगुर्ल्याला. त्याशिवाय देवगड अथवा कणकवली असासुद्धा पर्याय आहे. आठवड्याची सुट्टी नसली, तर कोकण रेल्वे आहेच तुम्हाला झटपट मालवणला पोहोचायला. मगे येतालास ना? येवा, कोकण आपलाच आसा!&lt;br /&gt;- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल, मालाड युनिट. &lt;a href="mailto:yhai_malad@rediffmail.com"&gt;yhai_malad@rediffmail.com&lt;/a&gt;&lt;br /&gt;(साभार ः सकाळ)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-4098046929942006055?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/4098046929942006055/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=4098046929942006055' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4098046929942006055'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4098046929942006055'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2010/01/blog-post_8980.html' title='मालवण'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-4259753885089258726</id><published>2010-01-30T22:29:00.000-08:00</published><updated>2010-01-30T22:30:46.958-08:00</updated><title type='text'>"राना'तली "सई'</title><content type='html'>"राना'तली "सई'&lt;br /&gt;मुंबईच्या जवळ असणाऱ्या उरणला पाणी कोठून येतं ठाऊक आहे? उत्तर आहे रानसई. पण पोहोचायचे कसे तिथे...? मुंबई-पनवेल मार्गे सकाळीच कर्नाळ्याच्या अभयारण्यात यायचं. इथल्या फॉरेस्ट चौकीवर प्रवेश फी भरून रानसईला जाणारी वाट विचारून घ्यायची आणि पुढे चालायचं. अभयारण्याच्या बसस्टॉपवर कर्नाळा किल्ल्याच्या विरुद्ध दिशेला रस्ता ओलांडायचा. तिथल्या वननिवासाजवळच्या विहिरीशेजारून एक वाट जाताना दिसते. पाचेक मिनिटांत ओढा पार करून ही वाट पठारावर चढू लागते. पठारावर पोहोचल्यावर गोवा हायवेला समांतर चालत राहायचं. अर्ध्या तासाने उजवीकडे रानसई गावाकडे जाणारी वाट पकडायची. कर्नाळ्याहून दोनेक तासात आपण रानसई गावात पोहोचतो. गावातल्या घरात जेवण बनवून देण्याची विनंती करायची आणि निघायचं धरणाकडे. या छोटेखानी धरणाच्या दोन्ही तिन्ही काठांवर पडवळाची व्यापारी पद्धतीने शेती केलेली आढळते. बघावं तिकडे नुसते पडवळाचे मळेच मळे. वाकडे वाटणारे पडवळ सुतळीने दगड बांधून सरळ करायला ठेवलेले दिसतात. शेतकरी होड्या भरून भरून पडवळ धरणाच्या भिंतीकडे घेऊन जात असतात. तिथून ते मुंबई, पनवेलच्या बाजारात जातात. तलावाच्या काठाशी पोहोचल्यावर पोहणे, गळ टाकून तासन तास मासे पकडणे असे उद्योग आपण करू शकतो. दोनेक तासांनी परत जेवण सांगितलेल्या घरात जायचं. सपाटून भूक लागलेली असते. चमचमीत जेवणावर आडवा हात मारायचा. डबे आणले असतील तर संपवून टाकायचे. हलक्‍याशा वामकुक्षीनंतर परतीच्या प्रवासाला निघायचं. कर्नाळा स्टॉपच्या पुढे गोवा हायवेवर कल्हे नावाचं गाव आहे. या कल्ह्यातून रानसईपर्यंत चांगली वाट आहे. थोडासा चढ उतार आणि बहुतांशी पठारावरून जाणारी ही वाट दमछाक करणारी अजिबात नाही. कर्नाळा अभयारण्याची शांतता. एकाकी अनपेक्षित रानसई धरण. चोहोबाजूचे पडवळाचे मळे. रानसई धरणाच्या बॅकड्रॉपवर दिसणारा कर्नाळ्याचा सुळका. कल्ल्याच्या पठारावरची वाट. वन डे आऊटिंगसाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे रानसई. कल्हे रानसई वाटेवरून आम्ही बाइक घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. पाऊण रस्ता आम्ही गेलो सुद्धा. पण ते एक दिव्य आहे आणि ते करण्यास मी तुम्हाला सांगणार नाही. पनवेल-उरण रस्त्यावरच्या जासईकडून चिरनेर दिघोडे आणि तिथून रानसई असा प्रवाससुद्धा करता येतो. तर अशी ही रानातली सई, जरूर भेट द्यावी अशी...&lt;br /&gt;- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट।&lt;br /&gt;(साभार ः सकाळ)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-4259753885089258726?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/4259753885089258726/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=4259753885089258726' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4259753885089258726'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4259753885089258726'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2010/01/blog-post_30.html' title='&quot;राना&apos;तली &quot;सई&apos;'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-1767282111808746667</id><published>2010-01-30T22:21:00.000-08:00</published><updated>2010-01-30T22:29:32.690-08:00</updated><title type='text'>गंगाद्वारावरचा "ब्रह्मगिरी'</title><content type='html'>गंगाद्वारावरचा "ब्रह्मगिरी'&lt;br /&gt;अंजनेरी, ब्रह्मगिरी पर्वतरांग दोन मोठ्या नद्यांना जन्म देते... वैतरणा आणि गोदावरी. कोकणात वाहत जाणारी वैतरणा नळाद्वारे मुंबईतल्या घराघरापर्यंत पोचते. पवित्र गोदावरी तर दक्षिणेतील फार प्रसिद्ध नदी. नाशिक, पैठण, नांदेड यांसारखी अनेक पुण्यक्षेत्रं तिच्या काठावर वसली आहेत. पहाटे लवकर त्र्यंबकेश्‍वरला यायचं. त्र्यंबकेश्‍वरला यायला नाशिक आणि जव्हारकडून उत्तम रस्ता आहे. कुंभमेळा लागणाऱ्या त्र्यंबकेश्‍वराच्या पवित्र कुशावर्त तीर्थात स्नान करायचं. ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्‍वर महादेवाचं दर्शन करायचं आणि गावापाठी उभ्या असणाऱ्या ब्रह्मगिरीकडे कूच करायची. त्र्यबंकेश्‍वराहून ब्रह्मगिरीकडे जायला प्रशस्त वाट आहे. रस्त्यात मध्येमध्ये लिंबू सरबतवाल्यांची दुकानं आहेत. ब्रह्मगिरीचा शेवटचा कातळ चढण्यासाठी रेलिंग लावलेल्या पायऱ्या आहेत. चढताना माकडांना खायला न दिलेलंच बरं, नाही तर माकडं तुम्हाला चढताना अक्षरशः खिंडीत गाठतात. तुमची झडती घेऊन खाण्याच्या वस्तू लंपास करतात. एखादी काठी सोबत ठेवलेली बरी. ब्रह्मगिरीवरून त्र्यंबकेश्‍वराचं सुरेख दर्शन होतं. ब्रह्मगिरीच्या माथ्यावर एका टोकाला आहे गोवातीर्थ. तिथे गोदामाईची मूर्ती असणारं मंदिर आहे. मंदिराच्या समोर एका कुंडामध्ये गोमुखातून पाणी पडत असतं. हे मंदिर म्हणजे गोदावरी नदीचा मूळ उगम आहे, असा समज आहे. माथ्याच्या वरच्या दुसऱ्या टोकाला आहे शंकराचं मंदिर. शंकराने गुडघे टेकवून इथे जरा आपटले होते म्हणे. गुडघ्याचे दोन खड्डे व जरा आपटल्याच्या दगडावरील खुणा पाहण्यासारख्या आहेत. 4200 फुटांहून अधिक उंच असणाऱ्या या गडावरून हरिहर, बसगड, वाघेरा, अंजनेरी सहज दिसून येतात. याशिवाय ठळकपणे नजरेत भरतो तो अप्पर वैतरणा तलाव. आल्या वाटेने त्र्यंबकेश्‍वरकडे उतरताना डावीकडे गंगाद्वार आहे, ते जरूर पाहण्यासारखं. श्रावणातल्या सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्तांची रीघ लागलेली असते. संत ज्ञानेश्‍वरांचे गुरू व बंधू निवृत्तीनाथांनी त्र्यबंकेश्‍वरलाच समाधी घेतली. ब्रह्मगिरीच्या जवळच असणारा अंजनीपुत्र हनुमानाचा जन्म झालेला अंजनेरी, अप्पर वैतरणा काठचा श्रीघाट तसेच नाशिकची पांडव लेणी इथून जवळच आहेत व मुद्दाम पाहण्यासारखी ही स्थळं आहेत. अंजनेरी, ब्रह्मगिरी, हरिहर, बसगड असा ट्रेकसुद्धा करण्यासारखा आहे.&lt;br /&gt;मधुकर धुरी&lt;br /&gt;युथ हॉस्टेल, मालाड&lt;br /&gt;&lt;a href="mailto:yhai-malad@redeffmail.com"&gt;yhai-malad@redeffmail.com&lt;/a&gt;&lt;br /&gt;(साभार ः सकाळ)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-1767282111808746667?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/1767282111808746667/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=1767282111808746667' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1767282111808746667'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1767282111808746667'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2010/01/blog-post.html' title='गंगाद्वारावरचा &quot;ब्रह्मगिरी&apos;'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-4701026734888410497</id><published>2009-05-01T01:25:00.000-07:00</published><updated>2010-01-31T00:21:55.116-08:00</updated><title type='text'>कोकणची पंचनदी</title><content type='html'>पंचनदी या गावाच्या जेवढा गोडवा आहे तेवढेच हे गाव देखणेही आहे. चारी बाजूंनी हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या बेचक्‍यात वसलेल्या हे शांत, निरागस गाव आपल्याला थेट गो. नी. दांडेकरांच्या, मधू मंगेश कर्णिकांच्या कादंबऱ्यांच्या जगात घेऊन जाते. इथे "अय्या', "इश्‍श' म्हणत झक्क लाजणाऱ्या बायका अजून अस्तित्वात आहेत. बोलण्याच्या ओघात मध्ये मध्ये अस्सल कोकणी भाषा बोलणारे टिपिकल पुरुष आहेत. कॉम्प्युटर, टीव्ही, असल्या वस्तूंचे फारसे कौतुक कोणालाच नाही. इथे दिवेलागणीच्या वेळी अजूनही देवघरातून निरांजने लागतात. मग घरोघरी "शुभंकरोति' खणखणीत आवाजात म्हटले जाते. भजन, कीर्तन, पारावरच्या गप्पा ही अजूनही विरंगुळ्याची साधने आहेत. गावचे प्रशस्त, रमणीय सप्तेश्वराचे मंदिर हे इथले जणू सांस्कृतिक केंद्र आहे. प्रत्येक दिवशी सायंकाळी तिथे सनई लावली जाते. त्याचे मंगल सूर ऐकताना अलौकिक शांतीचा अनुभव येतो. स्वप्नवत वाटते ना हे सारे? पण हे खरे आहे. ज्यांनी नुकतीच पन्नाशी-साठी पार पाडली आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी इथले वास्तव्य हा एक छानसा नॉस्टॉलजिक अनुभव देऊन जाईल आणि मुला-बाळांसाठी हे बनेल एक मामाचे गाव- ज्याची संकल्पनाच हल्ली मोडीत निघाली आहे. पण त्यातली मजा, त्यातला आनंद तुम्ही तुमच्या मुला-नातवंडांसकट येथे अनुभवू शकाल. इथून जेमतेम दोन किलोमीटर अंतरावर कोळथऱ्याचा स्वच्छ, शांत समुद्रकिनारा आहे. अगदी चालत जायचे ठरवले तरी थकवा येणार नाही. कारण गावातले सर्वच रस्ते झाडीचे आहेत. तेही नको असेल तर इथल्या नारळ, सुपारीच्या दाट वाड्यांमध्ये फिरावे, पाटाच्या पाण्याशी खेळावे. त्यातही मज्जा आहे. संध्याकाळी डोंगरावरील झाडीत जाऊन मनसोक्त काळी करवंदे खावीत; काजू, जांभळे, कैऱ्या हा रानमेवाही लुटावा आणि धरणाची वाट धरावी. हे धरणही प्रेक्षणीयच आहे. या धरणाच्या पाण्यामुळे गाव अधिकाधिक सुजलाम्‌ सुफलाम्‌ बनलेले आहे. त्यामुळे भाज्यांचे मळेही नेहमीप्रमाणे तरारले असतात. उन्हाळ्यातही या गावाला भरपूर पाणी असते. या गावच्या नदीचे नावही पंचनदी असेच आहे. कधी या नदीत जाऊन मनसोक्त डुबक्‍या माराव्यात. सर्व हिलस्टेशनवर असलेल्या गर्दीचाच एक भाग बनून तिथल्या वेगवेगळ्या पॉईंट्‌सवर झुंबड उडवणे, वातानुकूलित हॉटेलात लोळत टीव्ही पाहणे आणि त्याच त्याच तेलकट पदार्थांवर ताव मारणे, या नेहमीच्या सुट्टी घालविण्याच्या सरळधोपट कार्यक्रमांना कंटाळला असाल, तर जरूर या गावाला भेट द्या. तेथे श्री. पद्माकर (भाऊ) वैशंपायन यांचा "प्रियश्री अभ्यागताश्रम' आहे. इथे टीव्ही, ए.सी. नाहीत, पण नैसर्गिक गारवा आणि निवांतपणा आहे. इथल्या प्रसन्न वातावरणात भरपूर आराम करून इथला रसरसलेला निसर्ग अनुभवावा. अजूनही इथल्या माणसांमध्ये असलेली घट्ट नात्यांची वीण, त्यातला उबदारपणा तुम्हाला नक्कीच सुखावून जाईल. "प्रियश्री'मध्ये शुद्ध शाकाहारी रुचकर जेवणाची उत्कृष्ट सोय आहे. उकडीचे मोदक, पानग्या, डाळिंब्याची उसळ, केळफुलाची, फणसाची भाजी असले अस्सल कोकणी पदार्थ येथे उदंड; तर बटाटेवडे, कांदा भजी असले झणझणीत पदार्थही मिळतात. तुम्ही फक्त फर्माईश करायची, तुमच्या जिभेचे चोचले इथे तत्परतेने पुरविले जातील. इथून जवळच दाभोळ हे ऐतिहासिक बंदर आहे. गुहेमधील चंडिकामंदिर, दाट सुरूचे बन आणि स्वच्छ समुद्रकिनारा ही येथली वैशिष्ट्ये आहेत. डॉ. भाई मोकल यांनी या बंदरावर सुरू केलेल्या फेरीबोटीच्या फेरीमुळे वेळणेश्‍वर, हेदवी, गुहागर ही ठिकाणेसुद्धा तुम्ही एका दिवसात बघून येऊ शकता. याच बंदरावर डॉ. मोकल यांच्यातर्फे भाड्याने खासगी लॉंच दिली जाते. त्यामुळे समुद्रसफरीचा रोमांचक अनुभवही इथे तुम्हाला मिळू शकतो. इथे घालविलेली आगळीवेगळी सुट्टी तुमच्या नेहमीच आठवणीत राहील. पंचनदी हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्‍यात आहे. दापोलीला आल्यावर दापोली-दाभोळमार्गे जाता येते किंवा दापोली-बुरोडी- पंचनदी या मार्गेही जाता येते. दोन्ही बाजूंनी एसटीच्या गाड्या दर दोन तासांनी आहेत.&lt;br /&gt;डॉ. वैशाली उमेश वैशंपायन दापोली, जि. रत्नागिरी&lt;br /&gt;(साभार ः सकाळ)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-4701026734888410497?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/4701026734888410497/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=4701026734888410497' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4701026734888410497'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4701026734888410497'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2009/05/blog-post.html' title='कोकणची पंचनदी'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-4636000151609671875</id><published>2008-02-06T09:34:00.001-08:00</published><updated>2009-05-01T00:57:56.220-07:00</updated><title type='text'>निसर्गरम्य तळजाई दर्शन</title><content type='html'>पुणे शहरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. परंतु त्याचप्रमाणे शहराच्या उपनगरांतही काही मंदिरे आहेत. सातारा रस्त्यावर असणारे तळजाई मातेचे मंदिर अशापैकीच एक; परंतु या मंदिराचा सातारा रस्त्यापेक्षाही जास्त जवळचा संबंध आहे तो "सिंहगड रस्त्याशी.' कारण सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द गावात कॅनॉललगत असणाऱ्या टेकड्यांवरून हे मंदिर सहज गाठता येते. या भागात घनदाट जंगल पसरले असून, या जंगलातून सफर करणे अप्रतिम अनुभव देते. वन विभागाने जाहीर केलेले हे संरक्षित वनक्षेत्र व पर्यटनस्थळ अजूनही सिंहगड रस्त्यावरील असंख्य पर्यटकांना माहिती नाही. सिं हगड, पानशेत, खडकवासला, यांसारखी अनेक पर्यटन स्थळे पुणेकरांच्या चांगलीच परिचयाची आहेत. परंतु घनदाट जंगलराजीत वसलेले व शहरापासून अगदीच जवळ असणारे प्राचीन तळजाई मातेचे मंदिर फारसे परिचयाचे नसावे. पुणेकरांना हे जवळचे आहेच आणि त्यातही सिंहगड रस्तावासीयांसाठी "रोजच्या मॉर्निंग वॉक'चे एक प्रशस्त व निसर्गरम्य स्थानही आहे. सिंहगड रस्त्यावरील हिंगणे गावातील कॅनॉल पार करून गेले की दृष्टीस पडते ती पर्वती पाचगाव वनक्षेत्राची अफाट डोंगररांग, हिरवे गालिचे पांघरलेली ही डोंगररांग मन मोहून टाकते. या डोंगरांपैकी कुठलाही डोंगर चढून गेले, की सुरू होते हिरवीगर्द वनराई. या वनराईतून मार्गक्रमण करताना विविध दुर्मिळ वृक्षांचेही दर्शन होते. करवंदांच्या जाळ्या मध्येच डोकावत असतात. उन्हाळ्यात बहरलेला गुलमोहर लक्ष वेधून घेतो. याशिवाय विविध वृक्षांच्या असंख्य प्रजाती या वनक्षेत्रात वन विभागाने जाणीवपूर्वक वाढवलेल्या आहेत. आपल्यासारख्या सामान्य पर्यटकाला त्या वृक्षांची माहिती नसते इतकंच. रानफुलांच्या असंख्य प्रजाती, निलगिरीचे उंचच्या उंच झुळके, कडुलिंबाची शीतल छाया, कांचनवृक्ष असे कितीतरी वृक्षप्रकार येथे पाहावयास मिळतात. वृक्षप्रेमींना संशोधनासाठी हेही एक चांगले ठिकाण असू शकते. डोंगर चढून गेल्यावर नजर पोचेल तिथपर्यंत दिसणाऱ्या पुणे शहराच्या पश्‍चिम उपनगरांतील उंच इमारती ठेंगण्या दिसतात आणि वाढत्या शहरीकरणाचे चित्र उभे करतात. परंतु याचबरोबर डोंगराच्या मागे वसलेली पर्वती पाचगावची वनराई निसर्गाचे खरे चित्र उभे करते आणि ते या इमारतींच्या चित्रापेक्षा कितीतरी आल्हाददायक वाटते. सिंहगड रस्तावासीयांना हे ठिकाण तर रोजच्या मॉर्निंग वॉकसाठी अगदी जवळचे आहे. या ठिकाणी अनेक लोक सकाळच्या मोकळ्या प्रसन्न हवेत प्रभातफेरीला येतात, मनसोक्त विहार करतात, व्यायाम करतात व "फ्रेश' होऊन दिवसभराच्या "रुटीनशी' झुंजण्यास सज्ज होतात. सकाळी सात वाजता जरी डोंगर चढायला सुरवात केली, तर पाऊण तासात तळजाईपर्यंत पोचता येते व परतीला तेवढाच वेळ लागतो. पक्ष्यांचा राजा "मोर' हे या वनक्षेत्राचे खास आकर्षण आहे. वनविहार करताना मोरांचे दर्शन हमखास होतेच. मोरांसाठी ठिकठिकाणी धान्य पाणी यांची व्यवस्था आहे. जंगलात थोडेसे आतमध्ये गेल्यास क्वचित "ससे'ही दिसतात. याशिवाय असंख्य पक्ष्यांच्या प्रजाती येथे नजरेस पडतात. वन्यप्राणी मात्र अद्याप तरी येथे दिसलेला नाही. वनक्षेत्रातून फिरत फिरत केव्हा तळजाईचे मंदिर येते कळतही नाही. निसर्गाच्या हिरव्या कुशीत वसलेले तळजाई मातेचे हे मंदिर एक अद्‌भुत अनुभव देते. पालिकेने तळजाई पठारावर क्रीडा संकुलही बांधले आहे. तळजाई मंदिराच्या मागे पवित्र "तळे' असून, त्यावरूनच या देवीला तळजाई असे संबोधले जाते. मंदिराचे व्यवस्थापन थोरात कुटुंबीयांमार्फत पाहिले जाते. तळजाई, वाघजाई आणि पर्वतीपर्यंत पसरलेली ही हिरवीगार वनराई आपल्याला निसर्गाच्या अगदी जवळ नेऊन ठेवते. आपली नेहमीची पर्यटनस्थळे बाजूला ठेवून थोडीशी वाट वाकडी केली, तर तळजाईची वनराई आपल्याला अविस्मरणीय अनुभव देईल हे नक्की.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-4636000151609671875?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/4636000151609671875/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=4636000151609671875' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4636000151609671875'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4636000151609671875'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2008/02/blog-post_2630.html' title='निसर्गरम्य तळजाई दर्शन'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-1357196496347739374</id><published>2008-02-06T05:44:00.001-08:00</published><updated>2009-05-01T01:07:02.178-07:00</updated><title type='text'>कोकणातील गरम पाण्याचे झरे</title><content type='html'>- प्रा. संजीव नलावडे&lt;br /&gt;&lt;br /&gt;पृ थ्वीतलावर आढळून येणाऱ्या भूशास्त्रीय चमत्कारांपैकी एक म्हणजे गरम पाण्याचे झरे वा उन्हेरे (याला कुणी उन्हवरे, उन्हाळे, गरम कुंडे असेही म्हणतात) होत. पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक प्रक्रियांमुळे गरम होऊन झऱ्यांद्वारे भूपृष्ठावर अवतीर्ण होणाऱ्या उष्ण पाण्याच्या उगमस्थानासही विविध नावे दिलेली आहेत. इंग्रजीत यालाच "हॉट स्प्रिंग' वा "थर्मल स्प्रिंग' असे म्हणतात. पावसाच्या जमिनीत खोलवर मुरणाऱ्या पाण्यापासून उन्हेऱ्याची निर्मिती होत असते. अनेक उन्हेरे ज्वालामुखी प्रदेशात आढळतात. अशा प्रदेशात शिलारसाचे वास्तव्य भूपृष्ठालगत खोलीवर, परंतु जमिनीच्या वरच्या थरालगत असते. भूपृष्ठावरील पाणी खडकांच्या फटींमधून खाली झिरपते. असे झिरपणारे पाणी शिलारसाच्या सान्निध्यात येताच तापते, प्रसरण पावते; त्याच्या काही भागाची वाफ होते. हे तापलेले पाणी खडकांमधील नाळींतून भूपृष्ठाकडे ढकलले जाते व उन्हेऱ्याच्या रूपाने बाहेर पडते. बऱ्याचदा अशा पाण्यात खडकांमधील गंधक वगैरेसारखे द्रवपदार्थ विरघळतात. काही उन्हेऱ्यांतून असे गंधकयुक्त पाणी बाहेर येत असते. अशा पाण्यात स्नान केल्याने काही त्वचारोग बरे होऊ शकतात. बहुतेक उन्हेऱ्यांजवळ माणसाने मंदिरे बांधली आहेत. उन्हेऱ्यांना भोवताली भिंत बांधून कुंड स्वरूपात बंदिस्त केले आहे. अशा जागा यथावकाश जत्रा-यात्रांची ठिकाणे व आता पर्यटनस्थळे बनल्या आहेत. महाराष्ट्रात विविध भागांत शोध घेता आतापर्यंत 32 उन्हेऱ्यांच्या जागा आढळून आल्या आहेत. त्यांपैकी जेमतेम आठ उन्हेरे राज्याच्या पठारी भागात आहेत (नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि नांदेड इ. जिल्ह्यांत), बाकी उरलेले सर्व उन्हेरे कोकणात आढळतात. कोकणची वैशिष्ट्यपूर्ण भूशास्त्रीय रचना व इतिहास यास कारणीभूत आहे. कोकणातील उन्हेरे नकाशावर पाहिल्यास ते एका जवळपास सरळरेषेत उत्तर-दक्षिण असल्याचे दिसते. कारण उत्तर-दक्षिण असलेल्या भ्रंश रेषेला धरून हे उन्हाळे आहेत. यातील काही प्रमुख उन्हेऱ्यांचा हा परिचय. गणेशपुरी ः ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्‍यात तानसा नदीच्या पात्रात व काठाने किमान 60 ठिकाणी उष्णोदकाचे उमाळे आहेत. खुद्द गणेशपुरीला श्री नित्यानंद महाराजांचे समाधिस्थानाजवळ व्यवस्थित बांधून काढलेले व लोकमान्यता पावलेले गरम जलकुंड आहे. या परिसराच्या मागच्या बाजूला तानसा नदीचे पात्र आहे. तानसा नदीवरच्या पुलावरून उत्तरेकडे पाहिले असता नदीच्या मध्यातील बेटवजा भाग दिसतो. इथे वडांच्या वृक्षांनी वेष्टित श्री पातालबाबाचे समाधिमंदिर आहे. या बेटावर काही गरम पाण्याची कुंडे आहेत. इथे नदीपात्र उत्तर-दक्षिण आहे. बेटाच्या पल्याड नदीपात्रात उतरून उत्तरेकडे चालत गेल्यास नदीपात्रातच गरम पाण्याचे अनेक झरे आढळून येतात. सगळे मिळून इथे डझनभर तरी झरे असावेत. यापैकी नदीपात्राच्या ऐन मध्यावर एक मोठे कुंड आहे. आसपासच्या सर्व कुंडांमध्ये या कुंडाचे तापमान सर्वाधिक, म्हणजे सुमारे 55 अंश ते 58 अंश सें.ग्रे. असते. त्यामुळे या कुंडास "अग्निकुंड' असे योग्य नाव दिलेले आहे. या कुंडात तांदूळ टाकल्यास भात शिजतो, अशी समजूत असल्याने जागोजागी गरम पाण्याच्या प्रवाहात तांदूळ टाकलेले दिसून येतात. उत्तर दिशा धरून चालत राहिल्यास तानसा नदीच्या पलीकडल्या काठावर आपण पोचतो. इथे रस्त्याच्या पल्याड शिवअनूसया मंदिर आहे. इथे दोन गरम पाण्याची कुंडे असून, त्यापैकी एकाला "अनसूया कुंड' असेच नाव आहे. इथूनच निंबवली- गोरूड रस्त्याने वज्रेश्‍वरीकडे जाणारा रस्ता आहे. मात्र हा रस्ता खराब असल्याने गणेशपुरीला जाऊन मोठ्या चांगल्या रस्त्याने वज्रेश्‍वरीला जावे हे बरे. वज्रेश्‍वरी-भिवंडी रस्ता आणि तानसा नदीच्या दरम्यान अनेक मंदिरे व गरम पाण्याची कुंडे आहेत. वज्रेश्‍वरी बस स्थानकालगत श्री रामेश्‍वर महादेवाचे मंदिर आणि कुंड आहे. जवळच नदीपात्रात चार-पाच कुंडे आहेत. यांना "अकलोली कुंडे' असे म्हणत ात. त्यापैकी सूर्यकुंड आणि चंद्रकुंड प्रसिद्ध आहेत. सातवली ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्‍यात टिकालाजवळ हे विशेष प्रसिद्ध नसलेले उन्हाळे आहे. महामार्गावरूनच डावीकडे (पश्‍चिमेकडे) हिरवागार वृक्षाच्छादित परिसर आणि मंदिरांचे कळस दिसतात. मंदिरे शंकर आणि हनुमानाची आहेत. वांद्री या छोट्या नदीच्या डाव्या तीरावर ही मंदिरे आणि लहान-मोठी डझनभर गरम पाण्याची कुंडे आहेत. यातील तीर्थकुंड सर्वांत उष्ण व महत्त्वाचे आहे. जवळच अगदी साधी धर्मशाळा आहे. अहमदाबाद रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर अंतरावर मुंबईच्या दिशेकडे हाय-वे ढाबा आहे. भोजनाची सध्या तरी ही एकमेव व्यवस्था आहे. उन्हेरे पाली (गणपती) ः खोपोलीजवळचे गणपतीचे पाली हे अष्टविनायकांपैकी एक. खोपोलीकडून पलीकडे जाताना पालीच्या अगदी जवळ पोचलो, की उजवीकडे उन्हेऱ्याची पाटी दिसते. उन्हेरे मुख्य रस्त्यापासून जेमतेम एक किलोमीटर आत आहे. हा परिसर अंबा नदीच्या काठावर आहे. पार्किंगसाठी मोठी विस्तीर्ण जागा आहे. विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराजवळच दोन कुंडे- एक मोठे, एक छोटे- आहेत. जवळच भक्तनिवास आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्नानाची स्वतंत्र सोय असणारा कायमस्वरूपी मंडप आहे. पार्किंग जागेजवळ चहा-नाश्‍त्याच्या टपऱ्या आहेत. जेवणसुद्धा आगाऊ कल्पना दिल्यास तयार करून देतात. पालीला मुक्कामास राहूनही हे ठिकाण साधता येते. सव ः मुंबई-गोवा महामार्ग महाडजवळ जिथे सावित्री नदीला खेटून जातो तिथे नदीपल्याड जो हिरवागार देवराईसारखा परिसर दिसतो तिथे सवची गरम पाण्याची कुंडे आहेत. इथे होडीने नदी ओलांडून पलीकडे जावे लागते. झाडीतून गेलेली पायवाट आपल्याला कुंडापाशी आणून सोडते. कुंडांना लागूनच शाह शैलानी यांचा दर्गा आहे. दर्ग्यातील स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. इथे जानेवारी-फेब्रुवारीत उरूस भरतो. कुंडाचा तळ नारळाच्या खोडांपासून बनवला असून, त्यामुळे कुंडाची खोली कमी झाली आहे. परिणामी, डुंबणे सुरक्षित झाले आहे. आसपास बरीच घरे असून, बहुतेक वस्ती मुसलमान बांधवांचीच आहे. इथे यायला आणखी एक वाट आहे, पण ती लांबची आहे. महाड-आंबेत रस्त्यावरून शेतातून/ बांधावरून गेलेल्या वाटेने सुमारे 15 मिनिटे पायपीट केली की आपण या कुंडाशी येतो. दोन उन्हवरे ः 1) उन्हवरे (व्हाया पालवणी) ः मंडणगडकडून आतल्या रस्त्याने (पालवणी मार्गाने) दापोलीकडे जाताना जिथे भारजा नदी रस्त्याशी लगट करू पाहते तिथे नदीच्या डाव्या तीरावर चंडकाई, मुकाई आणि वळजाईची एकाकी मंदिरे व जवळच नदीकाठाने उन्हाळे आहेत. नदीकाठाने व लगतच्या डोंगरी भागात भरपूर झाडी असून, नदीच्या काठाने "महाराष्ट्र वृक्ष' म्हणून प्रसिद्ध पावलेल्या तामणाची असंख्य झाडे आहेत. उन्हाळ्यात भेट दिल्यास सुंदर जांभळ्या फुलांची उधळण बघून डोळे सुखावतात. ज्यांना पक्षिनिरीक्षणाची आवड आहे त्यांच्यासाठी ही जागा आदर्श आहे. मुख्य रस्त्याकडून मंदिराकडे जाणारा कच्चा रस्ता (जो थोडा उतरून यावा लागतो) सहजी लक्षात येत नाही. त्यामुळे जरा लक्ष ठेवावे लागते. चंडिकादेवी मंदिराभोवती आसपास बांबूची दाट बने आहेत. कुंड जांभा दगडाने बांधलेले भरभक्कम असून, जवळच ओबडधोबड पिंडी व शेजारी सावली देण्यास सदैव सज्ज असलेला महाकाय आम्रवृक्ष आहे. सर्वांत निसर्गरम्य उन्हेरे, असे याचे वर्णन करता येईल. 2) उन्हवरे (दापोली) ः खेड-दापोली रस्त्यावर पन्हाळे काजी लेण्याकडे जाणारा रस्ता धरावा. पुढे या रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडील फाटा पन्हाळेकाजी लेण्याकडे जातो. डावीकडला उन्हवऱ्याकडे जातो. रस्ता पुढे पुढे उतरत जातो. हा रस्ता आपल्याला थेट फरारीच्या खाडीवर घेऊन जातो. एसटी स्थानकाजवळील मोकळ्या जागेत गाडी लावता येते. दुरूनच जमिनीतून वाफा बाहेर पडत असल्याचे अपूर्व दृश्‍य दिसते. मूळ स्रोत असणारे कुंड डाव्या बाजूला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचे कुंड, असा याचा लौकिक आहे. (तापमान 70 अंश सें.ग्रे.! अबब!!) त्यामुळे या कुंडाकडे सावधतेने जायला हवे. लहान मुलांना (व स्वतःलाही) दूर ठेवावे. पाण्याची (वाफेची धग दुरूनही जाणवते. याच कुंडातले पाणी एका चरातून दुसऱ्या कुंडात नेले आहे. तापमान कमी असल्याने तेथे स्नानाचा आनंद उपभोगता येतो. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी सोय आहे. समोरच्या डोंगरउतारावरील मदरशाची आधुनिक पद्धतीची इमारत पाहून थक्क व्हायला होते. शाळेची इतकी सुंदर इमारत पुण्यालाही नसेल. मुख्य कुंडातून स्रवणारे गरम पाणी आसपासच्या सुमारे एक एकर परिसरात पसरत असल्याने गरम चिखलयुक्त पट्टा तयार झाला आहे. या चिखलात अधूनमधून गाई-गुरे रुतून बसतात व मृत्यूला सामोरी जातात. गरम कुंडाचे पाणी फरारीच्या खाडीला जेथे मिळते तेथे पाण्याचे तापमान 40 अंश सें.ग्रे. आहे. त्याच्या थोड्या वरच्या अंगाला पाण्याचे तापमान 35 अंश सें.ग्रे. आहे. अशा ऊन पाण्यातही शंख-शिंपले, मासे, फिरताना पाहून आश्‍चर्य वाटते. "मुख्य कुंडात अंडी उकडतात, मेलेली कोंबडी सोलण्यापूर्वी या पाण्यात बुडवून ठेवतात, नंतर ती सोलायला सोपी जाते,' इ. माहिती चहावाल्याने पुरवली. या परिसरात सर्व हिंदू व मुसलमान कुंडावर लग्नाचा नारळ फोडतात. तशी प्रथाच या पंचक्रोशीत आहे. या परिसराचा अधिक नियोजनपूर्वक विकास होणे गरजेचे आहे. खाण्याची सुविधा नीटशी उपलब्ध नाही. मुक्कामाचीही सोय नाही. अर्थात खेड वा दापोलीला मुक्काम करून इथे येणे सोपे आहे. (राजापूर) ः राजापूरची गंगा प्रसिद्ध आहे. या गंगातीर्थाच्या रस्त्यावर उन्हाळे आहेत. अर्जुना नदीच्या काठाने ही उन्हाळे आहेत. जवळच श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे. कुंड बंदिस्त आहे. फाट्यापासून 1.5 किलोमीटरवर आहे. तुरळ ः मुंबई-गोवा मुख्य महामार्गावर संगमेश्‍वर तालुक्‍यात राजवाडीजवळ हे कुंड आहे. रस्त्यावर "हॉट स्प्रिंग' नावाचेच हॉटेल आहे. या हॉटेलच्या शेजारून मागे गेलेली पायवाट उन्हाळ्याकडे जाते. जवळ राजगंगा नदी व हॉटेलला लागून वाघजाई चंडिकामाता मंदिरे आहेत. राजवाडी ः चिपळूणकडून गोव्याकडे जाताना सुमारे 40 किलोमीटर अंतरावर डावीकडे राजवाडी फाटा आहे. आत वळताच सुरवातीला राजगंगा नदीवरचा पूल व लगेचच कोकण रेल्वेच्या रुळाखालून पलीकडे राजवाडी आहे. गाव छोटे व टुमदार आहे. गावात गाडी लावून साईबाबांच्या मंदिराजवळून पायऱ्यांची वाट कुंडाकडे जाते. शंकराच्या मंदिराला लागून आमराई व त्याला लागून गरम पाण्याची दोन कुंडे आहेत. शंकराच्या मंदिरातील लाकडी खांब, कमानी व तुळ्यांवरील कोरीव काम बघण्यासारखे आहे. पाच तोंडांची गाय, गंडभेरुंड व हत्ती, वाघाशी तलवारीने लढणारा योद्धा, उंट, दौडणारा घोडेस्वार, आठ मोरांचे गोलाकार अष्टमंडळ, फेर धरून नाचणाऱ्या नर्तिका, कमलपुष्प, डुकराच्या शिकारीचे दृश्‍य, राम-सीता, हनुमान अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. दुर्दैवाने कोरीव कामाला जागोजागी भुंगे लागले आहेत, भोके पडली आहेत. मंदिराचा परिसर निसर्गरम्य, मात्र राहण्या-जेवणाची सोय नाही. अरवली ः गोवा महामार्गावरील गड नदीचा पूल ओलांडला (गोव्याकडे जाताना) की लगेचच डावीकडे हे कुंड आहे. जवळच वरदाई, कालिमाता, केदारनाथाची मंदिरे आहेत. कुंडाचे पाणी फारसे स्वच्छ नाही. कोकणातील सर्वच्या सर्व 22 कुंडे चार दिवसांत पाहणे शक्‍य आहे. मात्र त्यासाठी स्वतःचे वा भाड्याचे वाहन हवे. त्याचा कार्यक्रम असा ः दिवस पहिला ः मुंबईतून प्रवासास सुरवात करावी. अहमदाबाद महामार्गाने पालघर तालुक्‍यातील दहिसर (तर्फे मनोर) गाठावे. हमरस्त्याला लागूनच हलोली येथील पाटीलपाडा आणि पाडोसपाडा कुंडांना भेट देणे. तेथून मुंबईच्या वाटेवर टिकालाजवळ सातवलीला यावे. त्यानंतर मनोरमार्गे पालघरच्या वाटेवरील कोकनेर पाहावे. परत येऊन मनोरला हमरस्ता सोडून वाड्याचा रस्ता पकडावा. वाटेत थोडी वाकडी वाट करून खारिवलीजवळ पिंगेमान येथे वैतरणेच्या पाण्यात बुडलेली कुंडे लांबूनच पाहावीत. पुन्हा हमरस्ता गाठून मांडवी फाट्यावरून गणेशपुरी- वज्रेश्‍वरी जवळ करावे- अर्थात रात्रीच्या मुक्कामासाठी. दिवस दुसरा ः पहाटे लवकर उठून गणेशपुरी, निंबवली, गोराड, अकळोली- वज्रेश्‍वरी परिसरातील गरम पाण्याची कुंडे स्नानकर्मासह व्यवस्थित पाहून घ्यावीत. आसपासची मंदिरे व समाविष्ट स्थाने पाहून होईपर्यंत दुपार उजाडते. इथेच जेवण करून अंबाडीमार्गे टिटवाळ्याला गणेशदर्शन करावे. तेथून मधल्या घाटमार्गाने अंबरनाथ जवळ करून बदलापूर- कर्जतमार्गे खोपोली फाट्यावरून गणपती पालीकडे प्रयाण. उन्हेऱ्याची कुंडे पाहून मुक्कामासाठी पालीस जावे. दिवस तिसरा ः पालीवरून गोवा महामार्गास लागावे व थेट महाड गाठावे. महाड परिसरातील कोंडिवते व सवची कुंडे पाहून महामार्ग सोडून उजवीकडे मंडणगड गाठावे. (दुपारचे जेवण,) उन्हवरे (पालवणी) करून उन्हवरे (दापोली) ला जावे. तेथून खेडला मुक्कामासाठी यावे. गावाबाहेरील मरू घातलेले उन्हवरे पट्टीचे उन्हाळे पाहून गावातच मुक्काम करावा. दिवस चौथा ः पहाटे खेड सोडावे. चिपळूण मार्गाने प्रथम अरवली, नंतर तुरळ, राजवाडी, फणसावणे, मठ (पाण्याखाली) इथली कुंडे पाहून राजापुरास (हॉटेल राजापूर) दुपारचे जेवण घ्यावे. नंतर राजापूर कुंडास भेट द्यावी, की संपला प्रवास।&lt;br /&gt;(साभार सकाळ)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-1357196496347739374?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/1357196496347739374/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=1357196496347739374' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1357196496347739374'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1357196496347739374'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2008/02/blog-post_198.html' title='कोकणातील गरम पाण्याचे झरे'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-193562490601906203</id><published>2008-02-06T05:42:00.000-08:00</published><updated>2009-05-01T01:42:06.075-07:00</updated><title type='text'>शिवथर घळ</title><content type='html'>रामदासस्वामींच्या अनेक घळींपैकी ही सर्वांत महत्त्वाची, भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोक्‍याच्या जागी वसलेल्या या घळीची महती काय वर्णावी? रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवरील घळ, रायगड, राजगड, प्रतापगड, तोरणा (प्रचंडगड) अशा दुर्गश्रेष्ठांच्या सान्निध्यात समान अंतर राखून असलेली. शिवकालीन महाराष्ट्राच्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणे येथून श्री समर्थांना अतिशय सोपे होते. सध्याच्या रायगड जिल्ह्याच्या महाड या मुख्य ठिकाणापासून जेमतेम 25 किलोमीटर अंतरावर, डोंगराच्या बेचक्‍यात वसलेली ही घळ. घळीच्या डोक्‍यावरूनच शिवथर नदीचा प्रवाह अनामिक आतुरतेने कड्यावरून खाली झेप घेतोय, आजूबाजूला सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील जावळीच्या प्रसिद्ध खोऱ्यातील निबीड अरण्य... दिवसा भरदुपारी ज्या भागात सूर्याचे हात पोचत नाहीत त्याबद्दल रात्रीची केवळ कल्पनाच बरी! घळीपासून वरती डोंगरावर एखादा तास पायपीट केल्यावर डोळ्यांसमोर एक सुंदर पठार येते. यावरच जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या वाड्याचे पडीक अवशेषही आहेत. थोडे उजवीकडे शेतांच्या पलीकडे असलेल्या डोंगरावर नजर जाताच शिवथर नदीचा सुरवातीचा प्रवाह धबधब्याच्या रूपात नजरेला सुखावून जातो. घळ खऱ्या स्वरूपात अनुभवण्याचा उत्तम कालावधी पावसाळ्याचा. जुलै ते सप्टेंबर हा. कारण यादरम्यान निसर्ग ऐन भरात असतो. चहूकडे हिरवळ, जलप्रपाताची आसमंतात गर्जून, उरात धडकी भरवणारी गर्जना, अधूनमधून चालू असणारी पावसाची रिपरिप, डोंगरांच्या बेचक्‍यात अडकून पडलेला नाठाळ वारा... माणूस "स्वत्व' हरवून जातो. शिवथर घळीला जाण्यासाठी महाड सर्वांत सोईचे ठिकाण आहे. एसटी महामंडळातर्फे घळीकरता दिवसातून तीन-चार वेळा गाड्या सोडल्या जातात. महाड आगाराची सर्वांत शेवटची एसटी घळीला मुक्कामालाच जाते. सकाळी सात वाजता ती परत महाडला येते. स्वतःचे वाहन असणाऱ्यांसाठी महाडजवळच्या बिरवाडी फाट्यावरून आत वळल्यावर स्थानिक लोकांना विचारल्यास लोक त्वरित मदत करतात. जवळच तीन-चार किलोमीटरवर कुंभे शिवथर नावाचे गाव आहे. घळीची सर्व व्यवस्था "श्री सुंदरमठ सेवा समिती' बघते. समितीच्या वतीने राहण्याची व जेवणाची व्यवस्था विनामूल्य केली जाते. निवासाकरिता कमीत कमी सात दिवस अगोदर पत्रव्यवहार करावा. अन्यथा भाविकांना गैरसोईला तोंड द्यावे लागते. त्यासाठी पत्ता असा- श्री सुंदरमठ सेवा समिती, मु. शिवथर घळ, पो. कुंभेशिवथर, ता. महाड, जि. रायगड. वातावरणाचे आणि स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी पर्यटकांना समितीतर्फे आवाहन करण्यात येते, की केवळ पर्यटनाच्या दृष्टीने न बघता परिस्थितीनुरूप वागावे. स्थळाची शांतता व पावित्र्य अबाधित राखावे. दर वर्षी दासनवमीला येथे मोठा उत्सव करण्यात येतो. मुख्य घळीत, रामदासस्वामी, शिष्य कल्याण व राम-लक्ष्मण-सीता यांच्या मनोहारी मूर्ती आहेत. रामदासस्वामींनी "दासबोध' येथेच पूर्ण केला. अशी ही शिवथर घळ प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी. कसे जाल? जवळचे बस स्थानक महाड- 25 किलोमीटर. महाड-पोलादपूर रस्त्यावर बिरवाडी फाट्यावर डावीकडे वळून आतमध्ये. कालावधी ः पावसाळा (जून ते सप्टेंबर) (उन्हाळा-हिवाळ्यात निसर्गसौंदर्याचा अनुभव कमी.) निवासाकरता अगोदर पत्रव्यवहार आवश्‍यक। - डॉ. मोहित विजय रोजेकर&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-193562490601906203?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/193562490601906203/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=193562490601906203' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/193562490601906203'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/193562490601906203'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2008/02/blog-post_7041.html' title='शिवथर घळ'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-1643523646307665557</id><published>2008-02-06T05:41:00.000-08:00</published><updated>2010-01-31T00:27:38.152-08:00</updated><title type='text'>रुपेरी समुद्रकिनाऱ्यावरील केळशी</title><content type='html'>दोन दिवसांच्या सहलीसाठी रत्नागिरी जिल्हा व दापोली तालुक्‍यात केळशी नावाचे गाव. नितांतसुंदर, निवांत, खऱ्या रुपेरी वाळूचा समुद्रकिनारा, पुरातन मंदिरे, पेशवेकालीन गावाची रचना, नारळी-पोफळीच्या बागा, सर्वत्र बारमाही हिरवा गालिचा असलेले कोकणातील केळशी हे अत्यंत रमणीय व निवांत आहे. गाव तसे लहान आहे, पण त्या गावाला इतिहास आहे. या गावात छत्रपती श्री शिवाजीमहाराजाच्या चौदा गुरूंपैकी एक गुरू बाबा याकूत यांची श्री संभाजीराजांनी बांधलेली समाधी आहे. पेशवेकालीन श्रीराम मंदिर गावात आहे. गावाच्या दक्षिणेस श्री लक्ष्मीमातेचे जागृत पुरातन मंदिर आहे. गाव टुमदार आहे. मोठमोठ्या दगडी चिरा रचून रस्ते व पावसाच्या पाण्यासाठी नाले तयार केले आहेत. एका बाजूस घरे, बंगले, वाड्या व समुद्राच्या बाजूस पश्‍चिमेस नारळी-पोफळीच्या, फुलांच्या बागा आहेत. गावात हॉटेल, लॉज नाहीत; पण गावातील सधन लोकांनी उत्पन्नाचे साधन म्हणून आपल्या प्रशस्त जागांत खोल्या बांधून पर्यटकांसाठी छान सोय केली आहे. गावात दहा-बारा ठिकाणी घरगुती सामुदायिक व वैयक्तिक राहण्याच्या सोई आहेत. मुबलक पाणी, त्यामुळे स्वच्छता, टापटीप वाखाणण्यासारखी. स्वच्छ परिसर, भरपूर झाडी, फुलझाडे, वेली सर्वत्र, त्यामुळे आपण अनोख्या जगात आल्यासारखे वाटते. प्रदूषणमुक्त वातावरण, सुखद हवा, मंद पानाफुलांचा वास, यामुळे तेथे पोचल्यावर थोड्या वेळातच आपण ताजेतवाने होतो. महत्त्वाचे म्हणजे, राहण्याची व भोजनाची अत्यंत किफायतशीर सोय होते. एका पर्यटकासाठी एक दिवसासाठी राहणे, नाष्टा, दोन वेळा चहा व दोन वेळा जेवण यासाठी 200 रुपये घेतले जातात. ज्येष्ठांना सवलत मिळते. दहा लोकांचा गट असेल तर एका व्यक्तीस सर्व मोफत मिळते. भरपूर गरम पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे व खोल्याही स्वच्छ असतात. प्रत्येक ठिकाणी आपुलकीने लक्ष दिले जाते. गडबडगोंधळ अजिबात नसतो. चहा, नाष्टा दर्जेदार, चविष्ट असतो. भोजन तर खास कोकणी पद्धतीचे असते. वरण, भात, तूप, गरम पोळ्या, उसळ, रस्सा भाजी, पापड, चटणी, लोणचे, कोशिंबीर याचा समावेश असतो. सर्व सात्त्विक आहार असतो. त्यामुळे खरे उदभरण होते. तृप्ती होते. अगदी गोड बोलून आग्रहाने जेवण वाढले जाते. अगदी घरच्यासारखा पाहुणचार होतो. शिवाय आगाऊ सांगितल्यास उकडीचे मोदक दिले जातात. जादा पैसे घेऊन सगळ्या ठिकाणी शाकाहारी जेवण मिळते. नशापाणी करण्यास बंदी असते. मागणी केल्यास मांसाहारी जेवण दिले जाते. त्याची वेगळी सोय केली जाते. अशी गावात दहा-बारा ठिकाणी सोय आहे. गाड्या पार्किंगची सोय आहे. आजूबाजूच्या चांगल्या स्थळांबद्दल माहिती दिली जाते. मार्गदर्शन केले जाते. तेथेच घरगुती कोकणी मेवा विकत मिळतो. ... फणसपोळी, पोह्याचे पापड, आंबापोळी, आंबा पल्प, लोणची इत्यादी. त्यामुळे केळशीच्या सहलीत सर्व गोष्टी मुक्तपणे अनुभवता येतात. सर्व कोकणाची वैशिष्ट्ये अनुभवता येतात. मुंबईहून आपल्या वाहनाने चार तासांचे अंतर. पुण्यातून पाच तासांचे अंतर. स्वतःच्या गाडीने सहल करण्यासाठी सहल नियोजन- मुंबईकडून सहल काढायची असेल तर सकाळी निघून 11 वाजेपर्यंत रायगड दर्शन, जेवण करून चार वाजता निघून सातपर्यंत केळशीस मुक्काम. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील श्रीराम मंदिर दर्शन, नंतर सुंदर समुद्रकिनारा, नंतर श्री शिवाजी महाराजांचे गुरू बाबा याकूत यांच्या समाधीचे (दर्गा) दर्शन. शेवटी श्री लक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन गावातील बाजारपेठेतून एकपर्यंत मुक्कामी परत. जेवण करून विश्रांती घेऊन साडेतीन वाजता चहा घेऊन परतीचा प्रवास. जाता जाता वाळूच्या टेकड्या पाहून परत मुंबईस प्रयाण. पुण्याहून सहल ः पुण्याहून दोन मार्ग आहेत- &lt;strong&gt;एक&lt;/strong&gt; ः सकाळी निघून भोर (वरंधा घाटमार्गे), शिवथर घळ (श्री रामदास स्वामीचे ध्यानस्थळ) पाहून रायगड दर्शन, जेवण करून संध्याकाळी सातपर्यंत केळशी मुक्काम. विश्रांती, जेवण. दुसऱ्या दिवशी केळशी स्थळदर्शन, समुद्रस्नान व जेवण, विश्रांती. दुपारी साडेतीन वाजता निघून वाळूच्या टेकड्या पाहून, लोणेर फाटा, निजामपूर, मानगावमार्गे ताम्हिणी घाटातून मुळशीमार्गे आठ वाजता पुण्यात परत. &lt;strong&gt;दुसरा मार्ग ः &lt;/strong&gt;सकाळी सात वाजता पुण्यातून निघून पौडमार्गे मुळशी धरण पाहून नाष्टा करून पुणे-ताम्हिणी घाटातून प्रवास. ताम्हिणी घाट फारच सुंदर, रमणीय. हिरवी वनश्री, विविध पक्षी, झाडे आहेत. पुढे मुंबई-गोवा मार्गावर येऊन नंतर मानगाववरून पुढे निजामपूर व नंतर लोणेर फाट्यावरून आपण केळशीला दुपारी एक वाजेपर्यंत पोचतो. नंतर जेवण व विश्रांती घेऊन दुपारी साडेतीन वाजता चहा घेऊन स्थळदर्शन. प्रथम श्रीराम मंदिर दर्शन, नंतर बाजारपेठमार्गे श्री लक्ष्मीदेवी दर्शन. तेथून पुढे थोड्या अंतरावर श्री गुरू याकूतबाबा समाधी (दर्गा) दर्शन, तसेच पुढे समुद्रदर्शन. खेळणे, सूर्यास्त पाहणे. नंतर वाड्या-बागांतून मुक्कामी परत येणे. सकाळी लवकर उठून सर्व उरकून तेथून 15 किलोमीटर असलेला कड्यावरच्या गणपती दर्शनास जाणे. जाताना कोकण परिसर, खाडी, टुमदार घरे, पुरातन मंदिरे, मासे बाजार पाहून श्री गणपती दर्शन घेणे. गणपती टेकडीवर आहे. गाडी वरपर्यंत जाते. मंदिर अकराशे वर्षांपूर्वीचे आहे. सुंदर, सुबक मूर्ती असलेले मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. वरून सागराचे, आसमंताचे विहगंम दृश्‍य दिसते. परत येताना निवांत समुद्रकिनारा पाहता येतो. बारा वाजेपर्यंत परत येऊन जेवण, विश्रांती घेऊन दुपारी साडेतीन वाजता निघून वाळूच्या टेकड्या पाहून त्याच मार्गाने पुण्याकडे परत येणे. पुण्यापासून साधारण 200 किलोमीटर अंतर आहे. पावसाळा सोडून सर्व हंगाम (सीझन) सहलीस चांगले असतात.&lt;br /&gt;- शि. बा. गोसावी&lt;br /&gt;साभार ः सकाळ&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-1643523646307665557?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/1643523646307665557/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=1643523646307665557' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1643523646307665557'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1643523646307665557'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2008/02/blog-post_2180.html' title='रुपेरी समुद्रकिनाऱ्यावरील केळशी'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-2467264721272175881</id><published>2008-02-06T05:39:00.000-08:00</published><updated>2009-05-01T01:21:36.538-07:00</updated><title type='text'>रत्नागिरी</title><content type='html'>रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे, पावस, गणेशगुळे, माचाळ, मार्लेश्‍वर, काळबादेवी, पालगड, मुरूड, मंडणगड, आयनी-मेटे अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोव्यातून राष्ट्रीय महामार्गमार्गे सिंधुदुर्ग जिल्हा ओलांडला की खारेपाटणपासून रत्नागिरी जिल्ह्यास सुरवात होते. पहिले गाव लागते राजापूर. एकेकाळचे प्रसिद्ध बंदर, राजापूरहून तीस किलोमीटरवर डावीकडे आडिवरे येथे श्री महाकालीचे पुरातन मंदिर आहे. आडिवरे येथे शिलाहार राजाची सत्ता असताना भरभराटीस आलेली बाजारपेठ होती. राजापूरजवळ श्री धूतपापेश्वराचे मंदिर नदीकिनारी आहे. राजापूरपासून पाच किलोमीटरवर गंगातीर्थ आहे. राजापूरची गंगा म्हणून ते ठिकाण प्रसिद्ध असले तरी तेथे पाणी असल्याची खात्री करूनच भेट द्यावी. पुढे गेल्यावर हातखंबा येथून डावीकडे वळल्यावर रत्नागिरी लागते. रेल्वेने रत्नागिरीस जावयाचे असल्यास रेल्वेस्थानक शहराबाहेर 13 किलोमीटरवर आहे हे आधी लक्षात घ्यावे. तेथून रिक्षा करून रत्नागिरी गाठावी लागते. रत्नागिरीपासून 15 किलोमीटरवर पावस आहे. हे गाव स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पुनीत होऊन तीर्थक्षेत्र बनले आहे. तेथे स्वामींची समाधी व सुंदर मंदिर आहे. पावसला जाताना भाट्याच्या खाडीवरील राजिवडा बंदर ओलांडून जावे लागते. भाटये येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नारळ संशोधन केंद्र आहे. तेथे नारळाची रोपेही विकत मिळतात. शिवरायांच्या आरमारातील शूर सेनानी मामाजी भाटकर भाट्ये येथीलच. त्यांची समाधी तेथे आहे. पावसला जाण्यासाठी लांजा येथूनही मार्ग आहे, पण तो अरुंद. रत्नागिरीत लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आहे. हे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्यात आले आहे. श्रीमती इंदिराबाई गोरे यांचा हा वाडा आता टिळक स्मारक म्हणून ओळखला जातो. रत्नागिरीतच प्रसिद्ध थिबा पॅलेसही आहे. ब्रिटिशांनी 1910-11 मध्ये ही वास्तू उभारली. तेथे आता वस्तूसंग्रहालय आहे, तसेच बाजूला असलेला थिबा पॉइंटही चांगला आहे. रत्नागिरीच्या भगवती किल्ल्यावर जाता येते, तेथे दिवसा जाणे कधीही चांगले. किल्ल्यात शिवकालीन भगवतीचे मंदिर आहे. रत्नदुर्गाच्या पायथ्याशी दक्षिणेला किनारा काळ्या वाळूचा असल्याने त्याला काळा समुद्र तर उत्तरेकडील समुद्राला पांढरा समुद्र असे म्हणतात. या किल्ल्याच्या पायथ्याशी भागोजीशेठ कीर यांनी बांधलेले श्री भागेश्वर मंदिर आहे. या शिवमंदिरातील खांबांवर पशुपक्ष्यांची सुंदर निसर्गचित्रे कोरलेली आहेत. अथांग समुद्रकिनारा, निसर्गसंपन्न परिसर आणि प्राचीन गणेशमंदिर. पावसजवळचे गणेशगुळे आकर्षक आहे. रत्नागिरीहून पन्नास किलोमीटरवर गणपतीपुळे आहे, रत्नागिरीहून झाडगावमार्गे गणपतीपुळे येथे जाताना वाटेत मत्स्य महाविद्यालय लागते. गणपतीपुळेला गणपतीचे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी असून समोर अथांग सागर व पांढऱ्या वाळूचा विस्तीर्ण किनारा पसरलेला आहे. या देवस्थानचा इतिहास 1600 पासूनचा आहे. सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांचे हे कुलदैवत. छत्रपती शिवाजी महाराज ते पेशवाईपर्यंतचा इतिहास या मंदिराशी निगडित आहे. देवालयाचा गाभारा छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सचिव अण्णाजी दत्तो यांनी, सभामंडप व मंदिराभोवतालची दगडी पाखाडी सरदार गोविंदपंत बुंदेले यांनी तर आवारातील धर्मशाळा रमाबाई पेशवे यांनी बांधलेली आहे. नंदादीप नानासाहेब पेशवे यांनी तर नगारखाना चिमाजी अप्पा यांनी बांधला आहे. गणपतीपुळेला जाण्यासाठी पणजीहून कदंब व एसटीच्या बसेस आहेत. गणपतीपुळेच्या शेजारी मालगुंड असून ते कवी केशवसुतांचे गाव. त्यांचे वस्तुसंग्रहालय वजा स्मारक पाहण्यासारखे आहे. पुढे चिपळूणच्या दिशेने जाताना वाटेत संगमेश्वर लागते. त्याच रस्त्यावर आरवली व तुरळ येथे गरम पाण्याचे झरे रस्त्यालगतच आहेत. या पाण्याला गंधकाचा वास येतो. त्वचारोग बरे करण्यासाठी तेथे स्नान करण्यासाठी अनेकजण थांबत असतात. संगमेश्वरजवळील कसबा येथे चालुक्‍य घराण्यातील कर्ण राजाने बांधलेले श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी पुरातन मंदिर आहे. तेथे सरदेसायांचा मोठा वाडा असून या वाड्यात छत्रपती संभाजीराजे असताना त्यांच्यावर औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने अचानक हल्ला करून अटक केली होती. या ठिकाणी संभाजी राजांचा स्मारक स्तंभ आहे. संगमेश्वरहून चिपळूणकडे जाताना डावीकडे श्री क्षेत्र मार्लेश्वर आहे. देवरूखपासून 15 किलोमीटरवर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात निसर्गरम्य ठिकाणी वसलेले शंकराचे हे देवस्थान पाहण्याजोगे आहे. उंच डोंगराला वळसा घालून गेल्यावर एका गुहेत हे स्वयंभू देवस्थान आहे. या डोंगरावर मोठा धबधबा आहे. देवस्थानपर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. कशेळीचा कनकादित्य रत्नागिरी, पावस, गणपतीपुळे ही सारी ठिकाणं पर्यटकांच्या परिचयाची. पण इथून जवळच आहे, एक आगळं-वेगळं ठिकाण. त्याचं नाव आहे कशेळी. (मंडणगड जवळचं केळशी नव्हे) महाराष्ट्रात एकेकाळी सौरसंप्रदाय पसरला होता. परंतु सूर्याची फारशी मंदिरं आजमितीस अस्तित्वात नाहीत. पण कोकणात काही सूर्यमंदिरे आहेत. आरवली, आंबव, नेवरे, कशेळी अशा काही गावांमध्ये ही सूर्यमंदिरे आहेत. कशेळीचा कनकादित्य हे आवर्जून भेट देण्याजोगं ठिकाण निश्‍चित आहे. रत्नागिरीपासून 22 कि.मी. आणि राजापूरपासूनही 22 कि.मी. अंतरावर कशेळी हे छोटं गाव आहे. रत्नागिरी-भाट्ये-पावस-पूर्णगड-कशेळी असा हा उत्तम रस्ता आहे. या टुमदार गावाला विस्तीर्ण असा सागरकिनारा लाभला आहे. तिथला डोंगरकडा अन्‌ केवड्याचं बन केवळ अनुभवण्याजोगं. सुमारे 800 वर्षे नांदतं, असं श्री कनकादित्याचं मंदिर गावात उभं आहे. चहूबाजूंना आंबा-फणस-नारळी-पोफळीची दाटी आहे. त्यातच धनेश म्हणजे हॉर्नबिल हा पक्षी हमखास पाहायला मिळतो. मंदिराच्या आवारातच श्री गणपती, श्री शंकर, श्री आर्यादुर्गादेवी, श्री विष्णू अशी चार मंदिरे आहेत. म्हणजे हे सूर्यपंचायतन आहे. शिवाय एक मारुती मंदिरही आहे. पन्हाळगडच्या शिलाहार राजाने आषाढ शुद्ध चतुर्थी शके 1113 म्हणजे 27 जून 1191 रोजी गोविंदभट्ट भागवत यांना कशेळी गाव इनाम दिला. तसा ताम्रपट करून दिला. आजही हा तीन ताम्रपृष्ठांचा काही किलो वजनाचा ताम्रपट मंदिरात उपलब्ध आहे. मुंबईच्या नाना शंकरशेठ यांनी मंदिराचा सभामंडप बांधून दिला आहे. प्रख्यात इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर, थोर साहित्यिक वि. सी. गुर्जर, थिऑसॉफीचे भाष्यकार राजाराम सखाराम भागवत आदी अनेक मंडळींचं कशेळी हे जन्मस्थान. इथे मुक्काम करण्यासंदर्भात भास्कर नारायण भागवत, मुख्य विश्‍वस्त श्री कनकादित्य मंदिर, कशेळी यांच्याशी संपर्क साधावा, दूरध ्वनी- 02353- 226317 किंवा रमेश पांडुरंग ओळकर 02353-226323 हे दूरध्वनी क्रमांक त्यासाठी उपयुक्त ठरतील. कशेळी गावातच श्री लक्ष्मी केशवाचे मंदिर आवर्जून भेट देण्याजोगे आहे. इथून जवळच वेत्ये गावचा विलोभनीय समुद्रकिनारा डोळ्यांचे पारणेच फेडतो. आडिवरे येथील देवीच्या महाकालीची मूर्ती येथेच सापडली. कशेळीच्याच भेटीत राजापूरमधील अनेक ठिकाणांनाही भेट देता येते. चिपळूणहून खेडला जाताना परशुराम हे गाव लागते. सहाशे वर्षांपूर्वीच्या श्री परशुराम मंदिराची, आदिलशाही विजापूरकर वैभवाची वास्तू तेथे आहे. परशुराम, काम व काळ या अनुक्रमे विष्णू, ब्रह्मदेव व शंकराचा अवतार असलेल्या काळ्या पाषाणाच्या मूर्ती मंदिरात आहेत. परशुरामात प्राचीनकाळी घरोघरी पाणी पोचविण्याची पाटवजा व्यवस्था होती. तिचे अवशेष आजही पाहायला मिळतात. परशुराम घाटात पावसाळ्यात सवत कडा हा धबधबाही दिसतो. खेडहून पुढे दापोलीला जाता येते. दापोलीत पाहण्यासाठी जवळपास 62 पर्यटनस्थळे आहेत. आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती आणि दुर्गादेवीचं मंदिर अनेकांच्या परिचयाचं. बकुळ वृक्षांच्या गराड्यात असलेलं श्री गणेश मंदिर आणि तेथून हर्णे-मुरूडच्या किनाऱ्यावरील सुवर्णदुर्ग-कनकदुर्ग-फत्तेगड आणि गोवा किल्ला ही दुर्गचौकडी व्यवस्थित न्याहाळता येते. आंजर्ले येथील मुक्कामासाठी माधव हरी साठ्ये, श्री स्वामी समर्थ निवास, उभाघर आंजर्ले, ता. दापोली, जि. रत्नागिरी यांच्याशी 02358 - 234229 यांच्याशी संपर्क साधावा. आंजर्ले-केळशी रस्त्यावर आडे-पडले गाव आहे. इथे पुलाजवळ श्रीभार्गवरामाचं म्हणजे श्री परशुरामाचं देखणं मंदिर आहे. शिवाय श्री बेलेश्‍वराचंही मंदिर आहे. आंजर्ले इथे मुक्काम करून हर्णे - मुरूड (अण्णासाहेब ऊर्फ भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव) आसूदचा श्री व्याघ्रेश्‍वर आणि श्री केशवराज, दापोली- लोकमान्य टिळकांचं मूळ गाव, चिखलगाव दाभोळ-कोळथरे-पंचनदी- पन्हाळे लेणी अशी अनेक ठिकाणं पाहून दिवसभरात परत येता येतं. मंडणगड येथील अप्पा घैसासांच्या संतोष हॉटेलमधील (02350-225207) थालिपीठ, अळिवाचे लाडू आणि अप्रतिम कोकम सरबत चाखून पाहायला विसरू नकाच. दापोलीपासून नऊ किलोमीटरवर मुरूड हे महर्षी कर्वे यांचे जन्मगाव. नारळ-पोफळीच्या बागा, कौलारू घरे, सारवलेली अंगणे पाहत पाहत आपण स रळ समुद्रावरच पोचतो व तो विशाल सागर आपल्याला खिळवूनच ठेवतो. याच सागराच्या सान्निध्यात व अगदी नारळाच्या बागेत एक साधे पण सुंदर रिसॉर्ट आहे... श्री. सुरेश बाळ यांचे "मुरूड बीच रिसॉर्ट'. येथे गरमागरम उकडीचे मोदक, आंबोळी, थालीपीठ यासारखे कोकणी पदार्थ आधी कळवल्यास बनवतात. तसेच त्यांच्याकडे पोहा पापड, आमसुले, आंबापोळी, फणसपोळी इ. पदार्थ मागणीनुसार उपलब्ध असतात. शिवाय त्यांच्या बागेत जायफळ, लवंगा, काळी मिरी इत्यादी झाडेही पाहायला मिळतात. मुरूडच्या किनाऱ्यावरून सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग व हर्णैचा दीपस्तंभही दिसून येतो. मुरूड गावात दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या खांबांवर नक्षीकाम केलेले आहे, तर पुढील बाजूस नगारखाना व दगडी दीपमाळ आहे. दाभोळहून होडीने किंवा फेरीबोटीने खाडी पार करून गुहागर, हेदवी व वेळणेश्‍वर अशा पर्यटनस्थानांची ओळख करून घेता येते. ही फेरीबोट दुचाकी, चारचाकी वाहने व माणसे यांना वाहून नेते व ही सेवा वाजवी दरात सतत उपलब्ध असते. तसेच मुरूडच्या किनाऱ्यावर राहून पर्यटक रायगड किल्ला, चिपळूणजवळील परशुराम मंदिर, दिवेआगर येथील सोन्याचा गणपती इत्यादी ठिकाणे पाहून परत येऊ शकतो. आसूदच्या रस्त्यानेच पुढे गेल्यावर व्याघ्रेश्वर मंदिर लागते. हे मंदिर 800 वर्षे जुने आहे. आसूद गावातून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठी असलेल्या या मंदिराला चारही बाजूंनी सुमारे पाच फूट उंचीची दगडी भिंत आहे. आतल्या लाकडी खांबांवर दशावतार कोरलेले आहेत. मुरुड आसूद पुलापाशी डावीकडे वळल्यानंतर मुरुड गाव लागते. इथेच दुर्गादेवीचे मंदिर आहे. या मंदिराजवळचा रस्ता थेट समुद्रकिनारी जातो. कर्देमुरुड गावाकडे जाताना डावीकडे कर्दे इथला निसर्गरम्य समुद्रकिनारा लागतो. हा समुद्रकिनारा बराच प्रसिद्ध आहे. थंडीच्या मोसमात हर्णे, मुरुड, कर्दे परिसरात बरेचसे स्थलांतरित पक्षी येतात., त्यामुळे हे ठिकाण बघण्यासारखे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;राहण्याची व्यवस्था ः&lt;br /&gt;1) हॉटेल सफारी एशिया- रत्नागिरी- (02352) २२१७६०&lt;br /&gt;2) हॉटेल विवेक- रत्नागिरी- (02352) २२२१६२&lt;br /&gt;3) हॉटेल अल्फा- रत्नागिरी- (02352) २२२३५७&lt;br /&gt;4) हॉटेल प्रभा- रत्नागिरी- (02352) २२३५१५&lt;br /&gt;5) स्वरूप लॉज- रत्नागिरी- (02352) २२०५८५&lt;br /&gt;6) कोहिनूर बीच रिसॉर्ट- रत्नागिरी (02352) 235231, ३२&lt;br /&gt;7) हॉटेल लॅण्डमार्क- रत्नागिरी - (02352) २२०१२०&lt;br /&gt;8) मातृछाया निवास- गणपतीपुळे- (02357) २३५२९१&lt;br /&gt;9) अभिषेक बीच रिसॉर्ट- गणपतीपुळे- (02357) २३५३२७&lt;br /&gt;10) गोकूळ लॉज- गणपतीपुळे- (02357) २३५०३१&lt;br /&gt;11) हॉटेल श्रीसागर- गणपतीपुळे- (02357) २३५१४५&lt;br /&gt;12) किस्मत रेसिडेन्सी बीच रिसॉर्ट- गुहागर- (02359)&lt;br /&gt;13) हॉटेल कौटिल्य लॉज- गुहागर- (02359)&lt;br /&gt;14) कुंटे हिल रिसॉर्ट ऍण्ड फार्म हाउस- कोळंबे, संगमेश्‍वर-&lt;br /&gt;15) हॉटेल पार्वती पॅलेस- देवरुख- (02354)&lt;br /&gt;16) बीच रिसॉर्ट सिल्व्हर सॅण्ड- दापोली- (02358)&lt;br /&gt;17) रूपा लॉज- खेड- (02356)&lt;br /&gt;18) सीता- चिपळूण- (02355) 252244,&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;अंतर ः&lt;br /&gt;पणजी ते रत्नागिरी 240 कि.मी।&lt;br /&gt;लांजा ते रत्नागिरी 70ं कि.मी&lt;br /&gt;लांजा ते रत्नागिरी आडिवरेमार्गे 64 कि. मी&lt;br /&gt;हातखंबा गणपतीपुळे नेवरेमार्गे 37 कि. मी&lt;br /&gt;हातखंबा गणपतीपुळे निवळीमार्गे 47 कि. मी&lt;br /&gt;रत्नागिरी संगमेश्वर 45 कि. मी&lt;br /&gt;संगमेश्वर देवरूख 15 कि. मी&lt;br /&gt;साखरपा देवरूख 15 कि. मी&lt;br /&gt;साखरपा कोल्हापूर 80 कि. मी&lt;br /&gt;संगमेश्वर चिपळूण 45 कि. मी&lt;br /&gt;चिपळूण दापोली 72 कि. मी&lt;br /&gt;चिपळूण गुहागर 45 कि. मी&lt;br /&gt;चिपळूण खेड 36 कि. मी&lt;br /&gt;दापोली मंगणगड 42 कि. मी&lt;br /&gt;रत्नागिरी ते पावस 15 कि.मी&lt;br /&gt;देवरूख ते मार्लेश्वर 15 कि.मी&lt;br /&gt;रत्नागिरी ते कशेळी 22 कि.मी&lt;br /&gt;मुरूड ते आंजर्ले 5 कि.मी.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-2467264721272175881?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/2467264721272175881/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=2467264721272175881' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/2467264721272175881'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/2467264721272175881'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2008/02/blog-post_8411.html' title='रत्नागिरी'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-7346006660705707936</id><published>2008-02-06T05:35:00.001-08:00</published><updated>2008-02-06T05:35:46.256-08:00</updated><title type='text'>उटी</title><content type='html'>थंड हवेचे ठिकाण म्हणून "उटी'चा लौकिक साऱ्या देशभर आहे. आजच्या अधिकृत भाषेत या ठिकाणाचे नाव "उधगमंडलम' असे आहे. मध्यंतरी त्याला उटकमंड असेही म्हटले गेले. सुमारे दीड पावणेदोनशे वर्षांपूर्वी जॉन सुलीवॉननामक ब्रिटिश अधिकाऱ्याने विकसित केलेल्या दक्षिण भारतातील या ठिकाणास "क्वीन ऑफ हिलस्टेशन्स' असे म्हटले जाते. हिंदीसह अन्य भारतीय भाषांतील चित्रपटांचे या परिसरात शूटिंग केवळ पावसाळ्याचे काही दिवस वगळता इथे वर्षभर चालू असते. अत्यंत समृद्ध अशी वनसंपदा, वन्यप्राणिसंपदा लाभलेले हे ठिकाण निलगिरी पर्वतशृंखलेत आहे आणि ते आजच्या प्रशासकीय पद्धतीनुसार तमिळनाडू राज्यात असले, तरी इथून केरळ आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाही लागूनच आहेत. इथे उटीच्या पर्यटकीय वैशिष्ट्यांऐवजी तेथील भाजीपाला शेतीबाबत माहिती देत आहे. समुद्रसपाटीपासून उटी सुमारे अडीच हजार मीटर्स उंचीवर आहे. येथील हवामान तापमान बाराही महिने विलक्षण आल्हाददायक, सुखद असते. वार्षिक पर्जन्यमान सुमारे 200 सेंटिमीटर पाऊस एवढे आहे. थोडक्‍यात भूमी अर्थात जमीन, पाणी, तापमान हे सगळे भाजीपाला शेतीसाठी अत्यंत पोषक, अनुकूल असे आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरात ज्याला निलगिरी जिल्हा म्हणतात आणि ज्याचे मुख्यालय उटी शहर आहे तिथे वर्षभर भाजीपाला पिकवला जातो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-7346006660705707936?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/7346006660705707936/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=7346006660705707936' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/7346006660705707936'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/7346006660705707936'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2008/02/blog-post_8775.html' title='उटी'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-8907999039934240613</id><published>2008-02-06T05:31:00.002-08:00</published><updated>2008-02-06T05:34:35.702-08:00</updated><title type='text'>भीमाशंकर!</title><content type='html'>निसर्गसौंदर्याने नटलेले भीमाशंकर! सदाहरित जंगलामुळे या परिसरात पदभ्रमण करणे हा वेगळाच सुखद अनुभव आहे. पावसाळ्यात तर त्याचे सौंदर्य अधिकच खुलते. हिरव्याकंच पर्णभाराने लगडलेल्या वृक्षांवर गोड कूजन करणारे बुलबुल, फुलाफुलांवर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, आकर्षक रंगांनी मन आकर्षित करून घेणारे तऱ्हेतऱ्हेचे कीटक, या सर्वांचे निरीक्षण करणे हा अद्‌भुत अनुभव असतो. रोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच वाटावा, यात काहीच आश्‍चर्य नाही. पावसाळ्यात धुक्‍याच्या तरल पडद्याआडून हळूच डोकावणारी वृक्षवल्लरी क्षणार्धात शहरी शीण आणि ताणतणाव घालवून टाकते. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच महाराष्ट्रात आहेत. भीमाशंकर त्यापैकीच एक. या संपूर्ण परिसराला लाभलेल्या हिरव्या कोंदणामुळे या पवित्र भूमीला भाविकांबरोबरच निसर्गप्रेमींचाही स्वर्ग म्हणायला हरकत नाही. नागफणी या उंच शिखरावरून आसपासच्या दऱ्याखोऱ्यंचे विहंगम दृश्‍य मनाला भुरळ पाडते. याच क्षेत्रातून भीमा नदीचा उगम होतो आणि आग्नेय दिशेने वाहत ती पुढे कर्नाटकातील रायचूरजवळ कृष्णा नदीत विलीन होते. ही पवित्र देवभूमी आहे आणि भगवान शंकराचा या परिसराला परीसस्पर्श झाला आहे. भीमाशंकराचे मंदिर नगारा शैलीत अठराव्या शतकात बांधण्यात आले आहे. त्याच्या बांधकामावर आर्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. येथे महादेवाचे स्वयंभू लिंग आहे. पेशव्यांचे कारभारी नाना फडणीस यांनी मंदिराचे शिखर बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी मदत दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. मंदिराच्या कोरीव दगडी खांबांवर पौराणिक देखावे खोदण्यात आले आहेत. मंदिराच्या आवारात शनिमंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख सापडतो. एक आख्यायिका अशी सांगतात, की सह्याद्रीच्या या परिसरात एक दुष्ट राक्षस राहत होता. त्रिपुरासुर किंवा भीम असे त्याचे नाव. त्याच्या मातेचे नाव करकती. भीम आपल्या जीवनातील काही रहस्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता. आपला पिता कोण आणि त्याने आपल्याला वाऱ्यावर का सोडून दिले, असा प्रश्‍न त्याने आपल्या मातेला केला. तेव्हा त्याला समजले की तो कुंभकर्णाचा पुत्र आहे. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या प्रभू रामाने त्याचा वध केला होता. हे रहस्य समजल्यानंतर भीमाने विष्णूचा सूड उगविण्याचा निर्धार केला. त्याने ब्रह्मदेवाच्या प्राप्तीसाठी याच परिसरात तपश्‍चर्या केली. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्याला एका वराद्वारे अमर्याद सामर्थ्य प्रदान केले. मात्र, त्याचा दुष्टपणा एवढा वाढला, की त्याने देवांचा राजा इंद्राचाही पराभव केला. महादेवाचा उपासक कामरूपेश्‍वराचाही त्यानं पराभव करून त्याला पाताळात धाडून दिले. भीमाचा दुष्टपणा वाढत चालल्यामुळे ब्रह्मदेव भगवान शंकराला शरण गेले आणि त्या दुष्टाचा नायनाट करण्याची विनंती केली. भीमाने कामरूपेश्‍वराला शंकराची भक्ती सोडून आपले गुणगान करण्याचा आदेश दिला; परंतु कामरूपेश्‍वराने त्याला तसे करण्यास नकार दिला; त्यामुळे भीमाने शिवलिंग भग्न करण्याच्या उद्देशाने तलवार उपसली. त्याच वेळी भगवान शंकर तेथे प्रकट झाले. त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. या युद्धामुळे तिन्ही लोक भयभीत झाले. ते पाहून नारदाने युद्ध थांबविण्याची दोघांना विनंती केली. त्यानंतर भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून भीमाची राख केली. त्यानंतर भगवान शंकर त्याच स्वयंभू लिंगात विलीन झाले आणि हे क्षेत्र ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. पश्‍चिम घाटाच्या पूर्व-पश्‍चिम पसरलेल्या एका रांगेपैकी भीमाशंकरची रांग आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची तीन हजार 250 फूट आहे. येथील जंगलात आंबा, हिरडा, बेहडा, बांबू, औषधी वनस्पती आहेत. घनदाट अरण्यामुळे या प्रदेशात विविध प्रकारचे वन्य जीव वास्तव्यास असतात. बिबट्यांचा येथे मुक्त संचार आहे. त्याचबरोबर रानडुक्कर, भेकर, सांबर, तरस आणि शेकरू (जायंट इंडियन स्क्विरल) ही मोठी खार या अरण्याचे वैशिष्ट्य आहे. मोरांची संख्याही येथे विपुल आहे. पदभ्रमण व गिरिभ्रमण करणाऱ्यांचा तर हा स्वर्गच आहे. या परिसरात तयार झालेल्या पाऊलवाटांनी फिरण्यातच खरी मजा आहे. भाकादेवीचा बंधारा, नागफणीच्या रस्त्यावरील हनुमान तळे, सीतारामबाबांचा मठ आणि हनुमान मंदिर, तेथून काहीशा अवघड वाटेने चढून गेल्यास नागफणी हे भीमाशंकरचे सर्वोच्च शिखर लागते. त्याशिवाय जिल्हा परिषदेचे दोन तलाव येथे आहेत. मुंबई पॉईंट, साक्षी विनायक, कमळजा मंदिर ही आणखी काही रम्य स्थळे. दोन दिवसांच्या सहलीचे नियोजन करून भीमाशंकरला जाता येते. कोकणातून कल्याणमार्गे आणि पुण्याहून मंचरमार्गे येथे पोचता येते. पुण्याहून भीमाशंकर 110 किलोमीटर आहे. बस किंवा मोटारीने येथे येणे सोपे आहे. पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातून नियमितपणे एसटीच्या बस सुटतात. नारायणगाव किंवा मंचरपर्यंत येऊनही तेथे दुसरी बस मिळू शकते. पुणे हा जवळचा विमानतळ आहे. मुंबईहूनही तेथे जाता येते. मुंबईहून बस किंवा लोकलने कर्जतपर्यंत यावे व तेथून खांडसची (सुमारे 40 किलोमीटर) बस पकडावी. सुमारे चार ते साडेचार तासांच्या प्रवासानंतर भीमाशंकरला पोचता येते. भीमाशंकरला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासस्थान आहे. त्याचे आरक्षण मुंबई किंवा पुण्यातून करता येते. भीमाशंकरच्या अलीकडे ब्लू मॉरमॉन आणि अन्य काही हॉटेलेही आहेत. तेथेही दूरध्वनी करून आरक्षण करता येते. सुटीच्या आणि महाशिवरात्रीसारख्या सणांच्या दिवशी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे सुटी व सणाचे दिवस वगळून येथे आल्यास येथील निसर्गसौंदर्याचा लाभ घेता येईल. येथील किंवा अन्य कोणत्याही जंगलात काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा येथे वापर टाळावा. वापरल्यास कोठेही फेकून देऊ नयेत. मोठ्या आवाजात बोलू नये, रेडिओ, टेप बंद ठेवावेत, चालताना झाडांच्या फांद्या तोडू नयेत, बिळांमध्ये काठ्या खुपसून आतील वन्य जीवांना त्रास देऊ नये. कोणत्याही ऋतूमध्ये येथे येता येईल.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-8907999039934240613?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/8907999039934240613/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=8907999039934240613' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/8907999039934240613'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/8907999039934240613'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2008/02/blog-post_8293.html' title='भीमाशंकर!'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-3583920056807133945</id><published>2008-02-06T05:31:00.001-08:00</published><updated>2008-02-06T05:31:36.161-08:00</updated><title type='text'>विजयदुर्ग</title><content type='html'>सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळ चोहोबाजूंनी समुद्राने वेढलेला सिंधुदुर्ग हा वैशिष्ट्यपूर्ण किल्ला विशेष प्रसिद्ध आहे; पण याच जिल्ह्यातील देवगड तालुक्यात तिन्ही बाजूंनी समुद्राने घेरलेला विजयदुर्गही पाहण्यासारखा आहे. 1653 मध्ये शिवाजी महाराजांनी तो ताब्यात घेऊन अधिक मजबूत बनविला. आता एक पर्यटन स्थळ म्हणून त्याचा परिसर विकसित करण्यात येत आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-3583920056807133945?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/3583920056807133945/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=3583920056807133945' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/3583920056807133945'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/3583920056807133945'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2008/02/blog-post_06.html' title='विजयदुर्ग'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-6432207489285632882</id><published>2008-02-06T05:18:00.000-08:00</published><updated>2008-02-06T05:19:07.394-08:00</updated><title type='text'>जिम कॉर्बेट नॅशनल पार्क</title><content type='html'>जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या देशातील महत्त्वाच्या अभयारण्यांपैकी एक असा त्याचा लौकिक आहे. या पार्कची स्थापना "हेली नॅशनल पार्क' या नावाने 1936 मध्ये करण्यात आली. 1957 मध्ये त्याचे नाव बदलून प्रसिद्ध शिकारी तसंच पर्यावरणवादी लेखक जिम कॉर्बेट यांचं नाव देण्यात आलं. 1970 च्या सुमाराला "वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडा'ची मदत घेऊन व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यामुळे वाघांची संख्या वाढायला मोठीच मदत झाली आहे. या परिसरात वाघ, हत्ती, चित्ता, रानमांजर यांच्यासारखे जंगली प्राणी; मगर, सुसर, नाग असे सरपटणारे प्राणी आणि पक्ष्यांच्या सहाशेहून अधिक प्रजाती पाहायला मिळतात. हिरव्यागार झाडांनी नटललेल्या वनराईचा आस्वाद घेण्यासाठी फ्लोरा भागात जायला हवं. इथं भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते जून हा उत्तम कालावधी असून पावसाळ्यात नद्यांना पूर आल्यास ते काही कालावधीसाठी बंदही ठेवलं जातं. इथं जाण्यासाठी पंतनगर येथील विमानतळ तसेच दिल्लीचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. रेल्वेनं जात असल्यास रामनगर आणि मोरादाबाद या रेल्वेस्थानकावरून टॅक्‍सी आणि बस उपलब्ध होतात. रस्त्यानं जाण्यासाठी जवळपासच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांपासून थेट दळणवळण सेवा पुरविली जाते. पर्यटकांना राहण्यासाठी वेगवेगळी हॉटेल्स, वन खात्याची रेस्ट हाऊस आणि रिसॉर्टसची सोय आहे. इथं खरेदी करण्यासाठी फारसा वाव जरी नसला, तरी फक्त जंगलात प्राप्त होणाऱ्या काही गोष्टी (आवश्‍यक त्या परवानगीसहीत) घेता येतात.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-6432207489285632882?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/6432207489285632882/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=6432207489285632882' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/6432207489285632882'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/6432207489285632882'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2008/02/blog-post.html' title='जिम कॉर्बेट नॅशनल पार्क'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-686092376801185071</id><published>2008-01-31T05:47:00.001-08:00</published><updated>2008-01-31T05:47:30.273-08:00</updated><title type='text'>दिल्ली</title><content type='html'>दिल्ली शहराला स्वत:चा असा मोठा इतिहास आहे. पूर्वी त्याच्या तख्तावर बसून राज्य करणं हा राजघराण्यांचा बहुमान समजला जाई. आज त्याला आपल्या देशाच्या राजधानीचा दर्जा प्रदान करण्यात आला. जगभरातल्या पर्यटकांचं ते प्रमुख आकर्षणस्थळ ठरतं.दिल्ली शहराला राजकीय, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटनांचं प्रतीक मानलं जातं. तिथं मुघल, राजपूत आणि अफगाणी साम्राज्याच्या खुणा जागोजागी पाहायला मिळतात. लाल किल्ला, जामा मशीद, हुमायूनची कबर, कुतुबमिनार आणि जंतरमंतर ही तिथली मुख्य ठिकाणं. इतर प्रेक्षणीय स्थळांमध्ये पुरातत्त्व विभाग आणि हवाई दलाचं वस्तुसंग्रहालय, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि बिर्ला मंदिर, अक्षरधाम मंदिर, बांगला साहिब गुरुद्वार ही ठिकाणे बघता येतील. त्याशिवाय राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटही पर्यटकांची आकर्षणस्थळं ठरतात. दिल्ली राजधानीचं ठिकाण असल्यामुळे ते देश तसेच जगभरातल्या सगळ्याच प्रमुख शहरांशी जोडण्यात आलं आहे. दिल्ली विमानतळावरून सतत मोठ्या प्रमाणावर फ्लाईट्‌स सुटतात. रेल्वेने जायचं असल्यास राजधानी एक्‍स्प्रेसच्या राजेशाही प्रवासाचा अनुभव घ्यायला हवा. पर्यटकांच्या वास्तव्यासाठी बजेट हॉटेलपासून ते डिलक्‍स हॉटेलपर्यंत निरनिराळ्या स्वरूपातील पर्याय उपलब्ध आहेत. पुढील प्रवासाकरिता मुक्कामासाठी (ट्रान्झिस्ट हॉल्ट) रेल भवन आणि महाराष्ट्रीय लोकांसाठी बृहन्महाराष्ट्र भवन उपलब्ध होतं. या शहराची व्यापारपरंपरा मोठी असून दागदागिने आणि मौल्यवान खडे, कार्पेट, सिल्क आणि सिल्व्हर वेअर प्रसिद्ध आहे. कनॉट प्लेस, चांदनी चौक आणि करोल बाग या मुख्य बाजारपेठा. पण तिथं जाऊन खरेदी करण्यापूर्वी घासाघीस करण्याची कला मात्र शिकून घ्यावी.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-686092376801185071?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/686092376801185071/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=686092376801185071' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/686092376801185071'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/686092376801185071'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2008/01/blog-post_3426.html' title='दिल्ली'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-1368966948307603862</id><published>2008-01-31T05:00:00.001-08:00</published><updated>2008-01-31T05:00:47.703-08:00</updated><title type='text'>काझीरंगा अभयारण्य</title><content type='html'>आसाम हे ईशान्य भारतातल्या राज्यांना जोडणारं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. हा संपूर्ण प्रदेश सपाट भूभाग असून नद्या आणि जंगलं यांनी समृद्ध आहे. यामुळे हा प्रदेश प्राण्यांसाठी नंदनवनच ठरतं आणि त्यामुळे या भागात देशातील एक मोठं काझीरंगा अभयारण्य आहे.एकशिंगी गेंडे हे या अभयारण्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्याशिवाय हत्ती, रानरेडे, सांबार, हरीणं आणि वाघ यांच्यासारखे वनचर प्राणी तसेच हजारो जातींचे पक्षीसुद्धा इथं पाहायला मिळतात. या पार्कमध्ये फिरण्यासाठी निघणाऱ्या हत्तींच्या फेऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबरोबरच जीप आणि मिनी बसमधूनही हिंडता येऊ शकते. या अभयारण्याखेरीज मानस अभयारण्य, ब्रह्मपुत्रा नदी, चित्रचक टेकडीवरील नवग्रह मंदिर आणि नीलाचल टेकडीवरील कामाख्या मंदिरासारखी ठिकाणंही बघण्यासारखी आहेत. काझीरंगाला जाण्यासाठी जोरहाट आणि गुवाहाटीला विमानतळ आहेत. फर्केटिंग हे रेल्वे स्टेशन काझीरंगाला जवळून जोडण्याचं काम करतं. आपल्याकडून जाण्यासाठी मुंबई-गुवाहाटी एक्‍स्प्रेस उत्तम. खासगी बस आणि टॅक्‍सींचा पर्याय वापरता येतो. इथं पर्यटकांच्या सोयीसाठी प्रामुख्यानं जंगलातच कॅम्प, लॉज आणि रिसॉर्टची व्यवस्था केली जाते. नोव्हेंबर मध्यापासून ते एप्रिलपर्यंतचा काळ येथे जाण्यासाठी उत्तम. गुवाहाटीत रेशमी कपडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात; तर काझीरंगा कलात्मक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-1368966948307603862?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/1368966948307603862/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=1368966948307603862' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1368966948307603862'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1368966948307603862'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2008/01/blog-post_7744.html' title='काझीरंगा अभयारण्य'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-1422185049156900125</id><published>2008-01-31T04:47:00.000-08:00</published><updated>2008-01-31T04:54:11.651-08:00</updated><title type='text'>दार्जिलिंग</title><content type='html'>"क्वीन ऑफ दि हिल्स'. भारतात हिमालय पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या थंड हवेच्या ठिकाणांमधील महत्त्वाचं "हिल स्टेशन' म्हणजे दार्जिलिंग! हे ठिकाण पश्‍चिम बंगालमध्ये असून, पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचं श्रेय इंग्रजांकडे जातं. त्याला "क्वीन ऑफ दि हिल्स' या नावानंही संबोधतात. दार्जिलिंग प्रामुख्यानं चहाचे मळे आणि दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेकरिता प्रसिद्ध असून, "युनेस्को'नं त्याला जागतिक वारशाचा दर्जा प्रदान केला आहे. ते समुद्रसपाटीपासून 2,134 मीटर उंचीवर आहे. टायगर हिल्स हा त्या परिसरातील सगळ्यात उंच भाग म्हणून ओळखण्यात येतो.मार्च ते सप्टेंबर हा येथील मुख्य हंगाम असतो. तिथं पाहण्याजोगी अनेक ठिकाणं आहेत. उदा. जपानी पॅगोडा, लॉईड बॉटनिकल गार्डन, कांचनगंगा, टाऊन ऑफ घूम, हिमालयीन माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट, पद्मजा नायडू हिमालयीन झुऑलॉजिल पार्क, धीरधाम मंदिर.दार्जिलिंगला जाण्यासाठी बागदोगरा हा प्रमुख विमानतळ असून, त्याला अनेक शहरांतील विमानसेवांनी थेट जोडण्यात आलं आहे. रेल्वेनं जायचं असल्यास न्यू जलपायगुडी स्थानकावर उतरावं लागतं. पुढ प्रसिद्ध टॉय ट्रेननंही प्रवास करता येतो. कोलकत्ता आणि अन्य ठिकाणांहून सरकारी तसेच खासगी बससेवा आणि टॅक्‍सी सेवा उपलब्ध आहे. इथं येऊन खास हिमालयीन प्रदेशात मिळणारी औषधं आणि औषधी वनस्पतींची खरेदी करणं महत्त्वाचं ठरतं. त्याखेरीज येथील कपडे, दागिने आणि मूर्तीही प्रसिद्ध आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#009900;"&gt;रेल्वे -&lt;/span&gt; दार्जिलिंगला सर्वात जवळ असलेले रेल्वेस्थानक म्हणजे न्यु जलपायगुडी (88 कि.मी.). मुंबई, कोलकाता, दिल्ली, गुवाहाटी, वाराणसी, बंगळूर, चेन्नई आदी ठिकाणांहून येथे जाता येते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#009900;"&gt;बस-टॅक्‍सी - &lt;/span&gt;एकदा का जलपायगुडीला तुम्ही उतरलात की, तुम्हाला दार्जिलिंगला जाण्यासाठी टॅक्‍सी, ऑटो रिक्षा उपलब्ध होतात.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-1422185049156900125?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/1422185049156900125/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=1422185049156900125' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1422185049156900125'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1422185049156900125'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2008/01/blog-post_31.html' title='दार्जिलिंग'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-1571899364572132306</id><published>2008-01-31T04:31:00.000-08:00</published><updated>2008-01-31T04:56:23.003-08:00</updated><title type='text'>ताजमहाल</title><content type='html'>भारत दर्शन करायला निघालं, तर आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतो ताजमहाल, जगातल्या सात आश्‍चर्यांपैकी एक म्हणून गणला जाणारा...राजा शहाजहान याने आपली पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेली वास्तू म्हणून ताजमहाल ओळखला जातो. त्यातून इंडो-पर्शियन कलाकुसरीचे उत्तम दर्शन घडते. त्याची प्रमाणबद्ध रचना, नाजूक नक्षीकाम व अप्रतिम सौंदर्य नजरेत भरण्याजोगंच आहे. प्रेमाचं प्रतीक बनलेल्या या ताजमहालाची मनमोहक रूपे वेगवेगळ्या वेळी पर्यटकांना पाहता येतात. ताजमहालाखेरीज लाल किल्ला, जहांगीर पॅलेस, इतमद्‌-उद-दाऊला कबर, राधाओसामी समाधी, अकबराची समाधी ही इतर काही प्रेक्षणीय स्थळंही या शहरात बघता येतात. आगऱ्यापर्यंत पोचण्यासाठी सहा किमी अंतरावर खेरिया हा मुख्य विमानतळ आहे. बाहेरून येणाऱ्या फास्ट आणि सुपरफास्ट ट्रेन आग्रा रेल्वे स्थानकावरच थांबतात. पर्यटकांसाठी सर्वसामान्य हॉटेलांपासून ते पंचतारांकित डिलक्‍सपर्यंत अनेक प्रकारची हॉटेलं उपलब्ध आहेत. इथं मिळणाऱ्या मोगलाई डिशेसही खवय्यांचं खास आकर्षण ठरतात. आगऱ्याला येऊन खरेदी करणं हाही एक महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी सदर बाजार, ताज गंज, किनारी बाजार व प्रताप पुरा यांसारखी ठिकाणं प्रसिद्ध आहेत. तिथं प्रामुख्यानं हस्तनिर्मित आणि कलाकुसरीच्या वस्तू विकत मिळतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#009900;"&gt;कसे जायचे -&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#009900;"&gt;ट्रेन -&lt;/span&gt; दिल्लीहून आग्रा हे शहर रेल्वेने चांगल्याप्रकारे जोडले गेले आहे. शताब्दी एक्‍सप्रेस-दोन तास, ताज एक्‍सप्रेस-अडीच तास आणि इंटरसिटी एक्‍सप्रेस-तीन तास.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#009900;"&gt;बस -&lt;/span&gt; दिल्ली, जयपूर, लखनो, ग्वालियर या ठिकाणाहून बससेवा मिळू शकते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-1571899364572132306?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/1571899364572132306/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=1571899364572132306' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1571899364572132306'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1571899364572132306'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2008/01/blog-post.html' title='ताजमहाल'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-2184192101511069161</id><published>2007-08-04T14:43:00.003-07:00</published><updated>2007-08-04T14:51:30.551-07:00</updated><title type='text'>दांडेली अभयारण्य</title><content type='html'>गोव्यातील सांगे तालुक्‍यात असलेले हे अभयारण्य जंगल सफारीसाठी प्रसिद्ध आहे. येथे जंगली खार, काळे चित्ते, वाघ, काळविटे आणि माकडे आणि ठिकठिकाणी किंग कोब्रासारखे अनेक प्रकारचे सर्प पाहावयास मिळतात.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-2184192101511069161?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/2184192101511069161/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=2184192101511069161' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/2184192101511069161'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/2184192101511069161'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2007/08/blog-post_1493.html' title='दांडेली अभयारण्य'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-2103894260842361907</id><published>2007-08-04T14:43:00.002-07:00</published><updated>2007-08-04T14:51:08.274-07:00</updated><title type='text'>खोतीगाव अभयारण्य</title><content type='html'>गोव्यातील काणकोण तालुक्‍यातील मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. जंगली भागातील लोकांचे आयुष्य अनुभवण्याबरोबरच येथे हरणे आणि सरपटणारे प्राणी पाहावयास मिळतात. येथे अनेक वनस्पतींच्या जातींचे संवर्धन केले आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-2103894260842361907?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/2103894260842361907/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=2103894260842361907' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/2103894260842361907'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/2103894260842361907'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2007/08/blog-post_7670.html' title='खोतीगाव अभयारण्य'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-4253512480323813433</id><published>2007-08-04T14:43:00.001-07:00</published><updated>2007-08-04T14:49:43.088-07:00</updated><title type='text'>साळावली धरण</title><content type='html'>पणजीपासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर सांगे तालुक्‍यात आहे. गोव्यातील हे सर्वांत मोठे धरण आहे. येथे पर्यटन खात्याने राहण्याचीही खास सोय केली आहे. याच धरणाजवळ गणपतीचे मंदिरही आहे. धरणामुळे विस्थापित झालेले हे मंदिर सरकारने पूर्वीच्याच साहित्यातून जसेच्या तसे पुन्हा उभारले आहे. हा प्राचीन वारसा पाहताना गोव्यातील पूर्वीचे जीवन किती समृद्ध होते, याचा अनुभव घेता येतो. याच परिसरात राज्य सरकार उभारत असलेले बोटॅनिकल गार्डनही पाहावयास मिळते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-4253512480323813433?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/4253512480323813433/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=4253512480323813433' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4253512480323813433'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4253512480323813433'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2007/08/blog-post_04.html' title='साळावली धरण'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-3723984852995344878</id><published>2007-08-04T14:43:00.000-07:00</published><updated>2007-08-04T14:48:44.378-07:00</updated><title type='text'>डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य</title><content type='html'>प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्यावरून नाव मिळालेल्या हे अभयारण्य मांडवी नदीजवळील चोराव बेटावर आहे. पणजीहून बस किंवा टॅक्‍सी पकडून रायबंदर फेअरी डॉकवर यायचे आणि बोटीतून मांडवी नदी ओलांडून चोराव बेटावर उतरायचे. ऑक्‍टोबर ते मार्च हा काळ इथे पक्षी निरीक्षणासाठी चांगला मानला जातो. यात अनेक प्रकारचे पक्षी पाहता येतात. चोडण बेटावरील हे अभयारण्य पक्षी निरीक्षकांना नेहमीच आकर्षित करत राहिले आहे. येथे खारफुटीचे जंगल आहे. यामुळेच या बेटाला अनेक "फ्लाइंग वंडर्स'नी आपले घर केले आहे. मगरी, कोल्हे आणि लांडगे हे प्राणीही या बेटावर पाहायला मिळतात.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-3723984852995344878?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/3723984852995344878/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=3723984852995344878' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/3723984852995344878'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/3723984852995344878'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2007/08/blog-post.html' title='डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-6444049851708645130</id><published>2007-07-27T23:00:00.000-07:00</published><updated>2007-07-27T23:00:02.288-07:00</updated><title type='text'>CHALA PHIRAYALA: सवतसडा धबधबा</title><content type='html'>&lt;a href="http://chalaphirayala.blogspot.com/2007/07/blog-post_22.html"&gt;CHALA PHIRAYALA: सवतसडा धबधबा&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-6444049851708645130?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='related' href='http://chalaphirayala.blogspot.com/2007/07/blog-post_22.html' title='CHALA PHIRAYALA: सवतसडा धबधबा'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/6444049851708645130/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=6444049851708645130' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/6444049851708645130'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/6444049851708645130'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2007/07/chala-phirayala.html' title='CHALA PHIRAYALA: सवतसडा धबधबा'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-8425705933604446090</id><published>2007-07-27T22:49:00.001-07:00</published><updated>2007-07-27T22:49:34.105-07:00</updated><title type='text'>बोंडला अभयारण्य</title><content type='html'>पणजीपासून 50 किमी, मार्गोपासून 38 किमी आणि पोडापासून 20 किमीवर बोंडला अभयारण्य आहे. जंगल रिसॉर्ट हे येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण. आठ चौ. मी. परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात हरणे, विविध पक्षी, वाघ अशा प्राण्यांबरोबरच येथील प्राणिसंग्रहालयातही मगरी, हत्ती, साप, हरणे पाहावयास मिळतात.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-8425705933604446090?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/8425705933604446090/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=8425705933604446090' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/8425705933604446090'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/8425705933604446090'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2007/07/blog-post_9558.html' title='बोंडला अभयारण्य'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-1619222604337328992</id><published>2007-07-27T22:47:00.000-07:00</published><updated>2007-07-27T22:48:57.505-07:00</updated><title type='text'>केसरवाळ धबधबा</title><content type='html'>पणजी-मडगाव रस्त्यावर वेर्णा गावामध्ये आहे. या धबधब्याच्या पाण्याच्या औषधी गुणांमुळे तो पर्यटकांत प्रसिद्ध आहे. त्वचारोग, विविध शारीरिक व्याधी असलेल्या व्यक्ती या धबधब्याखाली अंघोळ केल्यानंतर बऱ्या झाल्याचे अनेक अनुभव आहेत.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-1619222604337328992?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/1619222604337328992/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=1619222604337328992' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1619222604337328992'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1619222604337328992'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2007/07/blog-post_7709.html' title='केसरवाळ धबधबा'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-4037760655620746533</id><published>2007-07-27T22:46:00.000-07:00</published><updated>2007-07-27T22:47:43.024-07:00</updated><title type='text'>हरवळे धबधबा</title><content type='html'>गोव्यातील डिचोलीपासून नऊ किलोमीटर अंतरावर हरवळे धबधबा आहे. या धबधब्यात 24 फूट उंचीवरून पाणी सरळ खाली पडते. असे मानले जाते, की श्री रुद्रेश्‍वराची उंची 24 फूट होती. तेवढ्याच उंचीवरून हे पाणी पडत असल्याने या धबधब्याला धार्मिक महत्त्व आहे. या धबधब्यासमोरच रुद्रेश्‍वराचे मंदिर आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात गोव्यात येणे उत्तम. तसेच या धबधब्याजवळच प्राचीन गुहाही आहेत.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-4037760655620746533?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/4037760655620746533/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=4037760655620746533' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4037760655620746533'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/4037760655620746533'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2007/07/blog-post_2553.html' title='हरवळे धबधबा'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-5879332819173868046</id><published>2007-07-27T22:39:00.000-07:00</published><updated>2007-07-27T22:46:15.322-07:00</updated><title type='text'>दूधसागर धबधबा</title><content type='html'>पणजीपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. या धबधब्याजवळूनच रेल्वे ट्रॅक जातो. रेल्वेतर्फे दूधसागरला जाण्यासाठी खास रेल्वे चालवली जाते. जगातील प्रमुख 237 धबधब्यांमध्ये दूधसागरचा समावेश होतो. या धबधब्याची उंची 310 मीटर इतकी आहे. उंचीच्या निकषामध्ये दूधसागर धबधबा भारतातील धबधब्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. बेळगाव-गोवा रस्त्यावरील कुळे गावापासून हा धबधबा अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-5879332819173868046?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/5879332819173868046/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=5879332819173868046' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/5879332819173868046'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/5879332819173868046'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2007/07/blog-post_27.html' title='दूधसागर धबधबा'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-7385551871727926682</id><published>2007-07-22T05:57:00.001-07:00</published><updated>2007-07-27T22:38:18.707-07:00</updated><title type='text'>सवतसडा धबधबा</title><content type='html'>चिपळूण शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर मुंबई-गोवा महामार्गावर परशुरामनजीक घाटात सवतसडा धबधबा आहे. या धबधब्याची उंची सुमारे दीडशे फूट आहे. गर्द झाडी, गारवा, पावसाळ्यात एवढ्या उंचीवरून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना थांबायला भाग पाडत नसते, तरच नवल!धबधब्याचे उंचावरून पडणारे पाणी अंगावर झेलत पाण्याच्या पात्रात पोहण्याचा आनंद लहानग्यापासून वृद्धांपर्यंत सारेच हौशी पर्यटक घेत असतात. दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देतात. रविवार सुटीचा दिवस असताना ही संख्या आणखी वाढते. रविवारी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत धबधब्याचा परिसर पर्यटकांनी फुलून जातो. धबधब्याच्या पाण्यात भिजून हौस भागविल्यानंतर गार झालेल्या पर्यटकांच्या जिभेचे चोचले गरमागरम मक्‍याच्या कणसांनी पुरविण्याची शक्कलही स्थानिकांनी योजली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाजलेल्या कणसांच्या हातगाड्यांवरही पर्यटकांची गर्दी दिसते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-7385551871727926682?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/7385551871727926682/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=7385551871727926682' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/7385551871727926682'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/7385551871727926682'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2007/07/blog-post_22.html' title='सवतसडा धबधबा'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-1840057818545247344</id><published>2007-07-05T06:35:00.001-07:00</published><updated>2007-07-27T23:11:30.503-07:00</updated><title type='text'>सारपास ट्रेक</title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_hhtiYLpvGPg/Ro52pswbTGI/AAAAAAAAABM/OQjgOKVBzyo/s1600-h/sarpass2.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5084131488108858466" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_hhtiYLpvGPg/Ro52pswbTGI/AAAAAAAAABM/OQjgOKVBzyo/s320/sarpass2.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;चित्रपटांमध्ये नट-नट्यांना बर्फात खेळताना, स्केटिंग करताना पाहिल्यावर नेहमी वाटायचं आपल्यालाही बर्फात खेळण्याची, स्केटिंग करण्याची मजा लुटता येईल का कधी? बर्फाच्या या आकर्षणापायी आम्ही काही मित्रांनी दोन-तीन वर्षांपूर्वी वैष्णोदेवीची वारीही केली होती. पण तिथं काही आम्हाला बर्फ मिळाला नाही. या वर्षी "युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया'ने (वायएचएआय) मात्र ही संधी दिली. हिमाचल प्रदेशमधील कुलू जिल्ह्यात युथ हॉस्टेलने 1 ते 31 मे या दरम्यान "सारपास ट्रेकिंग एक्‍सपेडिशन' (सारपास मोहीम) आयोजित केली होती. 21 तारखेला सकाळी 9 वाजता मी, अजय, नंदू आणि दीपा असे आम्ही चौघे "कसोल' गावातील युथ हॉस्टेलच्या बेसकॅम्पमध्ये दाखल झालो. भुन्तर शहरापासून कसोल 30 कि.मी. व समुद्रसपाटीपासून साडेसहा हजार फूट उंचीवर. (टेम्परेचर 6 डिग्री सेल्सियस) गावात दहावीपर्यंत शाळा, रुंद रस्ते, वीज, हॉटेल्स अशा बऱ्यापैकी सुविधा आहेत. तिथं हिप्पींचा सुळसुळाट फार. हे हिप्पी बहुतांशी इस्रायल, इटलीमधून इथं आलेले. त्यांच्यामुळे इथल्या बऱ्याच घरांची हॉटेलं झालेली आहेत. चरस-गांजाच्या नशेत अर्धनग्न अवस्थेत हे हिप्पी तरुण-तरुणी जीवनाचा स्वैर आनंद उपभोगत इथं फिरत असतात. या हिप्पी गिऱ्हाईकांमुळे इथले दुकानदार भारतीय पर्यटकांकडे ढुंकूनही पाहत नाहीत.गावातून बेसकॅम्पला परतल्यानंतर सहा-साडेसातपर्यंत जेवण झालं. त्यानंतर कॅम्पफायरचा कार्यक्रम. हे कॅम्पफायर फारच वेगळ्या प्रकारचं होतं. युथ हॉस्टेलला लाकडं तोडून, जाळून वाया घालवणं मान्य नाही. त्याऐवजी एका लहानशा वर्तुळाकार जागेत विजेचं तोरण फिरवलं होतं. कॅम्पफायरमध्ये ट्रेकर्स, लीडर्स सर्व सहभागी झाले होते. नकला, कविता, गाणी, विनोद असे मनोरंजनाचे प्रकार सादर केले जात होते. कॅम्पफायरमधला सर्वात गोड कार्यक्रम होता सारपास मोहीम पूर्ण करून आलेल्या ग्रुपला प्रमाणपत्र वाटण्याचा. काहींनी आपले अनुभव या वेळी सांगितले. गरमगरम बोर्नव्हिटाचे घोट रिचवित व बर्फातल्या आठवणी साठवित आम्ही झोपायला निघून गेलो.दुसऱ्या दिवशी "ऍक्‍लमटायझेशन' (यामध्ये सकाळी थोडासा व्यायाम झाल्यानंतर दोन ब्लॅंकेट्‌स असलेली सॅग घेऊन बेस कॅम्पासून सुमारे 500 फूट उंचीवर नेले जाते.) आणि "ओरियन्टेशन' (या वेळी ट्रेकिंगची सविस्तर माहिती दिली जाते.) झाल्यावर तिसऱ्या दिवशी "रॉक क्‍लायबिंग आणि रॅपलिंग' दोरीच्या सहाय्याने खाली कसं उतरायचं, खाचा, कपारींच्या आधारानं केवळ हाता-पायाच्या सहाय्यानं मोठ-मोठे दगड कसे पार करायचे याची माहिती या वेळी देण्यात आली. दोरीच्या सहाय्याने उंचावरून खाली उतरण्याचा प्रत्यक्ष अनुभव सर्वांना देण्यात आला.अखेर सारपासच्या दिशेने कूच करण्याचा दिवस अखेर उजाडला. पुढच्या 6 दिवसांच्या प्रवासाला लागणारं सामान पाठीवर घेऊन टाळ्यांच्या गजरात बेसकॅम्पमधून आम्ही प्रस्थान केलं. जणू काही एव्हरेस्टच सर करायला निघालो आहोत, असं वाटत होतं! 44 जणांचा काफिला ग्रहणच्या वाटेला लागला. महाराष्ट्र, गुजरात, चेन्नई, बंगळूर अशा विविध ठिकाणांहून आलेल्या ट्रेकर्समुळे भारतातील विविधता या मोहिमेत एकवटली होती. 16 ते 52 वयोगटाच्या या ग्रुपमध्ये दोन मुलीही होत्या. कसोल ते ग्रहण 9 कि.मी.चे अंतर. तर 7 हजार 700 फूट उंचीवर. (टेम्परेचर 6 ते 7 डिग्री सेल्सियस) दाट वनराजीतून "ऍरोमार्क' शोधत नदी, ओढे ओलांडत आम्ही मजल-दरमजल करीत होतो. दूरूनच कधी तरी ऐकू येणारी पक्ष्यांची किलबिल, नदीचा खळखळाट मन प्रसन्न करीत होता. तासभर चालल्यानंतर पाठीवरची सॅग जड वाटू लागली. ती उतरवून पाठ थोडी मोकळी केली. कॅम्पमधून दिलेली बिस्किटं आणि लीडर्सच्या नजरा चुकवून आणलेल्या चकल्या, शंकरपाळ्या, खाकरा बाहेर आला. ते खाऊन प्रवास पुन्हा सुरू झाला. एकवटलेली विविधता एव्हाना हळूहळू विलग होऊ लागली होती. महाराष्ट्रीयन ग्रुप तयार झाला होता. भावनगर, मेहसाना, गांधीनगरमधील गुजरातीही एक झाले होते. दक्षिण भारतीयांचं वेगळेपण जाणवू लागलं होतं. ही विविधता टोळक्‍यात विभागली ती अगदी शेवटपर्यंत टिकली. पाणवठ्याची जागा आल्यावर कॅम्पमधून दिलेला "लंच पॅक' काढून जेवण उरकलं. दीडएक तास तिथं घालवल्यानंतर आम्ही पुन्हा चालू लागलो. आता चांगलीच चढण लागली होती. वातावरणाचा नूरही बदलू लागला होता. आकाशात काळे ढग जमून त्यांनी पावसाची वर्दी आणली होती. ग्रहणच्या कॅम्पमध्ये जायला तास-दीड तासाचा रस्ता राहिला असेल नसेल, एवढ्यात पावसाने हजेरी लावली. लागलीच रेनशीट अंगवार घेतली. प्लॅस्टिकच्या त्या पिशवीवर टपटप गारा पडू लागल्या. या ठिकाणी आयुष्यात पहिल्यांदा गारांचा पाऊस अनुभवला. रेनशिटमधून ओंजळ बाहेर काढत गारा ओंजळीत साठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा अजून नीटसा बर्फ झाला नव्हता. त्या लगेचच विरघळून जायच्या. रस्त्यावरून पाणी जोराने वाहू लागलं होतं आणि रेनशीटमुळे पुढचा रस्ताही नीट दिसत नव्हता. त्यामुळे चालणं कठीण होत होतं. त्या परिस्थितीत तिथं थांबणंही धोक्‍याचं होतं, म्हणून आम्ही शेवटी चालतच राहिलो. गावातली घरं दिसू लागल्यावर वाटलं टेन्ट जवळ आलं. पण ते अद्याप बरेच लांब होते. एकदाचे आम्ही टेन्टमध्ये आलो. थोड्या वेळानं पाऊसही थांबला.चंद्रपूरमधील पारस ... हे तिथले कॅम्पलीडर. पाऊस गेल्यानंतर शिटी वाजली. सर्वांना बोलावून त्यांनी प्रथम स्वागत केलं. नंतर गरमागरम चहा आणि कांदेपोहे दिले. गारठलेल्या शरीरांना थोडी ऊब मिळाली. टेन्टमध्ये बसण्यापेक्षा आम्ही काही जण ग्रहण गावात फिरायला गेलो. 400 ते 500 लोकवस्ती असलेलं हे गाव सुंदर आणि आटोपशीर होतं. शेती, व्यवसाय, मजुरी ही इथल्या लोकांची उपजीविकेची साधनं. लोक श्रीमंत नसले, तरी गरीबही नाहीत. इथली घरंही मोठी अगदी स्वप्नातल्या घरांसारखी. बर्फाच्या मोसमात दैनंदिन व्यवहार सुरळीत चालावे यासाठी घरं एकमजली बांधलेली. तळमजला हा पूर्णपणे गुरांसाठी. वरच्या मजल्यावर कुटुंबं राहातात. दहाबारा खोल्यांच्या या घरांची आंतरबाह्य रचना अत्यंत आकर्षक असते. गावात एक प्राथमिक शाळाही आहे. पण पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कसोल व महाविद्यालयीन शिकण्यासाठी भुन्तरलाच जावं लागतं. एवढ्या कठीण परिस्थितीतही इथं कित्येकांनी एमएपर्यंत शिक्षण घेतलंय. सुशिक्षित तरुणांना मुंबई, दिल्लीसारख्या शहरांचं आकर्षण फारसं नाही. तिथं पैसा जरी भरपूर मिळत असला, तरी जिवाला शांती नाही. इथं आम्ही कष्टाची अंगमेहनतीची कामं करतो, पण आमचं जीवन अतिशय शांत आहे. हा इथल्या तरुणांचा दृष्टिकोन. पैशाच्या आशेनं काही जण शहरांचा मार्ग धरतात, हेही ते कबूल करतात. इथली लग्नपद्धती साधारणपणे आपल्यासारखीच. लग्नसमारंभ चांगला दोन-तीन दिवस चालतो. या वेळी नाच-गाणी, जेवण-खाण अशी सर्व सरबराई असते. इथंही हुंडाप्रथा आहे. पण हुंड्यासाठी मुलीचा छळ मात्र होत नाही.दिवाळी, दसरा हे या लोकांचे सर्वात मोठे सण. या दिवशी गोड पदार्थ केले जातात. दिवाळीत फटाकेही फोडतात. ऑगस्ट महिन्यात इथं मोठी जत्रा भरते. त्या वेळी आजूबाजूच्या गावातल्या लोकांना आमंत्रित केलं जातं. त्यांच्या राहण्या-खाण्याची मोफत व्यवस्था केली जाते. या दिवशी पारंपरिक वेशात फेर धरून "कुल्वी' हे लोकनृत्य केलं जातं, गाणी म्हटली जातात. देवी, देवतांची जरी मंदिरं नसली, तरी पुराणातल्या याज्ञवल?क्‍य ऋषींचं मंदिर इथं आहे. सिनेमागृह शहराच्या ठिकाणी असल्यामुळे प्रमुख मनोरंजनाचं साधन म्हणजे टीव्ही. चार महानगरांत कॅसचा वाद सुरू असला तरी ग्रहणवासीयांना त्याची फिकीर नाही. इथल्या प्रत्येक घराबाहेर डिशअँटिना लावलेली दिसते. या गावाचं सौंदर्य साठवित आम्ही टेन्टमध्ये आलो.दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शिटी वाजली. पुढचा दिवस सुरू झाला. चहा, नाश्‍ता करून पुढच्या प्रवासासाठी दिलेला लंचपॅक घेऊन आम्ही साडेआठ वाजता ग्रहण सोडलं. आता या पुढच्या प्रवासात आम्हाला कुठेच गाव लागणार नव्हतं आणि ग्रहणचंही पुन्हा दर्शन होणार नव्हतं. पद्री आमचा दुसरा हॉल्ट. ग्रहणपासून 10 कि.मी.वर आणि 9,300 फूट उंचीवर. (टेम्परेचर 4 ते 5 डिग्री सेल्सियस) ऍरोमार्क्‍सच्या आधाराने वाट काढीत आम्ही मार्गक्रमण सुरू केलं. पाईन, देवदारच्या गर्द झाडांमधून निमुळत्या, वळणावळणांच्या रस्त्यानं आम्ही पुढे चाललो होतो. वाटेत मध्येच एखादं मोठं पडलेलं झाड आडवं येई. पावसात बुळबुळीत झालेलं ते झाड निमुळत्या रस्त्यावरून ओलांडणं फार जोखमीचं असे. कारण जरासा पाय घसरला, की सरळ 10-15 फूट खाली. मग घाबरत घाबरतच एकमेकांच्या आधारानं ते झाड आम्ही ओलांडत असू. वाटेत दोन-तीन झाडं अशी पडलेली असायचीच.सह्याद्रीमध्ये जसे विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात, निरनिराळी जनावरं आढळतात, तसं इथं फारसं काही दिसलं नाही. कुठल्या तरी पक्ष्याचा बारीकसा आवाज तोही क्‍वचितच आला तर. इथं ओढ्यांचा खळखळाट मात्र फार. जेवणाच्या ठिकाणी जमले तर ते डोमकावळे. नाही म्हणायला ग्रहणमध्ये लांब शेपटीचा निळसर रंगाचा राजेशाही थाटात उडणारा एक पक्षी पाहण्यात आला. बेस कॅम्पमधून निघताना दिलेल्या लिमलेटच्या गोळ्या अजूनही साथ देत होत्या. दम लागला की, एक गोळी तोंडात टाकायची, चघळून खाऊन झाली की, थोडं पाणी प्यायल्यावर हुशारी यायची. बहुतेक रस्ता हा उभ्या चढणीचा असल्यानं चालताना दम लागत असे. त्यामुळे बहुतेक सर्वांचा प्रवास हा मुक्‍यानंच चालत असे. दोन-अडीचपर्यंत आम्ही पद्री कॅम्पला आलो. स्वागताचा बॅनर तिथं वाट पाहातच होता. फोटो वैगरे काढून झाल्यानंतर आम्ही टेन्टकडे आलो. पाठीवरच्या सॅग उतरवून थोडी विश्रांती घेतल्यावर कॅम्प लीडरची शिटी वाजली. स्वागत, ओळख परेड झाली. दरम्यान, नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हवेत गारवा पसरला होता. बंगळूरचे नटराज आणि अहमदाबादचे विशाल पटेल हे इथले कॅम्पलीडर. त्यांनी स्क्वॅश (ऑरेंज किंवा लेमन फ्लेवरचे सरबत) प्यायला दिले. तिथल्या थंडीमध्ये पाणी पिण्याची इच्छा (आणि हिम्मतही) होत नसल्यामुळं कॅम्पमध्ये हे सरबत दिलं जातं. शरीरात पाण्याचं समप्रमाण राहावं हा त्यामागचा हेतू. हाताला झिणझिण्या आणणाऱ्या पाण्यात हात घालायला लागू नये, यासाठी प्रत्येक जण एकापेक्षा एक शक्कल लढवित असत. स्क्‍वॅश मिळो, चहा मिळो किंवा सूप मिळो ते पिऊन झाल्यावर भांडं धुण्यासाठी नळावर कोण जातंय याकडेच सगळ्यांचा "कानाडोळा' असे. एखादा नळाजवळ जाणारा दिसला की, आपलंही भांडं त्याच्याजवळ सरकवायचं. तीच परिस्थिती दोन नंबरची. काहींनी टिश्‍यू नेले होते. पण हे "टिश्‍यू कल्चर' आपले नसल्याने टिश्‍यू वापरूनही पाण्यात हात घालावाच लागे.पद्री कॅम्प उघड्या विशाल माळावर लावलेला होता. चारी बाजूला डोंगर. त्यातल्या काहींवर बर्फही होतं. लांबवर असलेल्या एका डोंगराच्या टोकावर नगारूचे म्हणजे आमच्या पुढल्या प्रवासातले टेन्टचे ठिपके दिसत होते. आपल्याला अजून एवढं वर चढून जायचं या कल्पनेनं पोटात भीतीचा गोळाही आला होता. पावसाची चिन्हं दिसू लागल्यानं आमचा त्या दिवशीचा नाश्‍ता आणि जेवण लवकरच उरकलं. त्या दिवशीचा आमचा प्रवास संपला होता. सकाळी जाग आली ती बेडटीच्या शिट्टीनं. चहा, नाश्‍ता करून व लंचपॅक घेऊन पद्रीलाही रामराम केला. आता आमचा पुढला टप्पा होता रातापानी. 5 कि.मी.चा प्रवास आणि 11 हजार 200 फूट उंचीवर आम्हाला जायचं होतं. इथलं (टेम्परेचर 6 ते 7 डिग्री सेल्सियस) पावसामुळे वाट निसरडी झालेली. त्यात सुरुवातीचा थोडा प्रवास उतारावरचा. मग कोणी न घसरले तरच आश्‍चर्य. थोडा अंदाज चुकला आणि खाली उतरताना दीपा घसरली. तेव्हापासून जो तिचा आत्मविश्‍वास डगमगला तो शेवटपर्यंत आला नाही. त्यानंतरचा तिचा सर्व प्रवास घाबरतच झाला. पण अशातही तिनं हा ट्रेक पूर्ण केला नागमोड्या वाटा, वाटेत पडलेली झाडं ओलांडत, पुढचा प्रवास सुरूच होता. आता पाऊस पडत नव्हता, तरी तो कधीही येईल ही भीती असल्यानं बहुतेकांनी आता रमतगमत चालणं सोडून वेग वाढवला होता. अगदी दुपारचं जेवणही ते घेत नव्हते. रातापानीला पोहोचण्यासाठी केवळ एक तासाचा रस्ता राहिला होता. पण पावसाची धास्ती घेतलेले आमचे मित्र थांबायला तयार नव्हते. आम्ही चार-पाच जणांनी जेवण घेतलं आणि कॅंपच्या वाटेला लागलो. त्यांची भीती शेवटी सार्थ ठरली. टपाटप गारा पडू लागल्या. थोडा वेळ झाडाखाली पाऊस जाण्याची वाट पाहू लागलो. मधूनच गारा तोंडातही टाकत होतो. पण पाऊस काही हटायचं नाव घेत नव्हता. शेवटी नाईलाजानं आम्ही निघालो. पण टेन्ट जवळच असल्याने फार त्रास झाला नाही. पुढे गेलेल्या आमच्या मित्रांच्या चेहऱ्यावर आपला अंदाज खरा ठरल्याचा अंदाज दिसत होता. पाऊस ओसरला होता. टॉमेटो सूप आमची वाट पाहातच होतं. आम्ही हावऱ्यासारखे धावत जाऊन सॅगमधून ग्लास काढले. लीडर महेश पटेल (अहमदाबाद) यांनी आमचे स्वागत केलं. तिथली परंपरा पार पडल्यानंतर दोन-दोन ग्लास गरमागरम सूप प्यालो. पोटात ऊब आल्यानं थोडं ताजतवानं वाटायला लागलं. इथून नगारूचे टेन्ट आता स्पष्ट दिसत होते. दुर्बिणीतून माणसांची हालचालही स्पष्ट दिसत होती आणि आता अंतरही कमी झालं होतं. रातापानीचा निसर्ग खूपच सुरेख होता. टेन्टच्या समोर 30-40 फुटांचा मोकळा माळ. त्यापुढे मात्र खोल दरी. नजर ठरत नाही इतक्‍या लांबपर्यंत अगदी क्षितिजापर्यंत खालीवर होत गेलेल्या हिमालयाच्या रांगा. काही डोंगर बर्फाळ, काही हिरवे कंच, काही नुसतेच दगडी, तर काही धुक्‍याखाली मान घालून जणू काही ध्यानस्त बसलेले भासत होते. ढगाआड कुठे तरी सूर्य लपला होता. त्याची किरणं त्या ढगांच्या कडांमधून जात असल्यानं मोकळ्या आभाळात लांबवर कवडसा उमटला होता. हे ऊन-सावलीचे खेळ टिपण्यासाठी पटापट कॅमेरे सरसावले. हवामान चांगलं असल्यानं बेस कॅम्पनंतर पहिल्यांदाच रातापानीला कॅम्पफायर होणार होता. त्याचीच ती शिटी. पटेल यांनी सर्व ट्रेकर्सना गोलाकार उभं केलं. गाणी, नाच, कविता, शेरो-शायरीत कॅम्पफायरची सांगता झाली. अजूनही सूर्य आकाशात होता. त्यामुळे थंडी जाणवत नव्हती. असंच हवामान राहिलं, तर सनसेट दिसणार होता. प्रोफेशनल फोटोग्राफर मोठमोठ्या लेन्स लावून सरसावले. पण थोड्या वेळात पश्‍चिमेला धुकं पसरलं. सूर्य धुक्‍याआडच अस्त पावला. थंडीही वाढू लागली होती. आम्ही जेवून झोपलो.सकाळी उठलो. मन प्रसन्न वाटत होतं. कारण मोहिमेची सांगता जवळ येऊ लागली होती. सारपास पार करण्यासाठी फक्‍त एकच टप्पा राहिला होता. नगारूला पोचल्यानंतर सारपास काहीच नव्हतं. तरी तो 9 कि.मी.चा प्रवास होता. यापुढचा जवळपास सगळा रस्ता चढणीचा होता. लंचपॅक घेऊन आम्ही नगारूकडे कूच केली. चालत होतो. दमत होतो. विश्रांती घेऊन पुन्हा चालत होतो. डोंगराला वळसा घालून जाणारी वाट. एका बाजूला उंच डोंगर, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. इकडे तिकडे बघताना पाच चुकला, तर सरळ खालची आणि खालून वरची वाट धरावी लागणार होती. थोडा थोडा मातीत साठून राहिलेला बर्फ आता दिसू लागला होता. म्हणजे लवकरच बर्फाचं दर्शन होणार! या कल्पनेनं मन मोहरून आलं. नगारूचा बॅनर दिसू लागला. आम्ही साडेबारा हजार फुटावर होतो. पावसाने स्वागतासाठी हजेरी लावली. पण तो आता बर्फ बनून आला होता. आम्हाला टेन्टमध्ये लवकर जायचं होतं. कारण ती जागा अत्यंत धोकादायक होती. चढण उंच असल्यामुळे जोरात चालणंही शक्‍य नव्हतं. मुख्य म्हणजे, आता ऑक्‍सिजनचं प्रमाणही कमी झालं होतं. आतापर्यंत जितके कॅम्प केले तिथं माणसं नसली तरी झाडं होती. इथं झाडांचाही पत्ता नव्हता. इथल्या वातावरणाचा नेम नाही. काही वेळा ताशी 120 कि.मी. वेगाने इथं वारे वाहतात. त्यामुळे सर्वांचीच टेन्ट गाठण्याची घाई चालली होती. एकदाचे टेन्ट दिसले. वातावरण खराब असतानाही तिथले कॅम्पलीडर विश्‍वासकुमार गर्ग (पंजाब) आमचं स्वागत करण्यासाठी पुढं आले होते. अंतर कमी असलं, तरी ते भरपूर वाटत होतं. थोड्याच वेळात बर्फाच्या पावसानेही जोर धरला होता. बर्फाचे टपोरे दाणे साबुदाण्यासारखे जमिनीवर उडत होते. काही वेळानं पाऊस बंद झाला. बर्फ वितळू लागल्यानं. सगळी जमीन निसरडी झाली होती. असेंब्लिंगसाठी बोलवायला आलेले दोघे जण आमच्या समोरच घसरून पडले होते. आम्ही काठीचा आधार घेत सावकाश पावलं टाकत कॅम्पलिडरसमोर जमा झालो. इन्स्ट्रक्‍शन दिल्यानंतर त्यांनी टेन्टमध्येच आमच्या चहाची व्यवस्था केली. चहा पिऊन होईपर्यंत वातावरण पूर्ण बदललेलं होतं. आभाळ मोकळं झालेलं. सूर्य दिसू लागला होता. सर्व जण टेन्टबाहेर आले. ज्या जागेवर टेन्ट लावले होते, ती जेमतेम 50 फुटांची. सारपारला जाण्याचा मार्ग सोडला, तर बाकी सर्व बाजूला दरीच होती. इथून ग्रहण, पद्री आणि रातापानीचे कॅम्प स्पष्ट दिसत होते. दूरवर हिमालया?य्‌ा पसरलेल्या रांगा. समोर सारपासचा बर्फाच्छादित डोंगर. दुसऱ्या दिवशी या डोंगरावरूनच आम्हाला खाली उतरायचं होतं. पाण्याची सोयदेखील मजेशीर होती. एका ठिकाणी खूप बर्फ साठलेलं होतं. त्याच्या पायथ्याला दोन ठिकाणी प्लॅस्टिकच्या बाटल्या लावलेल्या होत्या. बर्फ वितळायला सुरुवात झाली की, त्या बाटल्यांच्या तोंडातून पाणी येत असे. तेच पाणी जेवणाला वापरलं जाई. त्या दिवशी नेहमीपेक्षा जरा लवकरच जेवण झालं. दक्षिण दिशेला धुकं गडद होऊ लागलं होतं. काळे ढग गुरगुरत आमच्याकडे येत होते. हे वादळाचे संकेत असल्याचं ओळखून आम्ही सरळ टेन्टमध्ये शिरलो. तोपर्यंत वाऱ्यानंही वेग घेतला होता. टेन्टचे मागचे-पुढचे पडदे बंद करण्याची झटपट होऊ लागली. एखादा आडदांड गुंड दरवाजावर लाथाबुक्‍क्‍या घालून घरात शिरण्याचा प्रयत्न करतो, तसे हे वारे टेन्टमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत होते. पण पडदे बंद करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. टेन्ट गदागदा हलू लागले. टेन्ट उखडून पडतायत की काय, अशी परिस्थिती झाली होती. कुठून अवदसा आठवली, नि या ट्रेकला आलो, असं वाटायला लागलं. आम्हाला लवकर झोपणं भाग होतं. कारण दुसऱ्या दिवशी पहाटे अडीच वाजता उठायचं होतं. प्रवास अर्ध्या रात्रीच सुरू करायचा होता. कारण एकदा का सूर्य उगवला, की बर्फ वितळायला सुरुवात होते. त्यानंतर बर्फातून चालणं शक्‍य नसतं.दुसऱ्या दिवशी आम्ही अडीचला नाही, पण तीनला उठलो. एवढ्या पहाटे ब्रश करण्याची कोणाचीच छाती नव्हती. बेडटी केव्हाचाच येऊन गेला होता. तो पुन्हा मिळणे शक्‍य नव्हता. नाश्‍ता, पॅकलचं घेऊन निघेपर्यंत आम्हाला सहा वाजले. निघायला उशीर झाला होता. दोन गाईड घेऊन आम्ही नगारूला रामराम केला. बर्फाच्या प्रदेशात आम्ही पाय ठेवला. वारा वाहत होता. इथून आम्हाला अजून 1300 फूट उंच जाऊन सारपास गाठायचं होतं. बर्फातला एकूण प्रवास 8 तासांचा होता. (टेम्परेचर 2 ते 3 डिग्री सेल्सियस) सौर म्हणजे तळं. त्या डोंगरावर अशी बरीच बर्फाची तळी आहेत. त्यापैकी एका तळ्याजवळून आम्ही जाणार होतो. त्यामुळे या ठिकाणाला सारपास हे नाव पडलं. बर्फात खेळण्याचे अगोदर ठरवलेले बेत एव्हाना पूर्णपणे गोठले होते. मरणाची थंडी होती. नाक आणि डोळ्यांशिवाय शरीराचा कोणताच भाग उघडा नव्हता. त्यातही नाक असल्याचं जाणवत नव्हतं. दीड-दोन तास बर्फात चालून झाल्यानंतर आम्ही त्या तळ्याजवळ म्हणजेच सारपासजवळ आलो. तिथून पुढं गेल्यानंतर एका बर्फाळ मैदानावर आमच्या गाईडनी आम्हाला थांबवलं. तिथं त्यांचा चहाचा स्टॉल होता. ग्रुपमधल्या बऱ्याच जणांनी तिथं चहा घेतला. फोटो काढले. तिथून आम्ही निघालो शंभरएक पावलं चालल्यानंतर गाईडनं आम्हा सर्वांना रांगेत उभं केले. पहिल्यांदा त्या दोघांपैकी एक बर्फावरून स्लाईड करून खाली गेला. खाली गेल्यानंतर एखाद्या मुंगीसारखा तो दिसत होता. आता आम्हाला बर्फावरून घसरायला मिळणार होतं. दुसरा गाईड प्रत्येकाला एका ठराविक जागेवर बसून खाली पाठवत होता. एकेकाला खाली जाताना पाहून आमचा आनंद स्लाईडगणिक वाटत होता. स्वत: स्लाईड करताना तर आम्हाला गगन ठेंगणं झालं होतं. दरम्यान, सूर्य आता व्यवस्थित वर आल्यामुळे बर्फ वितळू लागला होता. वितळू लागलेल्या बर्फातून चालणं अवघड होऊ लागलं होतं. ऑक्‍सिजन तर फारच कमी असल्यामुळे थोडं चाललं तरी दम लागत असे. त्या बर्फाळ डोंगरावर जवळपास विश्रांती घेण्यासारखं ठिकाण नसल्यानं चालणं भाग पडत होतं. काठीच्या आधाराने तिथल्या तिथंच उभं राहूनच अर्ध्याएक मिनिटाची विश्रांती घेऊन आम्ही पुढं जात असू. इतकी वर्षे हवाहवासा वाटणारा बर्फ आता नकोसा वाटत होता. अजून बरंच चालायचं होतं. प्रत्येक पाऊल टाकताना जीवावर येत होतं. काही ठिकाणी बर्फ कडक होता आणि ऊन पडल्यामुळे पृष्ठभागावरचा बर्फ वितळत होता. त्यामुळं पाय जोरात आपटून घट्ट रूतवूनचालावं लागत होतं. त्या आपटून पाय चालण्यामुळे ते भरून आले होते, पण तरीही चालणं भाग होतं. कारण आमच्या विश्रांतीचे ठिकाण अजून खूप लांब होतं. नगारूला मिळालेल्या लिमलेटच्या गोळ्या एकेक तोंडात टाकत कसेबसे पुढे चालत होतो. विश्रांतीचं ठिकाण आता दिसू लागलं होतं. मनाला पुन्हा उभारी मिळाली. आता थोडंच चालायचं आहे. मग विश्रांतीच करायची आहे. असं मनाला समजावत आम्ही पुढे चाललो. अंतर आता थोडंच राहिलं होतं, पण सतर-ऐंशीच्या कोनातून ती वाट जात होती. आता फक्‍त दहाच पावलांचं अंतर राहिलं होतं. पण ही वाट सरळ काटकोनात होती. पुढे गेलेल्या गाईडनं आपल्या हातातल्या कुदळीसारख्या हत्यारात भिंतीसारख्या त्या वाटेवर खड्डे खोदून पायऱ्या तयार केल्या होत्या. पण प्रत्येक पायरीवर आई आठवत होती. अखेर त्या विश्रांतीच्या ठिकाणी आम्ही एकदाचे पोहोचलो. थोडं चालल्यानंतर आता स्लाईड करीतच जमिनीवर जायचं होतं. अखेर शेवटी स्लाईड करून पुन्हा आम्ही जमिनीवर आलो. इथं एक चहाचा स्टॉल होताच. सर्व जण तिथं बसलो. बूट काढून ओले मोजे सुकत टाकले. नगारूहून दिलेला फ्रुटीसारखा मॅंगो ज्यूस प्यालो. उरलेली बिस्किटं खाल्ली. एव्हाना बर्फाचं आकर्षण पार नाहीसं झालं होतं. डोंगरावरचा बर्फ आम्हाला खुणावत तर नव्हताच, उलट कशी जिरवली तुमची, असं चिडवत असल्यासारखा वाटत होता.घरची आठवण अधिकच तीव्र होऊ लागली होती. कधी एकदा घरी जातोय असं झालं होतं. पण घर एवढ्यात भेटणार नव्हतं. अजून 5 दिवस तरी लागणार होते. नाईलाजानं आम्ही उठलो. कारण बिस्केरी गाठायचं होतं. यापुढचा सर्व रस्ता तसा सोपाच होता. कारण आता चढण लागणार नव्हती. पण वाटेला लागल्यानंतर जाणवलं की, चढण जेवढी चढायला कठीण, उतार तेवढाच उतरायला त्रासदायक असतो. थोड्याच वेळात आम्ही बिस्केरी कॅम्पमध्ये दाखल झालो. बिस्केरीतलं निसर्गसौंदर्य अप्रतिम होतं. आमचे टेन्ट मोठ्या मैदानावर लावले होते. सगळा डोंगर हिरवी-पोपटी चादर पांघरलेला. मेंढ्यांचे कळप, गुरं चरत होती. राई, सोस, रकाडच्या झाडांच्या रांगा. प्रसन्न वातावरण एक वेगळाच आल्हाद देत होतं. हिंदी चित्रपटांमधली स्वित्झर्लंडची सृष्टी आम्ही प्रत्यक्षात तिथं अनुभवत होतो. एवढी सुंदर लोकेशन्स भारतात असताना हे बॉलिवुडवाले स्वित्झर्लंडला का पळतात, हा प्रश्‍न राहून राहून सारखा मनात येत होता. ओले झालेले आणि स्लाईड्‌समुळे फाटलेले कपडे बदलून, नवीन कपडे घालून तिथली स्वर्गसुंदर सृष्टी डोळ्यांनी पिऊन घेण्यासाठी आम्ही टेन्टबाहेर येऊन बसलो.सकाळी शिटीनं जाग आली. पुढचा टप्पा गाठण्याची घाई होतीच. लंच घेऊन आम्ही "बंडक्ताज'च्या वाटेला लागलो. बिस्केरी ते बंडक्ताज 12 कि. मी.चे अंतर (टेम्परेचर 6 ते 7 डिग्री सेल्सियस) आमच्यासोबत रामलाल होते. अर्ध्या वाटेपर्यंत रस्ता दाखवून ते परतणार होते. पुढचा टप्पा लवकर लवकर गाठायची ओढ लागल्यानं पावलं पटापट पडत होती. पुन्हा एकदा दाट वनराजीतून चालताना उल्हसित वाटत होतं. इथं निरनिराळ्या प्रकारची फुलं दिसत होती. सदाफुलीसारखी, पण साबुदाण्याएवढ्या आकाराची पांढरी फुलं तर खूपच सुंदर वाटत होती. मोठ्या चारपाच झाडांच्या मधे नेहमीप्रमाणं एक टी स्टॉल होता. आम्ही तिथं सॅग उतरवल्या. लंच करून घेतलं. त्या चहावाल्याबरोबर गप्पा मारता मारता तो गायक वगैरे असल्याचं समजलं. सागरसिंग राठी त्याचं नाव. स्वत:चं एक गाणं त्यानं आम्हाला गाऊन दाखवलं. त्या गाण्याचे बोल होते "मेरी शिरीदेवी ओ कौरवे चौली तू'. पहाडी भाषेतलं ते गाणं ऐकताना फारच सुंदर वाटत होतं. त्या गाण्यातून त्यानं एका विफल प्रियकराची व्यथा मांडली होती. गाण्यातला प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो की, मी तुला श्रीदेवी, माधुरी, पूजा भट या नट्यांपेक्षाही सुंदर मानलं. पण, उलट तू मलाच सोडून दुसऱ्याकडे निघून गेलीस. त्याच्या गाण्याची "तारीफ' करीत आम्ही पुढचा रस्ता धरला.बंडक्ताज कॅम्पदेखील सुंदर ठिकाणी लावला होता. टेन्टच्या मागंपुढं ऐसपैस जागा होती. आता आम्ही आणि ऊंची 7600 फुटावर होतो. त्यामुळे फारशी थंडी जाणवत नव्हती. पुढचा दिनक्रम युथ हॉस्टेलच्या नियमाप्रमाणं पार पडला. सकाळी उठून आम्ही बरशैनीच्या मार्गाला लागलो. आमची बेसकॅम्प गाठण्याची उर्मी अधिकाधिक वाढत होती. साहजिकच चालण्याला वेग आला होता. बरशैनीहून निघाल्यानंतर वाटेत पुलघा गाव लागलं. या गावातल्या कोणत्याही व्यक्तीबरोबर बोलायचं नाही, अशी ताकीद आम्हाला लीडर्सनी अगोदरच दिली होती. कारण या गावात मोठ्या प्रमाणावर अफूची तस्करी होते. आदेशांचं पालन करीत आम्ही गाव ओलांडून पुढे गेलो. तिथं पार्वती नदीवर धरण बांधण्याचं म्हणजेच "पार्वती प्रोजेक्‍टचं' काम सुरू होतं. 2151 मेगावॅट वीजनिर्मितीचा तो प्रकल्प तयार करण्याचं काम मुंबईतल्या पटेल इंजिनीअरिंग या कंपनीकडे आहे. इथून पुढचा टप्पा मनीकर्णचा आणि तो बसचा असल्याने आम्ही जवळच असलेल्या बस थांब्यावरनं बस पकडली. बसचा प्रवासही रोमहर्षकच होता. थ्रील म्हणून आम्ही बसच्या टपावर बसून प्रवास करण्याचं ठरवलं. पण पहाडी रस्त्यांतून वळणं घेत बस जाऊ लागली, तसा आमचा जीव वरखाली होऊ लागला. प्रत्येक वळणाला बस एका बाजूला झुके. नेमकी त्याच बाजूला खोल दरी असायची. काही वेळा विजेच्या जिवंत केबल वाकल्यानंतरही शिवाशिवीचा जीवघेणा खेळ खेळत. ही अडथळा शर्यत पार करीत आम्ही मनीकर्णला पोहोचलो. मनीकर्ण हे हिंदू आणि शिखांचे तीर्थक्षेत्र. मनीकर्णबद्दल तिथं एक आख्यायिका सांगितली जाते. एकादा शंकरपार्वती या मार्गावरून जात असताना पार्वतीच्या कानातला दागिना या ठिकाणी पडला. तो शेषाने गिळला व तो पाताळात लपून बसला. बराच शोध केला तरी शंकराला दागिना सापडला नाही. शेवटी त्याचा राग अनावर झाला. हे शेषाला कळल्यावर त्याने पाताळगंगेमार्फत तो दागिना पुन्हा धरणीतून वर फेकला. तेव्हापासून या स्थानाला मनीकर्ण असे नाव पडले. या ठिकाणचं एक महत्त्वाचं आश्‍चर्य म्हणजे गरम पाण्याचं कुंड. कुंडाजवळच शिखांचा गुरुद्वारा आहे. गुरुद्वारातल्या "लंगर'मधलं जेवण या कुंडातच शिजवलं जातं, इतकं इथलं पाणी गरम आहे. या कुंडातून पाईपद्वारे एका मोठ्या कुंडात पाणी सोडलेलं आहे. तिथे भाविकांच्या स्नानाची व्यवस्था केलेली आहे. त्या प्रदेशातलं मनीकर्ण तसं नामांकित तीर्थक्षेत्र असल्यानं, इथं विविध प्रकारची बरीच दुकानं आहेत. खरेदी वगैरे करून झाल्यानंतर पुन्हा बसमध्ये बसून आम्ही कसोलला आलो. कधी एकदा घर गाठतोय असं झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी भुन्तरला जाणारी गाडी पकडली. कसोलच्या आठवणी डोळ्यात आणि हृदयात साठवीत आम्ही घरच्या वाटेला लागलो.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-1840057818545247344?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/1840057818545247344/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=1840057818545247344' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1840057818545247344'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/1840057818545247344'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2007/07/blog-post_05.html' title='सारपास ट्रेक'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_hhtiYLpvGPg/Ro52pswbTGI/AAAAAAAAABM/OQjgOKVBzyo/s72-c/sarpass2.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-161296449477029698</id><published>2007-07-05T06:35:00.000-07:00</published><updated>2007-07-05T10:42:39.093-07:00</updated><title type='text'>रामतीर्थ धबधबा</title><content type='html'>&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_hhtiYLpvGPg/Ro0tKswbTEI/AAAAAAAAAA8/LoR-OUAW6YM/s1600-h/RAMTHIRT.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5083769216207375426" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_hhtiYLpvGPg/Ro0tKswbTEI/AAAAAAAAAA8/LoR-OUAW6YM/s320/RAMTHIRT.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;कोल्हापूर जिल्हातील आजऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर हिरव्या गर्द वनराईच्या कुशीत वसलेला रामतीर्थ धबधबा पावसात मुसळधार कोसळू लागतो.आजरा शहराच्या पश्‍चिम-उत्तर पूर्व दिशेकडून हिरण्यकेशी नदी वाहते. या नदीवरील रामतीर्थ धार्मिकस्थळाजवळचा धबधबा म्हणजे निसर्गसौंदर्याचा खजिना. दरवर्षी हजारो पर्यटक या स्थळाला आवर्जून भेट देतात. पावसामुळं हिरण्यकेशी नदीचं पात्र वाहायला सुरुवात झाली की, उन्हाळ्यात कोरडा पडलेला धबधबा सौंदर्यानं खुलत जातो. निसर्गाचं मुक्तहस्ते वरदान लाभलेला हा धबधबा अनेकांना भुरळ घालतो. नदीपात्रातील काळ्याकभिन्न विशाल पत्थरांवरून वेगानं धावणारं पांढरं-तांबूस पाणी धबधब्याचं सौंदर्य खुलवितं. तसंच कोसळणाऱ्या प्रपाताचे तुषार आणि मांद्रसप्तकातील धीरगंभीर आवाज अवघा आसमंत भरून टाकतो. सृष्टीसौंदर्याचं हे अनोखं रूप डोळ्यांत साठवूनच चिंब झालेला पर्यटक माघारी वळतो.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-161296449477029698?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/161296449477029698/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=161296449477029698' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/161296449477029698'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/161296449477029698'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2007/07/blog-post.html' title='रामतीर्थ धबधबा'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_hhtiYLpvGPg/Ro0tKswbTEI/AAAAAAAAAA8/LoR-OUAW6YM/s72-c/RAMTHIRT.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-298159147607721917.post-8900082989002076182</id><published>2007-06-23T14:40:00.000-07:00</published><updated>2007-07-05T10:45:55.667-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आंबोली धबधबा'/><title type='text'>आंबोली</title><content type='html'>&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_hhtiYLpvGPg/Ro0t6swbTFI/AAAAAAAAABE/RTPYgUi5HCw/s1600-h/AMBHOLI.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5083770040841096274" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_hhtiYLpvGPg/Ro0t6swbTFI/AAAAAAAAABE/RTPYgUi5HCw/s320/AMBHOLI.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;सावंतवाडीपासून एक तासाच्या अंतरावर असलेले आंबोली आता पर्यटनाचे केंद्र बनू लागले आहे. आंबोली घाटातील धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची खाशी गर्दी होते. महादेवगड पॉईंट, कावळे व्हॅली आणि हिरण्य नदीचे उगमस्थान यासह आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहण्यासारखा आहे. विशेषतः पावसाळ्यात आंबोलीला एकदा तरी जावेच. या ठिकाणी मुंबईहून कोकण रेल्वेने आणि बाय रोडही जाता येते. रस्तामार्गे 12 ते 13 तास लागतात; तर रेल्वेमार्गे सात ते आठ तासांत आंबोलीत पोहोचता येते. येथून गोवाही दोन तासांच्या अंतरावरच आहे. या ठिकाणी व्यावसायिक मासेमारी करणाऱ्यांबरोबरच काही शौकिनांना मासेमारीचा आनंद लुटता येऊ शकतो. कोसळणाऱ्या धबधब्याचे आणि परिसरातील निसर्गसौंदर्य पाहता पाहताच मासेमारीचा एक वेगळा आनंद लुटणे ही एक वेगळीच मजा असते.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/298159147607721917-8900082989002076182?l=chalaphirayala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chalaphirayala.blogspot.com/feeds/8900082989002076182/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=298159147607721917&amp;postID=8900082989002076182' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/8900082989002076182'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/298159147607721917/posts/default/8900082989002076182'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chalaphirayala.blogspot.com/2007/06/blog-post.html' title='आंबोली'/><author><name>bhramar</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_hhtiYLpvGPg/Ro0t6swbTFI/AAAAAAAAABE/RTPYgUi5HCw/s72-c/AMBHOLI.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry></feed>
