आंबोली


सावंतवाडीपासून एक तासाच्या अंतरावर असलेले आंबोली आता पर्यटनाचे केंद्र बनू लागले आहे. आंबोली घाटातील धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची खाशी गर्दी होते. महादेवगड पॉईंट, कावळे व्हॅली आणि हिरण्य नदीचे उगमस्थान यासह आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहण्यासारखा आहे. विशेषतः पावसाळ्यात आंबोलीला एकदा तरी जावेच. या ठिकाणी मुंबईहून कोकण रेल्वेने आणि बाय रोडही जाता येते. रस्तामार्गे 12 ते 13 तास लागतात; तर रेल्वेमार्गे सात ते आठ तासांत आंबोलीत पोहोचता येते. येथून गोवाही दोन तासांच्या अंतरावरच आहे. या ठिकाणी व्यावसायिक मासेमारी करणाऱ्यांबरोबरच काही शौकिनांना मासेमारीचा आनंद लुटता येऊ शकतो. कोसळणाऱ्या धबधब्याचे आणि परिसरातील निसर्गसौंदर्य पाहता पाहताच मासेमारीचा एक वेगळा आनंद लुटणे ही एक वेगळीच मजा असते.